Skip to main content

समाज

चारचा चहा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 14/10/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

क्रूड ऑईल...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 13/10/2015 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव आता जाई चरावयासी mess वरं हा जीव रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त!

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ६ औलीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 13/10/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

आपण अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नासिक, जळगाव जिल्ह्याचे आहात ? अहमदनगरयेथे 'विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन'चे आमंत्रण प्रस्तावासाठी अनुमोदन हवे आहे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 12/10/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियाचा लेखक आणि वाचक वर्ग संबंध महाराष्ट्रात तसेच महानगरांपलिकडे उर्वरीत भारतात पसरलेला आहे परंतु संघटनात्मक आयोजने सहसा केवळ महानगरांपुरती मर्यादीत रहातात. विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी भारतातील शहरांकडून प्रस्ताव मागितले गेले आहेत आणि महानगरांची काँपीटीशन असेल परंतु विकिमिडीया चळवळीचा मुख्य हेतु सर्वत्र पोहोचण्याचा आहे या दृष्टीने अहमदनगर येथील अनुभवी विकिपीडियन्सना विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी प्रयत्न करण्याचे आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील पुण्यासहीत औरंगाबाद, नासिक, जळगाव या शहरांपासून साडेतीन चार तासांच्या अंतरावर तसे मध्यवर्ती पडते.

त्यानंतर असे झाले असेल तर...(प्रसंग १)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 11/10/2015 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गर्दीच्या ठिकाणी कशामुळे कुणाचा पारा चढेल याचा भरवसा देता येत नाही. माझ्यासोबत किंवा माझ्या समोर घडलेले काही प्रसंग मी सांगतो तुम्हाला. एक प्रसंग याच ऑक्टोबर महिन्यात घडलेला. पुण्यात विमान नगर मार्गे एयर पोर्ट रोडने कल्याणीनगरला कॅब मध्ये जातांना सिम्बियोसिस च्या थोडे पुढे एका चौकात अभूतपूर्व ट्राफिक जाम झाला होता. चालकाच्या समोर असलेल्या काचेतून समोर दिसलेल्या प्रसंगाचं मला जे आकलन झालं त्यानुसार मी हे लिहित आहे. कदाचीत त्या प्रसंगाला अजून दुसरी तिसरी बाजू असू शकेल ती मला माहिती नाही. असो. ...तर समोरच्या चौकात अभूतपूर्व ट्राफिक जाम झाला होता.

छि _ _

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 10/10/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं.

स्वराज्य

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझे विचार.. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " असे लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले आणि 1949 साली आपल्याला स्वातंत्र मिळाले, पण आज खरचं आपल्याला स्वातंत्र मिळाले आहे का? खरचं आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ माहीत आहे का? या स्वातंत्र्याने काय दिले हे माहीत आहे का ?        संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेत ते तरी माहीत आहे का?  हां FC च्या टीचर सांगतात म्हणून आपल्याला काहीही बोलण्याचा ,आपले मत मांडण्याचा अधिकार आहे हे माहित आहे.      पण बोलणं म्हणजे नक्की काय? मत कधी व कुठे  मांडावे ?