Skip to main content

समाज

कुणी घडवून आणले 'महाभारत'?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 26/12/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदनकेतु उवाच: श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीतून मुक्त केलेल्या स्त्रियांना द्वारकेपर्यंत सुखरूप घेऊन जाण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे मी देवलोकाचा कायमचा निवासी झालो. मला फिरण्याची फार आवड, त्यामुळे मी नित्य नवनवीन जागी फिरत असतो. नारदमुनिंनी मला दिलेल्या ‘गगनगामी परिभ्रमण सूचना’ यंत्राचा मला फार उपयोग होतो. (याला भूतलावर ‘जीपीएस’ असे म्हणतात, म्हणे). एकदा फिरताना एका घरातून मला मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. खिडकीतून डोकावून बघतो, तो आत दोन किरीटधारी द्यूताचा पट मांडून बसलेले दिसले.

द बॉक्सिंग डे बॅटल

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 24/12/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
रोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना? नाही... अमेरिकन्स सारखं "रोमॅन्स" नका म्हणू.... रोमान्स! अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्‍या स्मितहास्यातला रोमान्स! ह्या वेळी बरेच वर्षांनंतर पुण्यात सलग बरेच दिवस गुलाबी म्हणावी तशी थंडी पडलीये. (८ - ९ डिग्री म्हणजे पुण्यासाठी गुलाबीच!). आणि ते ही ऐन डिसेंबरात !

चीनला हवीत मुले

लेखक अमित खोजे यांनी शुक्रवार, 20/12/2013 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीपासून आपल्या देशातली घाण आणि भ्रष्टाचार याला आपली लोकसंख्या जबाबदार आहे हा विचार माझ्या डोक्यात अगदी पक्का बसला होता. नेहमी मला वाटायचे कि अमेरिकेत असते तशी स्वच्छता, टापटीपपणा, कमी भ्रष्टाचार, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी हे सर्व आपल्याकडे का नाही तर जनसंख्या. एवढी लोकं असताना कुणाकुणाला आणि कधी शिस्त लावणार? त्यामुळे आपल्या देशात जर चीन सारखी "हम दो हमारा एक" अशी योजना जर केली तर किती बरे होईल!

फुकुशिमानो तोत्तोचान

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 15/12/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं तसं उमटतं तिच्या गोबर्या गालावर हसू फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही काय होणार पुढे तिला विचार करवत नाही गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही ओजिइसान
काव्यरस

चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 10/12/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत. “वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी!

'आणि मिळवा एक चित्र' चा निकाल

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 09/12/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः http://www.misalpav.com/node/26057 निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व. आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे: वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले. वल्ली यांनी तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राज्ये, भूगोल इ.

ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक - श्री. विनय आपटे यांचे मुंबईत दु:खद निधन*~*~*~*

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 07/12/2013 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
रंगभूमीवरील, नाट्य-सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार- दिग्दर्शक- "विनयजी आपटे" यांचे अन्धेरी येथील अंबानी हॉस्पिटल'मध्ये दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले... खरोखर या हरहुन्नरी अभिनेत्याचे असे 'जाणे' चटका लावून गेले. *~*~*~*~*~*~* भावपूर्ण श्रद्धांजली...*~*~*~*~*~*~*

एका संस्थेची पन्नास वर्षे...

लेखक खेडूत यांनी शनिवार, 07/12/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
. तसे एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होणे आता विशेष वाटत नाही. अनेक संस्थांनी शंभर किंवा दीडशे वर्षे पूर्ण केल्याचे आपण वाचत असतो. इतकेच काय आता आयटी कंपन्या पण रौप्य महोत्सव करू लागल्यात. पण हा कालखंड खरे तर सापेक्ष असतो. कुठल्या परिस्थितीत ती संस्था सुरु झाली, कशी चालविली आणि आता कशी आहे, यावर बरेच अवलंबून असावे. आमचे पहिले-वहिले महाविद्यालय म्हणजे लातूरचे शासकीय तंत्रनिकेतन. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन (पी. एल. जी.

शोध स्वत्वाचा

लेखक आतिवास यांनी शनिवार, 07/12/2013 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
१९६७ ची गोष्ट. एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार. मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत. लग्न होतं. पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं. पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी. कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही. कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ... तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.