लेखनप्रकार
वैताग आलाय साला या रूटीनचा!
ऑफिसात मानेवर दगड ठेवून काम करावं लागतं अशातला भाग नाही. पण बराचसा वेळ खर्डेघाशीत जातो, एवढं नक्की. सकाळी दहापर्यंत आवरून जे ऑफिसात पोचायचं, ते तिथून सात-आठला बाहेर पडेपर्यंत इतर काही करण्याची फुरसत नसते. रात्री दमूनभागून घरी आल्यावर कुणाकडे जाण्याची किंवा कुणाला फोन करण्याची एनर्जी नसते. आल्यावर कुलवधू नाहीतर सारेगमप नाहीतर सच का सामना करावा लागतो. काही नाइलाजानं बघावे लागणारे, तर काही दुसरा टाइमपास नाही, किंवा छंद जडलाय म्हणून बघितले जाणारे कार्यक्रम. दिवसभराचं रूटीन हे असं.
गावाला होतो, तेव्हा मजा होती. टीव्ही वगैरे भानगड नव्हती. संध्याकाळी कामंधामं उरकली, की गावातून मस्तपैकी रपेट असालची. कुणाच्या घरी पूजा असायची, कुणाकडे काही समारंभ. तिकडे चक्कर मारायची. रामाच्या देवळाची पायरी झिजवून यायची. रामाचं दर्शन घेणं हा उद्देश नसायचा, पण तिथे गेल्यावर सगळी माणसं भेटायची. मग पारावर बसून जरा वेळ गप्पा छाटायच्या. गावातली सगळी हालहवाल तिथे कळायची. कुणाच्या म्हशीला तीन पायांचं रेडकू झालं इथपासून ते गावात कोण नवीन मास्तर येणार आहे, सरपंचाला निवडणुकीत कशी धोबीपछाड मिळणार आहे, इथपर्यंतच्या सगळ्या इत्थंभूत बातम्या तिथे कळायच्या. काही पसरवल्या जायच्या. काही बातम्या तिथंच निर्माण व्हायच्या. मग तिथून आमच्यामार्फत अन्य गावात पोचायच्या.
रात्री देवळात भजन असायचं. नाहीतर कुणाकडे तरी पत्त्यांचा डाव रंगायचा. मग रात्री दोन-तीन वाजले, तरी शुद्ध नसायची. हुरड्याच्या काळात तर ही रंगत कित्येक पटींनी वाढायची. हुरडा खायला काळवेळ नसायची. विशेषतः रात्रीची पार्टी असेल, तर हुरड्याची चव आणखी रंगायची. मुख्य म्हणजे गावात आपुलकी होती, एकमेकांबद्दल आस्था होती. कधी कुठल्या कारणावरून भांडणं झाली, तरी संकटात मदतीला सगळे हात एकत्र यायचे.
शहरात आलो, नि सगळं बदललं. तरी सुरुवातीला चाळीत राहत होतो, तेव्हा बरं होतं. तिथेही आपुलकीचा अंश दिसायचा. दारं उघडी असायची. कुणाच्या घरात काही शिजलं, तरी अख्ख्या चाळीत सुगंध पसरायचा. मग पोरं-सोरं जमा व्हायची. हातावर काहीतरी प्रसाद पडायचाच. त्यावर समाधान मानून मग दुसऱ्या घराकडे वळायचं. आमचं वय आता जरासं मोठं होतं. त्यामुळे असं थेट कुणाच्या दारासमोर उभं राहण्यात भिडस्तपणा आड यायचा. मग आम्ही पोरांच्या माध्यमातून आपलाही वाटा काढून घ्यायचो.
मुख्य म्हणजे संध्याकाळ, रात्र आपली असायची. एकमेकांच्या सुख-दुःखाची मैफल रंगवायला कुणा सांगावं लागायचं नाही. चाळीतल्या कट्ट्यावर, नाहीतर बाजारात फिरताना आपसूक विषय निघायचा. चाळीतलंही गॉसिपिंग व्हायचं. एकमेकांच्या आयुष्यातल्या घटना-घडामोडींची देवाणघेवाण व्हायची. मोबाईल, एसएमएस नव्हते, तरी वेळच्या वेळी कुठेही जमून ट्रिपला नाहीतर सिनेमाला जाणं अगदी कुठल्याही अडथळ्याविना पार पडायचं. ठरल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी जमणं, हा दंडकच असायचा.
कुणा मित्राशी एखादी गोष्ट शेअर करावीशी वाटावी आणि तो महिनोन् महिने भेटूच नये, भेटला तरी आपल्यात त्याला इंटरेस्ट असू नये, हा काळ तोपर्यंत यायचा होता. आता मोबाईल आले, ईमेल्स आले, तरी माणूस मात्र माणसाला वेळ देईनासा झाला आहे. वर्षानुवर्षे शेजारी राहणाऱ्याच्या आयुष्यात काय घडतंय, याची खबर आपल्याला त्याचं काहीतरी बरं-वाईट झाल्यावरच कळते. आणि साता समुद्रापारच्या अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात मात्र ढवळाढवळ करण्याची हौस आपल्याला हवीहवीशी वाटू लागते. त्याची अधिक माहिती काढावीशी वाटू लागते. त्यानं दाखवलेली बेगडी सहानुभूती आणि आपुलकीचा मुलामाही सोन्यापेक्षा पिवळा वाटू लागतो.
मागे वळून पाहताना असं वाटतं, कुठे गेले ते शाळा-कॉलेजातले मित्र? काळाबरोबर सगळंच इतकं बदललं? कुणाला कुणाची दखलही घ्यावीशी वाटू नये, इतकं? अनेक फोन करूनही मित्राला साधं भेटण्यासाठी वेळ काढता येऊ नये इतकं? भेटल्यावरही मोबाईलचं नवं मॉडेल, वाढतं ट्रॅफिक-रोगराई आणि एसएमएसमधले जोक्स यापलीकडे बोलण्याचे विषय जाऊ नयेत, इतकं? महिनोन् महिने आपण आणि आपले कुटुंबीय, यांच्यापलीकडच्या जगाची गरजेव्यतिरिक्त दखलही घ्यावीशी वाटू नये, इतकं?
काय म्हणायचं या बदलाला?
कालाय तस्मै नमः?
मिसळपाव
अरारारा ...
चांगले
In reply to चांगले by रेवती
उत्तम प्रतिसाद
In reply to उत्तम प्रतिसाद by प्रकाश घाटपांडे
रेवतीताईच
In reply to रेवतीताईच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदि खरं अदिती
In reply to चांगले by रेवती
आपला लेख
कालाय तस्मै नमः?- नाही!
लेख आवडला ...
In reply to लेख आवडला ... by छोटा डॉन
सहमत
सार्थ शिर्षक.
डॉनशी सहमत
कालाय तस्मै नमः
पटलं.
आवडल
हे सगळं आधीही होतं, आताही आहे पण आता
मित्रहो,