Skip to main content

समाज

शोध स्वत्वाचा

लेखक आतिवास यांनी शनिवार, 07/12/2013 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
१९६७ ची गोष्ट. एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार. मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत. लग्न होतं. पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं. पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी. कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही. कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ... तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.

डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 06/12/2013 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे.

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

लेखक सचीन यांनी शुक्रवार, 06/12/2013 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारताच्या रत्नास त्रिवार अभिवादन.भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे.

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 03/12/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.

जे न देखे आम्ही...

लेखक हैयो हैयैयो यांनी मंगळवार, 03/12/2013 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
div { text-align:justify; text-justify:inter-word; }
काही वर्षांपूर्वी आम्ही एका कॉर्पोरेट कार्यालयात काही कार्यकाजाच्या निमित्ताने गेलो होतो. "कार्यकाजाच्या निमित्ताने" हे शब्दोपयोजन येथे दोन अर्थांनी आहे. एक तर आम्ही त्यांच्यासाठी काही कार्य करणार होतो आणि दुसरे म्हणजे त्या बदल्यात ती लोकं आमची काही कार्ये करणार होती. त्या संबंधात आमचे त्यांच्याकरिता करावयाचे कार्य तसे "दुय्यम" होते. म्हणजे, त्या लोकांचे कार्यकाज आम्हांस पटले, भावले, आणि मुख्यत: त्यांची कार्यपद्धती आम्हांस तृप्तीकर झाली, तर शेवटी त्यांस आम्ही आमच्या एक प्रकल्पावर घेणार होतो.

नवविवाहितेचे आईस पत्र ........

लेखक युगन्धरा@मिसलपाव यांनी सोमवार, 02/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत. मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे.

एक आकांत : गाणार्‍याचे पोर

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 01/12/2013 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
एका पेक्षा अनेक लग्न, बहुपत्नीत्व ह्याला उघड मान्यता नसली तरी त्यात फार वावगे नं मानणार्‍या पिढीतील पुढच्या पिढीतील एक तरुण...आपल्या अंगातील असामान्य कलागुणाची नुकतीच ओळख होऊ लागलेली...अत्यंत लहान वयात कमालीचे खडतर दिवस काढून, १२ गावचे पाणी पिऊन आलेली अकाली समज... त्यात स्वतःच्याच मामे बहिणीशी लग्न...

पॅरलल पार्किंग

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 30/11/2013 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो. पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं. मी, मला कळलेलं पॅरलल पार्किंग इथे तुम्हाला सांगावं म्हणतो..