Skip to main content

मुक्तक

कागदाचे झाड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

चितळेंपेक्षाही जास्त माजोरडे दुकान!

लेखक mayu4u यांनी मंगळवार, 17/10/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कालपर्यंत मी सुद्धा अशी काही कल्पना केली नव्हती... पण सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असते, याचा फर्स्ट ह्यांड अनुभव घेतला मी! =============================================================================== कार्यालयीन कामानिमित्त गेल्या आठवड्यात बंगलोरास आलेलो, आणि वीकेंड मैसुरच्या कार्यालयात घालवून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच घरवापसी करणार होतो. हा मैसुर म्हणजे महिषासुराचा धाकटा भाऊ आणि बकासुराचा चुलत भाऊ असावा असं उगीच वाटत रहातं. असो. तर, दिवाळीच्या आधीच्या वीकांताला मी घरात नसल्याने सौ तुफान चिडलेली...

नशिब

लेखक mr.pandit यांनी मंगळवार, 17/10/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबाच काय घेऊन बसलात हो ते कधी साथ देत तर कधी नाही मनगटात ताकद हवी खर तर नाहितर् राजयोग पण कामाचा नाही परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता हिच सवय मग अंगवळणी पडत जाते अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी? आता आळस झटका आणि लागा कामाला आयतं बसुन कधी मिळतय का कुणाला परिश्रम केल्याशिवाय यश मिळायच नाही नशिब अस सहजासहजी बदलायच नाही. - निखिल १७-१०-१७

फुतूर (खूळ)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 16/10/2017 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
फुतूर दिमाग के कभी खत्म नही होते . दुधिया कोहरे मे लिपटकर जब रात आये तो उस कोहरे मे तुम्हारा चेहरा बुझते हुए टिमटिमाते बिजली के बल्ब कि तरह नजर आने लगता है, धुंदलासा दिमाग उस तस्विर को आपही मुकम्मल कर लेता है क्या ये फुतूर है, या तुम भी मुझे याद कर रही हो? . फुतूर दिमाग के कभी खत्म नही होते . वक्त की सुई मुसलसल भागती रहती है और ये दिमाग है के तेरे दाये गाल के उस टिप्पेके भवरे में अटका पडा है जिसमे पुरी कायनात घुमती रहती है . फुतूर दिमाग के कभी खत्म नही होते . वैसे तो तुझसे दूर रहकर खुश नही रह पाता मगर जब तेरे शहद रंग चहरे पे खिली कमसिन हसी ये दिमाग अपनी पोटली से निकालकर नजर मे भर देता है, बिन

मुंबईकर . . . . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/09/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ? अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? भिजला असतास पावसात तर सुकवता आलं असतं स्वतःला . .

तिन्ही सांजा.....

लेखक रुस्तुम यांनी शुक्रवार, 29/09/2017 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी हृदयगंधर्व हे पुस्तक वाचताना त्यातील स्वरोत्सव ह्या डॉक्टर लीना आगाशे ह्यांच्या लेखात, पंडितजींच्या एका वाक्याचा संदर्भ येतो, की त्यांना तिन्हीसांजा हे गाणं करताना त्यांना यमन राग पिवळसर रंगासारखा दिसू लागला होता. प्रत्येक राग हा कुठल्याही रंगात, कुठल्यातरी विशिष्ट रूपात त्यांना दिसतो. त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय. 'तिन्हीसांज ही माझी आवडती कविता आहे. आता त्या कवितेबरोबरच एक चित्र हि माझ्या मनात वास्तव्याला आलं. दिवस ढळलेला असावा. दूर क्षितिजावर संध्यकाळ मावळात असावी.

हरिहरि...

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 26/09/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दाचे वजन झाले मासातोळे कण्याचेही आता करतो वेटोळे व्हायचा गजर उंचावता हात कुठे गेली आता सगळ्यांची साथ केव्हाच फेकला भिकेचा कटोरा उरलासे आता फुकाचाच तोरा वाट जरा थोडी पाहिलेली बरी नाहीतर आता करू हरी हरी

मन

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 26/09/2017 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मन विचाराचे घर मन कृतीचे आगर मन अथांग सागर मन मधुर साखर मन आभाळीचा रंग मन आत्मरंगी दंग मन देहाचा आरसा मन मायेचा वारसा मन चंचल चंचल मन कधी अविचल मन मोकाट मोकाट मन कधीचे मुकाट मन धावे सैरावैरा मन माळावरला वारा मन गरीब पामर मन कधी अनावर मन वेडेही भासते मन मनात हासते...

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

गहन हे मर्म दु:खाचे

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 22/09/2017 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
गहन हे मर्म दु:खाचे उमजणे कठिण किती असते साचले युगांचे अवघे निमिषात अश्रुरूप घेते उफराटे गणित विषाचे समजणे कठिण किती असते मरण्यास पुरे इवलेसे जगण्यास कितीही कमी पडते शब्दांच्या निबिड अरण्यी बहरणे कठिण किती असते अमरत्व उमलण्या आधी का मरण विकटसे हसते
काव्यरस