Skip to main content

मुक्तक

कातर वेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 23/10/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- संध्याकाळची ती वेळ एकटाच खिडकीत उभा राहून नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे पहात उभा होतो कशी कोण जाणे पण तुझी आठवण त्या भरून आलेल्या ढगांबरोबर वाहत आली --- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- आभाळ इतकं भरलं ढगांनी इतकी दाटीवाटी केली की त्यांना आभाळ पुरेना कोणता ढग कोणत्या ढगात विलीन होतोय तेच कळेनास झालं आणि मग गडगडाटाने सारा आसमंत भरुन गेला या सगळ्या गोंधळात तो चंद्र दिसेनासा झाला अन् उगाच जीव कासाविस झाला ---- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- पाहता पाहता त्या ढगांना ओझं असह्य होऊन त्यांनी शरणागती पत्करली जश्या समुद्राच्या लाटां वर ल

सल...

लेखक राजेंद्र देवी यांनी रविवार, 23/10/2016 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
सल लाव धार माझ्या खंजिरी घेईन म्हणतो जरा ऊरी नाही सहन होत आता तुझ्या आठवणीची मुजोरी तुझी आठवण आहे काचरी दिवस रात्र मला जाचरी नको आता आयुष्याची शंभरी नको तुझ्या आठवणींची शिदोरी सांग तुला पण हेच का वाटते माझी आठवण डोळा दाटते बुडवून टाक अश्रूच्या सागरी आयुष्यातील एक सल बोचरी राजेंद्र देवी

वेग...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 22/10/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
वेग मरण एवढे सोपे झाले जगणे अवघड झाले आहे आता यम एकटा नाही जागोजागी त्याचे चेले आहे म्हातारे कोतारे मरती तरुण मरती रस्त्यावरती मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते लहानपणीच आयुष्य संपले आहे सारे ओढवून धेतलेस तू मानवा वेगाने तुला भारले आहे आपल्याच भाऊबंदास तू स्वतः मारले आहे राजेंद्र देवी

गावाकडच्या बोरी

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडे दरवर्षी पिकतात बोरी हिरवी पिवळी केशरी लाल बोरं मण्यांसारखी रत्नांसारखी फांद्यांवर झुलतात खाली मातीत, गवतकाट्यात, पाचोळ्यात पडून वाळतात काही बारकी काही माध्यम काही मोठी काही आंबट काही गोड पोरं बाया माणसं वेचून खातात घरी नेऊन वाळू घालतात पाखरं, प्राणी खातात लहानपणी मीही खूप खाल्ली ढुंगणावर फाटलेल्या चड्ड्या घातलेल्या गावातल्या मित्रांसोबत याच्यात्याच्या शेताततून हिंडून झाडाची तोडून, गवत-काट्यातून शोधून, वेचून कच्ची पिकली वाळलेली नुसती बोरेच खाल्ली नाही तर त्यांच्या बी मधलं इवलं इवलं मगजपण खाल्लं ती दगडाने फोडून !

जगलो आहे

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 21/10/2016 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगलो आहे मनसोक्त डुंबावेसे वाटले पण काठावरतीच जगलो आहे आख्खी भाकर तर सोडाच चतकोर वाट्यातच जगलो आहे नुसतेच पाहणे, वास कसला घेतो गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे गुरू त्यांचे प्रबळ होते राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे सुख एवढेच निखारे नव्हते गरम फुफाट्यात जगलो आहे राजेंद्र देवी

"दिल्याने " होत आहे रे ...

लेखक पाणक्या यांनी गुरुवार, 20/10/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
"प्लिज मला सोडतोस का रे ऑफिसला" आशु एकदम घाईघाईत म्हणाली. ठीक आहे म्हणून निघालो आम्ही बाईकवर. वाटेत गप्पा मारताना सांगत होती "काल कॅश एक्सेस लागली, कुण्या एका वयस्कर व्यक्तीची पेन्शन मोजून घेण्यात चूक झाली असावी, आज गेल्या गेल्या कॅमेरा चेक करून आणि त्यांना फोन करून पैसे परत करते त्यांचे". गाडी वाट काढत काढत कॅम्प पर्यंत आली तोच मागून एका रिक्षावाल्याने आवाज दिला, " ओ ताई तुमचा स्कार्फ पडलाय मागे तिकडे ". मी गाडी स्लो केली पण आशु म्हणाली प्लिज चल पुढे ... स्कार्फ मागे कुठे पडलाय काय माहिती ... वेळ जाईल अरे शोधण्यात". मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना.

पाचवी सावित्री

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 20/10/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात. पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात. एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.

समेट....

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 20/10/2016 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
समेट.... रम्य ती पहाट, शांत तो घाट, चंद्रभागेचा हलकासा खळखळाट गळा तुळसीमाळा, मुखी विलसतसे हास्य रम्य तो आरतीचा थाट गजबजला बघ हा चंद्रभागेचा घाट कीर्तनी दंग पाहा ते भाट युगानुयुगे उभा विठू माझा ताठ धन्य ती पाउलिची वीट आता कोठली वारी धरिली खाट बोलाव माउली कर आता समेट राजेंद्र देवी

थोडे अंतर...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 19/10/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे अंतर... असावे तुझ्यामाझ्यात थोडे अंतर ठेवील ओढ ते निरंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा अबोला संपेल तो मनवल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा गैरसमज पडेल उमज समजल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर राजेंद्र देवी

अपहार...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 18/10/2016 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
अपहार... तीर तुझा घुसला आरपार घाल तूच फुंकर हळुवारं झाले असतील घायाळ बहू मीच झालो तुझी शिकार झंकारल्या तारा हृदयिच्या सांग कसा देऊ नकार भ्रष्ट या दुनियेत झाला माझ्या हृदयिचा अपहार राजेंद्र देवी