आमचा एक इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप आहे. जो मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजीत करतो. अशाच एका महान कलाकाराचा कार्यक्रमाची साक्षीदार होण्याचे भाग्य नुकतेच मला लाभले. ‘Lamhe A Journey With The Hundred Strings’ असे या कार्यक्रमाचे नाव ठरले.
पंडित शिवकुमार शर्मां यांचा हा कार्यक्रम धारवाड मध्ये करायचे ठरले आणि आम्ही तयारीला लागलो.ह्या कार्यक्रमाचे स्वरूप शिवकुमारजींचे फक्त संतूरवादन असे नसून त्यांचा सांगीतिक जीवन प्रवास अर्थात स्वतः त्यांचा कडून ऐकण्याची सुवर्णसंधीही होती..
नमस्कार मंडळी,
आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?'
मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार!
हिमशिखरांतून खळखळ गाते
मनमंदीर तर झगमग झुलते
कुणास कोणी हरवून जेते
तुझी पुलावर आठवण येते.
----
काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१
काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन.
या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो"..
नमस्कार-
काल २१ आगष्ट, बरोबर ८१ वर्षापूर्वी म्हणजे २१ आगष्ट १९३१ ह्या दिवशी पं. विष्णु दिगंबर पलुस्कर निधन पावले. त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणारा एक लेख लॉस एन्जेलिस येथील श्री. शशीकांत पानट यांनी लिहिला आहे तो आपल्या वाचनार्थ येथे प्रसिध्द करीत आहे. ह्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भव्य कार्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे एव्हढाच उदेश्य!
धन्यवाद,
आकाश
हा लेख येथे प्रकाशीत करण्यारिता श्री. शशीकांत पानट यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------------
गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट अनुराग कश्यपच्या कारकिर्दितला बहुचर्चित हुकुमी एक्का. स्नेहा खानवलकर या प्रतिभाशाली मराठी मुलीने या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे. "हंटर" आणि "वुमनिया" च्या यशानंतर गँग्स ऑफ वासेपुर २ च्या संगीताकडुन अपेक्षा उंचावल्या होत्या ज्या बर्याच अंशी पुर्ण झाल्या आहेत. स्नेहा खानवलकरच्या वैविध्यपुर्ण आणि रचनात्मक प्रयोगांमुळे चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय झाली आहेत.
१. ची चा लेदर : "दुर्गा" नामक १६ मुलीने हे गाणे गायले आहे. रेल्वेच्या डब्यात गाण्यापासुन ते ची चा लेदर पर्यतचा दुर्गाचा प्रवास रंजक आहे.
भारतीय सिनेमाला आता शंभर वर्षांचा इतिहास आहे व संगीताचे आज चित्रपटातील महत्व तुलनात्मक रित्या कमी झालेले असले तरी संगीत हा भारतीय बोलपटाचा ( टॉकी) एकेकाळी प्राण होता यात शंका नाही. भारतीय बोलपटांच्या विषयात काळाच्या संदर्भाप्रमाणे बदल झाले तसे संगीताच्या शैलीतही.पहिल्या कालखंडात गायक व नट ही भूमिका एकच व्यक्ति करीत असे. त्यामुळे अभिनय यथातथा असला तरी चालेल पण गाता आले पाहिजे अशी अट असे. पु़ढे तांत्रिक प्रगति होऊन पार्श्व गायनाचे युग निर्माण झाले. सैगल, पंकज मलिक, सुरेंद्र, श्याम, यांची जागा तलत महमूद, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार किशोरकुमार यानी घेतली.