Skip to main content

मुक्तक

चंद्रमण्यांचे पाझर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 15/11/2017 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल
काव्यरस

गूढ अंधारातील जग -२

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 14/11/2017 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -२ मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ. युद्धाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या शत्रूचे आर्थिक शारीरिक /सामरिक आणि मानसिक खच्चीकरण करणे. जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही(साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद (शत्रूला एकटा पाडणे) हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत. यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो.

प्रतिभेचे देणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/11/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती ठिणगी होऊन येते अन वणवा होऊन छळते ती लकेर लवचिक होते अन गाण्यातून रुणझुणते ती कधी निखारा होते विझुनी मग होते राख उमलविते त्यातून फूल मग तिचीच फुंकर एक ती उल्केसम कोसळते उखडून दिशांचे कोन धगधगत्या चित्रखुणांची ती लिहिते भाषा नविन जे तरल नि अक्षर ते ते, जे अथांग, अदम्य ते ते, जे दूर असूनही भिडते, जे जटिल तरी जाणवते, ते तिचेच देणे असते…. …..किती घ्यावे? तरीही उरते !
काव्यरस

गूढ अंधारातील जग

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 12/11/2017 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग आपण कधी खिडकीच नसलेल्या कार्यालयात काम केलं आहे का? महिनोंमहिने सूर्यप्रकाश , चंद्रप्रकाश, उघडे आभाळ पाहिलेले नाही. तीन तीन महिने २४ तास त्याच त्याच माणसांचा चेहरा पहिला आहे का? तीन महिने सलग बिन अंघोळीचे राहिला आहात काय ? आणि वापरलॆले कपडे न धुता टाकून दिले आहेत का? डिस्पोझेबल डायपर नव्हे तीन महिन्यात केस कापता आले नाहीत म्हणून एखाद्या गोसाव्यासारखे वाढू दिले आहेत का?

डिश टीव्ही व ग्राहक मंच चा अनुभव

लेखक अलबेला सजन यांनी सोमवार, 06/11/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. मी डिश टीव्ही चा गेले ३ वर्ष ग्राहक आहे. इतके दिवस त्यांची सेवा सुरळीत चालू होती. मात्र १८.१०.२०१७ रोजी मला एक विचित्र अनुभव डिश टीव्ही कडून मिळाला त्याबद्दलचे हे अनुभवकथन. दि. १८.१०.२०१७ रोजी मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे झी मराठी वरील कार्यक्रम बघत होतो. ८.१० मिनिटांनी अचानक माझ्या टीव्ही वरील प्रसारण बंद झाले व तेथे “तुमचा balance संपला आहे, रिचार्ज करा” असा मेसेज झळकू लागला. मला काही समजेना कारण माझ्या खात्याला पुढचे ६ महिने पुरेल इतका रिचार्ज मी करून ठेवला होता. मग नेहमी प्रमाणे एकदा टीव्ही व डिश बंद करून चालू करून पहिले पण तोच मेसेज दिसत होता.

अश्वत्थामा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 06/11/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या एका खोलवर अंधार्‍या कप्प्यामधे कुठेतरी दडपून टाकलेली तूझी आठवण,.... कधीतरी उफाळून बाहेर येतेच अचानक, मला नकळत...... आणि मग कोरड्या पडलेल्या जखमा परत भळभळू लागतात मनावर मोठा दगड ठेवून तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र इतक्या वर्षां नंतरही....

नेणिवेला जाणिवेने छेदता...

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 05/11/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे? या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा? ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता
काव्यरस

एक्सपायरी डेट.

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 31/10/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
रेशमी साड्यांच्या बासनात मोरपिशी साडीच्या घडीत अलगद ठेवलेलं, ते पत्र.. तिथून बाहेर नाही काढत कधी हलकेच चाचपडते अधूनमधून त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे... त्यातला शब्दंशब्द पाठ आहे लिहून खोडलेला , पाण्याने पुसटलेला... किती मिनतवा-या. हट्ट, रुसवे फुगवे काय अन् काय हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी.. आपल्यामधे जे काही होतं नव्हतं, (नव्हतं तेच जास्त खरंतर) ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र... तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव (ते तेव्हांही खटकलेलं थोडं) एका अधमु-या नात्याची एकमेव खूण.. का कोण जाणे पण आज अचानक वाटलं, हर रिश्ते की एक उमर होती है तशी, पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?

उजाडताना उल्कांचे व्रण

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/10/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले
काव्यरस

तो.. एक शुद्ध-घन-घट्ट गोळा !!

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/10/2017 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
"श्रीयुत जोशी श्रेष्ठी आहेत का निवासात?", जरा पुरुषी पण नाजूक आवाजात त्याने विचारले. "कोण?", मी विचारले. "मी सुरेश, तसा आपला परिचय नाही. मी श्रीयुत जोशी श्रेष्ठींसोबत एकाच कार्यालयात कार्य करतो." "अच्छा..या ना आतमध्ये." "श्रीयुत जोशी श्रेष्ठी नाहीयेत का निवासात?" "नाही..जोशी साहेब बाहेर गेले आहेत", स्वयंपाकघरातून बाहेर येत माझी काकू म्हणाली. "रात्रप्रहरी शतपावली करण्यास निर्गमन केले का त्यांनी?" "नाही हो..जरा कामासाठी बाहेर गेले. तुमचं काही काम होतं का?" "हो ना..हरकत नाही..तसं कार्यालयीनच होतं.