मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

पाणी आंदोलन

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे या लेखात सटाणा शहराचा विचार केला असला तरी सर्वदूरच्या (महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र) वाचकांनी सटाणा हे शहर उदाहरणार्थ म्हणून समजावं. ज्यांनी दूरदृष्टीने जल व्यवस्थापन केलं नाही अशा सर्व गाव- शहरांत कमी अधिक प्रमाणात या वर्षी पाणी टंचाईची अशीच भीषण अवस्था आहे : सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस- चाळीस वर्षांपासून तसाच टांगणीला पडला आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्प्रतचारासारखं सटाण्याचं झालं आहे. पाणी टंचाई झाली की बोलायचं. नदीला आवर्तन सुटलं की आपल्यापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असं वागायचं. जमिनीत बोरवेल करून जो तो आपापला पाणी प्रश्न सोडवू पाहतो.

मरणाचं अर्थशास्त्र

अबोलघेवडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारा फूट ओव्हर ब्रिज कोसळला. काही माणसं मेली. कसंही मरण येऊ शकतं आपल्या देशात. कोणी उघड्या गटारात पडून मरतं, कोणी रस्त्यावरच्या सुट्या विजेच्या तारेला धक्का लागून मरतं, कोणी झाड पडून मरतं. कोणी भिंत पडून मरतं तर कोणी इमारत कोसळून मरतं. कोणी सरकारी दवाखान्यात योग्य उपचार न मिळाल्याने मरतं तर कोणी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून मरतं. कुठेना कुठेतरी या सगळ्याची मुळं भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेत आणि मानसिकतेत असतात. आपण तरी धुतल्या तांदळासारखे पवित्र कुठे असतो? काही जणं 70% भ्रष्ट असतील तर कदाचित आपण 30% च असू.

Women 's Day - 2019

माउ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळीनो ! काल ' जागतिक महिला दिन' (International Women 's Day ) झाला. सगळ्या महिलांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. ज्या working आहेत, त्यांनी छान Day Out त्यांचा enjoy केला. बऱ्याच पुरुषांनी त्यांच्या मुलीना,आई ला, बायकोला, मैत्रिणी ना, girlfriend ला वेगवेगळ्या पद्धतीने wish केले. Such a kind gesture! परत Men - Women Equality, women and their rights ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाल्या ofcourse on different platforms .. मी स्वतः एक स्त्री आहे पण मुळात मला ह्या Women 's Day celebration वर थोडासा आक्षेप आहे.

मानवतेचे शत्रू

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे आज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद! एखाद्या देशाने समोरून हल्ला केला तर त्याला तशाच कृतीने उत्तर देता येतं. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं. पण दहशतवादाचं स्वरूप वेगळं असतं. दहशतवादी कपटाने हल्ला करत असल्यामुळे संखेने कमी असूनही ते खूप मोठं नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनाही लक्ष्य केलं जातं. एक दहशतवादी शेकडो बेसावध निशस्त्र लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला अजून जागतिक दहशतवादाचं स्वरूप समूळ कळलं नाही, हे अनेक घटनांमधून लक्षात येतं. मानवतेचे शत्रू आपल्या उंबरठ्यावर उभे आहेत.

स्वतःसाठी जगू नका

नायकुडे महेश ·
लेखनविषय:
मातीसाठी प्राण वेचतो आम्ही जातीसाठी लढू नका । तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।। कितीही येवो वादळे मोठी आम्ही त्यांना घाबरत नाही, आपलेच खेचतात आपले पाय ते आम्हाला पाहवत नाही, तुमच्यासाठी लढतो आम्ही कुणापुढे झुकू नका। तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।। हसत असें तेव्हासुद्धा जेव्हा मरण समोर येईल, भ्याड हल्ले करणाऱ्यांच्या यम होऊन समोर येईन, मेल्यानंतर आमच्या देहाचे राजकारण करू नका । तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।।

पशु पक्षांसाठी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांनी केला नैसर्गिक अधिवासात कृत्रिम पाणवठा

नानुअण्णा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या काही दिवसांपासून मी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी जात आहे. खालील माहिती त्यांनी व्हाट्स अप वरती पाठवलेली आहे, अनेक वर्ष ते पशु पक्षांसाठी तसेच निसर्ग संरक्षण याबद्दल जनजागृती आहेत. सध्या होत असलेल्या हवामान बदलामुळे ऋतुबदल होत आहेत, त्याचा परिणाम पशु पक्षी यांच्या जीवनावर सुद्धा पडत आहे, तीव्र उन्ह्याळ्यात व पाणी टंचाईत, पशु पक्षी यांना पिण्यास पाणी नैसर्गिक अधिवासाप्रमाणे मिळावे यासाठी ते कार्य करीत आहेत.

ते दोघे

शिव कन्या ·
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने....

सत्य धर्म ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने... काल 14 फेब्रुवारीला काश्मीर मध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या सर्व वीर सुपुत्रांना त्रिवार सलाम. या हल्ल्याला येणाऱ्या काळात आपली तिने सैन्यदले कृतीतून योग्य उत्तर देतीलच हे सर्व चालू घडामोडी वरून सांगता येते. या हिंदुस्तानचा एक सजग आणि जबाबदार हिंदू नागरिक म्हणून माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या भ्याड हल्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी या पुढे वाचू नका. आपल्या अखंड हिंदुस्थानावर परक्यांचे हल्ले होने ही तशी नवीन बाब नाही.

दिवस तुझे ते ऐकायचे....

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.

बजेट ( आपलेही )

असहकार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बजेट ( आपलेही ) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या आधी दोनेक महिन्यापासून देशभरात एका गोष्टीची चर्चा सुरू झालेली असते. ती म्हणजे यावर्षीचे बजेट काय असणार, कसे असणार? कोणत्या सवलती असतील, आयकर कितीने कमी होईल? कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, कशाच्या वाढतील? बजेटचा शेअरबाजारावर काय परिणाम होईल? वर्तमानपत्रापासून ते टीवीचॅनेल्सच्या चर्चांपर्यंत सगळीकडे एकच एक शब्द ऐकू येतो. बजेट. बजेट. बजेट. तर हा बजेट शब्द नेमका आहे तरी काय याचा फार थोडे लोक मागोवा घेतात. सरकारने सादर करायचा हिशोब, नवे कर लावायची घोषणा, की जमाखर्च मांडण्याची तयारी?