Skip to main content

मुक्तक

तो माणूस भणंग होता

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 03/01/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
निराधार माझे स्वत्व बुडवताना पाण्यातून उठला तो 'माझा'च तरंग होता . चित्रातला मी अर्थ शोधताना मज सापडला जो रंग तवंग होता . आरश्यात आपुला भाव पाहताना परि दिसला मज तो मनुष्य कबंध होता . पळभर मनी जगलो लाख मरताना जन म्हणतील तो माणूस भणंग होता
Taxonomy upgrade extras

शेवटच स्टेशन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 03/01/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे गाडित खचाखच गर्दी होति.जिव गुदमरला होता.. एकदाची सुटली...१-२ स्टेशन वर थांबली.. काहि आत आले काहि बाहेर गेले...एका मुलान बसायला जागा दिली... आरामात बसलो,गाडिन वेग घेतला.गाडी लयात धावत होति.. खिडकीतुन गार वारा येत होता...कधि डोळा लागला कळाले नाहि..१ स्वप्न कि काय कळेना..एक घर दिसल,माझच होत.. बरेच लोक जमले होते,मित्र होते ,नातेवाइक होते. आत गेलो तर, हि कोप~यात रडत बसली दिसलेली,बायकांच्या घोळक्यात. काय प्रकार कळेना,जमीनिवर कुणीतरी झोपले होते.. नाका कानांत कापसाचे बोळे,अंग पांढ~या कपड्यान झाकलेल... त्यावर हार, गुलाल,जवळ जावुन पाहिल अन,हबकलोच तो मीच होतो..खाडकन जागा झालो..पाहिल तर गाडी थांबल

एक लेख

लेखक गोगोल यांनी गुरुवार, 01/01/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
दूसर्यान्च्या ब्लॉग मधील लेख प्रसिद्ध करण्याबाबतीत काय नियम आहेत हे माहित नाही, पण हा लेख मला खुपच आवड़ला म्हणून खाली दुवा देत आहे. नियम भंग होत असाल्यास कृपया कळवावे, मी हा धागा उड्वुन टाकिन. http://shabd-pat.blogspot.com/2008/12/blog-post_3917.html

विसंगतींचे संदर्भ...!

लेखक झेल्या यांनी सोमवार, 29/12/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
कळून इतके काय कळे हे नकळे मजला का न कळे ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! भास भाबडे रंग रूप हे भास भावना भास चेतना, भास सत्य अन भास भासही भास असे सगळे सगळे... ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! समजून घेतो आपण आपले सगळे आपल्यासाठी इथे.. आपण कोण नि कोण दुजे हे परंतु येथे कोणा न कळे.. ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! भूल दिशा अन दिवस निशा हे पोकळ जडता स्थिर चल हे.. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन व्यक्ताशी अव्यक्त जुळे.... ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! -झ
Taxonomy upgrade extras

वैधानीक इशारा.

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/12/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
या वाटेवर इथून पुढे जरा जपून. तरबेज प्रेमी पण हलकेच पाउल टाकतात. दिवसाउजेडी. रापलेले भोई पण घाबरतात पालखी वहायला या वाटेवर. ती, फुलदाणी तो चंद्र ती शिशी ग्राईप वॉटरची. ते तांबडे तावदान तो आयना ती काकणं ते सगळं काही जे फुटतं लाखो बधीर तुकड्यात. विकीरान्नासारखं. ते डंख करेल टाचेखाली. हलकेच. साप्ताहीक भविष्यासारखं. सहज.निर्धोक. वरवर चाळता. चालता ? जरा जपून अपूर्ण कवितांचा असह्य ठणका पहाटेसच जोर धरतो.
Taxonomy upgrade extras

अंड्याची टरफले आणि बुटाची लेस

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/12/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.

काय वाट्टेल ते....!

लेखक झेल्या यांनी मंगळवार, 23/12/2008 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
रेसेशन...? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याकडे रेसेशन वर एकदम जालिम उपाय आहे. रामबाण. काय करायचं, एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचा. आता तुम्ही म्हणाल याने काय होईल! तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सोडलात की तुमचं मन स्थिरावेल. मन स्थिरावलं की संसद का सत्सद काय म्हणतात ती विवेकबुद्धी जागॄत होइल. ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल.

छायाचित्र टीका

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 20/12/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
nikko निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.

आपलेच दात, आपलेच ओठ!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 20/12/2008 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपलेच दात, आपलेच ओठ! ---------- मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांचा तणाव सुरक्षा दलांबरोबरच सगळ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना जाणवत होता. सुमारे तीन आठवडे हा तणाव घेऊन वावरणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. देशावरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता. काहींनी त्याची गणना 11 सप्टेंबरच्या अमेरिकेवरील हल्ल्याशीही केली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानी दहशतवादाविरोधात या वेळी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले होते. पाकिस्तानचा निषेध एकमुखाने केला होता आणि कठोर पावले उचलण्याची मागणीही करत होते. एवढे दिवस हा तणाव सगळ्यांनाच असह्य झाला होता...त्यातून सुटका प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत होती.