Skip to main content

समाज

एक वादळ शांत होतांना

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 04/06/2019 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा बॉक्सिंग हा शब्द मनात येतो तेव्हा- तेव्हा तुमच्यासमोर सर्वात पहिले नाव येत ते The undisputed heavyweight champion of the world ‘महंमद अली’चं! १७ जानेवारी १९४२ ला केंटकी मधल्या लुइजविल शहरात त्याचा जन्म झाला. त्याचं आधीचं नाव 'कॅशियस क्ले' १२ वर्षाचा असताना त्याची सायकल चोरीला गेली होती, त्याची तक्रार करण्यासाठी तो मार्टिन नावाच्या एक पोलिस ऑफिसरकडे गेला, तिथे त्याचा आवेश पाहून, मार्टिनमामांनी हि उर्जा बॉक्सिंगमध्ये खर्च करायला सांगितली आणि एक जग्गजेत्याचा प्रवास सुरु झाला. त्याचा उर्जेवर आणि चपळतेवर प्रचंड विश्वास होता.

शतजन्म शोधितांना....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.

लोकशाही ‘शाई’ पुरती!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/05/2019 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे भारताचे तमाम लोक हे नागरिक नाहीत. फक्त मतदार आहेत. भारताचे लोक स्वत:ला ‘जागरूक नागरिक’ समजतात. आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून मतदान करतात. वीस- पंचवीस उमेदवारांपैकी मतदारांना एकही पसंत नसतो, पण निवड न करता कसं चालेल, म्हणून तो कोणाला तरी मतदान करतो. NOTA पर्यायही स्वीकारतो. (नोटा पर्याय निवडणं म्हणजे बोटाला शाई लावण्यापुरतं मतदान करणं.) इतक्यांपैकी नागरिकांना एकही उमेदवार योग्य वाटू नये, हे खरं तर उमेदवारांनाच लज्जास्पद वाटलं पाहिजे. दिवसेंदिवस नोटावरचं मतदान वाढतंय, याचं चिंतन मतदारांनी नव्हे, तर उमेदवारांनी- पक्षांनी केलं पाहिजे.

रियल रियल

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 14/05/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या.... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत ओहो....ते काय असते आणि? आठवण बिठवण वेड्यांचा बाजार... एक कॉल मारायचा नाहीतर मेसेज धाडायचा बात करनेका मामला खतम. मनात आठवण, झुरणे बिरणे अरेरे, हाताबाहेरच्या केसेस... डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल एवढेच काय ते रियल रियल बाकी जग तो मृगजल मृगजल... मीराबाई मीराबाई, तो तुम्हाला उन्हात भासे.... राधाबाई राधाबाई, तो तुम्हाला जलात दिसे.... भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम नुसते नुसते भ्रम.....

मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 14/05/2019 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात.

कर्मसिद्धांत , आस्तिक आणि नास्तिक

लेखक nishapari यांनी मंगळवार, 14/05/2019 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
आस्तिक विरुद्ध नास्तिक , देव आहे किंवा नाही ह्याबाबत वेगवेगळी मतं मांडणारा वाद मिपाला नवीन नाही . कर्म सिद्धांतावरही 2 - 4 फार सुरेख चर्चा असलेले जुने धागे या साईटवर मिळाले . माझ्यामते निदान सुशिक्षित लोक तरी देव आहे का नाही , कर्मसिद्धांत - चांगल्यावाईट कर्मांची फळं मनुष्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावी लागतात , मुळात पुनर्जन्म असतो का नसतो , स्वर्ग नरक नावाच्या गोष्टी खरोखरच असतील का , मृत्यूनंतर काय प्रोसेस असते , पुनर्जन्म असेल तर तिथे आपल्या मत - इच्छेला काही महत्व असतं का की जिथे पाठवतील तिथे मुकाट्याने जावं लागतं यापैकी थोडे तरी विचार कधी ना कधी स्वतःशी करत असावेत .

भयकाल

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 11/05/2019 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू एकेक करत हरवत चालले आहे... ज्याच्याकडे पहात पहात आम्ही आमचे मार्ग शोधायचो तो ताराच आकाशातून नाहीसा झाला आहे आणि तो एकुलता एक चंद्रही... ज्याची स्वप्नं बघत बघत आम्ही निश्चिंत झोपी जायचो... नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी खिडकीतून पहात राहतो आणि मनातल्या मनात चरकतो उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर! आज सकाळी डोळे उघडले तर ते समोरचे हिरवेकंच झाड कुठेच दिसत नव्हते ना ही कुठला पक्षी या पृथ्वीवरून हळूहळू एकेक गोष्टी हरवत चालल्याचे दिसत आहे जो मुलगा मोकळ्या मैदानात खेळायचा तो ही आज कुठे दिसत नाहीये, की त्या मुलाबरोबरच ते खुले मैदानही गायब झाले असेल.... गोष्टी नाहीशा होणे ही सरत्या
काव्यरस

96 - प्रेमाचा धवलगिरी

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 08/05/2019 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.

कोणीतरी बाजूला सरकले असेल......

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 04/05/2019 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.