Skip to main content

मुक्तक

आकाशवाणी

लेखक सुबक ठेंगणी यांनी शनिवार, 05/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियाची 'जखम' आणि मग ब्रिटिशची 'दगड' वाचून जे सुचलं ते. ह्या कवितेचा रस खरं "गंभीर" आहे असं मला वाटतं.पण तसा ऑप्शनच नव्हता! इथे मला देव म्हणजे (असेलच तर) खरा खरा देव असं अभिप्रेत आहे. मिपावरील सभासद नाही.
काव्यरस

इश्वर .....

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 03/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
...इश्वर हा पुस्तकातला.. धर्मग्रंथांतून वर्णन केलेला.. संतमहात्म्यांनी.., महान त्तत्ववेत्यांनी.. ज्याची ग्वाही दिलेली आहे असा.. इश्वर नावाचा शब्द आहे...! इश्वर नव्हे...!! आता त्याच्या अस्तित्वाचे यांनी दिलेले दाखले आपण खरे मानून चालणार असू.. तर मग प्रश्नच संपला.....!!!

लढा

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 31/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी. हे एकदम लक्षात आले अन विचार आला, गेल्या सत्तावन्न वर्षांत या विमुक्त आणि भटके लोकांच्या आयुष्यात कितपत फरक पडलाय? या प्रश्नाला पहिले उत्तर होते अजिबात नाही. पण विषय जसजसा डोक्यात घोळत राहिला तसतसे मी पाहिलेले अनेक भटके विमुक्त लोक डोळ्यासमोर तरळले.

थोडी जाणीव हवी...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 31/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ट्राफिक सिग्नलवर एक मुलगा भीक मागायला येतो... आळशी आहेत... ह्यांना भीक मागायची सवय लागलीयं असं आम्ही म्हणतो... खीशातून २ रुपये काढून त्याच्या हातावर टेकवतो... आज फार उपकार केले ह्या अविर्भावात मग आम्ही मिरवतो... खरंच ते आळशी आहेत का? हे आम्ही पडताळत नाही... आणि पडताळणार तरी कसे?...

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

गणपतीची सजावट !! (छायाचित्रासह)

लेखक पाऊसवेडी यांनी मंगळवार, 25/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती दोन दिवसांवर आले होते आणि माझ्या घरी मात्र कसलीच तयारी झालेली नव्हती.आईनेही दहा वेळा सांगून झाले कि विकतच तरी मखर घेऊन ये म्हणून पण कोणाच आईएकेल तर काय :) (त्यातून आईचे ;) ) तसेही शनिवार असल्यामुळे मला सुट्टीच होती वेळ पण खूप होता मग मी ठरवले कि आपणच घरी तय्यार करूयात :? त्यात बहिणच कलाकार(commercial artist) असल्यामुळे ती दिवसभर हेच काम करायची ;) हे गेले दोन तीन वर्ष पाहिलेही होते त्यामुळे काही खास पुर्वाताय्यारी वगेरे करयची नव्हतीच कारण अनेक प्रकारचे रुंग आणि ब्रश घरीच होते म्हणून मग पक्का ठरवले .

कालाय तस्मै नम:?

लेखक चौफेर यांनी शुक्रवार, 21/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
वैताग आलाय साला या रूटीनचा! ऑफिसात मानेवर दगड ठेवून काम करावं लागतं अशातला भाग नाही. पण बराचसा वेळ खर्डेघाशीत जातो, एवढं नक्की. सकाळी दहापर्यंत आवरून जे ऑफिसात पोचायचं, ते तिथून सात-आठला बाहेर पडेपर्यंत इतर काही करण्याची फुरसत नसते. रात्री दमूनभागून घरी आल्यावर कुणाकडे जाण्याची किंवा कुणाला फोन करण्याची एनर्जी नसते. आल्यावर कुलवधू नाहीतर सारेगमप नाहीतर सच का सामना करावा लागतो. काही नाइलाजानं बघावे लागणारे, तर काही दुसरा टाइमपास नाही, किंवा छंद जडलाय म्हणून बघितले जाणारे कार्यक्रम. दिवसभराचं रूटीन हे असं. गावाला होतो, तेव्हा मजा होती. टीव्ही वगैरे भानगड नव्हती.

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ... ( कोणीतरी विचारत होता की मिपावर निकाल जाहीर झाले का म्हणुन तर त्याला हे उत्तर समजावे.

मी एक सिग्नल पिवळा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 17/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
न तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा कायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा तांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त स्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा कुणी पाळला , कुणी तोडला कुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा माझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही गर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा मला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही सगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा भारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला कशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा माझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही भावनांचा सागर आटलेला , मी एक स