Skip to main content

मुक्तक

तीन किस्से

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 26/12/2016 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन किस्से शनिवारी माझ्या दवाखान्यात जरा गर्दीच होती. त्यातीलच हे तीन किस्से. नावे काल्पनिक आहेत पण घटना सत्य आहेत. १)- एक ३६ वयाचा तरुण (रुपेश भोईर) आला होता. पोटदुखी साठी. सोनोग्राफी केल्यावर लक्षात आले कि बाहेर खाल्ल्यामुळे त्याचे पोट बिघडले होते आतड्याला सूज अली होती अन्न विषबाधा सारखा प्रकार. मी त्याला म्हणालो कि साहेब तुमचे बहुधा बाहेरच्या खाण्यामुळे किंवा बाहेरच्या पाण्यामुळे पोट बिघडले आहे. त्यावर रुपेश म्हणाला डॉक्टर आमच्या कंपनीचे कॅन्टीन चांगले नाही म्हणून मग रोज बाहेर खावे लागते. मी त्या विचारले कि मग तुम्ही घरचा डबा का घेऊन जात नाही.

आठवणी दाटतातः माझी मुंबई

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 25/12/2016 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } माझी मुंबई जगात कुठेही फिरायला गेलं तरी काही दिवसांनी मुंबईची आठवण यायला लागते..आद्य मुंबई बनली ती माहीम, परळ, माझगाव, वरळी, बॉम्बे कुलाबा आणि छोटा कुलबा या सात बेटांनी मिळून, मुंबादेवी या ग्रामदैवातावरूनमुंबईचं नाव पडलं. मुंबा,मुंबाय,मुंबैमुंबई,मुंबापुरी,Bombaim,बॉम्बे,बंबई,अशी कितीतरी नावं.

जॅागिंग पार्कातले / बागेतले प्राणी

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 23/12/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
जॅागिंग पार्कातले /बागेतले प्राणी प्रेरणा //मैफिलितले प्राणी (२०१३)/लेखक आदूबाळ. १) पहिला हास्यक्लब सुरू होतो सकाळी सहाला. बहुतेक ज्येष्ठ नागरिक. घरी बहुतेक चारलाच उठून तयारीत राहात असतील. क्यानवास शूज,टी शर्ट,पंजाबी ड्रेस कोड. खाली सोसायटीचा जिन्याचा दरवाजा वेळेत उघडला नसेल तर संतापत असावेत. शंभरेक जणाचा व्यायाम ग्रुप लिडर सांगेल तसा सहाच्या ठोक्याला सुरू. श्वास घेणे सोडणे फासफुस आणि आवाज. साडेसहाला संपण्या अगोदर पाच मिनिटे अगोदर अत्यंत आवडता प्रकार हाहाहोहो नंतर दोन्ही हातांनी मांजर ओजकारते तो अभिनय दात ओठ खावून. सर्व राग तेव्हा काढत असावेत॥ मग सुट्टी.

वाट - एक पाहणे !

लेखक चिनार यांनी बुधवार, 14/12/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
वाट पाहणे हा योग माझ्या कुंडलीतच असावा बहुधा. मी कुठेही, कधीही, काहीही करायला गेलो की सर्वात आधी माझ्या वाटेवर येते ते म्हणजे वाट पाहणं. बऱ्याच ठिकाणी वाट पाहणं अपरिहार्य असते आणि ते सगळ्यांच्याच "वाट्याला" येते. उदा.बाहेर जाताना बायकोची तयारी होईपर्यंत वाट पाहणं या वैश्विक समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. पण माझ्या वाट्याला वाट पाहण्याचे आणखी कितीतरी योग येत असतात. इतके की आताशा वाट पाहणं मी एन्जॉय करायला लागलो आहे. अतार्किक ,स्वैर,रँडम विचार करायचे असतील तर त्यासाठी मी वाट पाहण्याचा वेळ उपयोगात आणतो.

मुळांनी धरू नये अबोला

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/12/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे? - संदीप चांदणे

संवाद

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 12/12/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या इंग्लिश मिड डे या वर्तमानपत्रात एक पुर्ण पानभर मुंबईच्या विविध भागात घडलेल्या तीन घरातल्या बातम्या आल्या आहेत. त्यात २ बातम्या मध्ये शाब्दिक वादामुळे संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोला जीवे मारले तर एका मध्ये कौटुंबिक वादामुळे वेगळे झालेल्या नवऱ्याला आपल्या मुलांना भेटु न दिल्याने नवऱ्याने घेतलेला स्वतःचा जीव. आपल्यासाठी तरी हि नुसतीच बातमीच, वाचावी आणि सोडुन द्यावी. पण थोडे लक्ष दिले तर लक्षात येईल या तिनी बातमी मध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कुटुंब- नवरा आणि बायको. एका दिवसात तीन कुटुंब उध्वस्त झाली. त्या तीन कुटुंबातल्या लहानग्याचे पुढे काय? हे एक यक्ष प्रश्न असेल आता.

जीवन -एक रडगाणे

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 09/12/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर गेल्या काही दिवसात आलेले धागे बघता,'जीवन -एक रडगाणे' नामक नवीन दालन सुरु करावे अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो. ह्या दालनात दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांमुळे येणारे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होईल (मग मिपावर आपण वेगळे काय करतो असा प्रश्न काही दुत्त दुत्त मिपाकरांना पडेलच! त्यांना फाट्यावरून इग्नोर मारावे !). दैनंदिन समस्यांमुळे माणसाच्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि त्यांची त्याने शोधलेली उत्तरं ह्यावरही उहापोह होईल. सोबतीला मिपातज्ञ आहेतच. तर दालनाच्या बोहनीसाठी आमच्याकडून काही चिल्लर. प्रश्न १.

मुंबई

लेखक अमिता राउत यांनी बुधवार, 07/12/2016 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात मुंबई हि स्वप्नांची नगरी आहे ..... एअरपोर्ट ते CST च अंतर कापत टॅक्सी पहाटेच मुंबई दर्शन घडवत होती . रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उंच उंच इमारती काही नवीन तर काही टॅक्सिच्या आवाजांनी पडतील कि काय अश्या अवस्थेत; चिक्कार धुळीने माखलेली, काळवंडलेली दारं खिडक्या आणि त्यात बाहेर वळत टाकलेले कपडे ; ते कपडे धुतलेले होते कि धुवायचे याचाच प्रश्न होता. नेहमी बातम्यांमध्ये, सिनेमानं मध्ये बघ्यायला मिळणारी मुंबई प्रत्येक्षात वेगळीच आहे. पहाटेचे ४ वाजले आहेत पण दिवस उजाडल्या गत गर्दी करत लोक आपापल्या कामाला लागली होती .

चोरले जाणार नाही 'ते'

लेखक भारी समर्थ यांनी सोमवार, 05/12/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
टागोरांचे नोबल आणि बिस्मिल्लांची चंदेरी सनई साहित्य, सुर नी अनुभुतीची सुरेख सुंदर उबदार दुलई ही दोन्ही प्रतिकं चोरली गेली! दोन दिवसांतच विसरतात सगळे वर्षानुवर्षांची मेहनत, श्रम, अन् झिजवलेले कैक उन्हाळ-पावसाळे चोराकडून ही चिन्हं विकत घेणारे, असणारच पूज्य संस्कृती त्यांना पण त्या चिजांमधून निर्मितीचा आत्मा गवसणारच नाही कधी त्यांना
काव्यरस

माणुसकी

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 05/12/2016 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा आज एका अंध माणसाचा हात धरून त्याला बस स्टॉपपर्यंत जायला मदत केली, बसमधे बसवून दिलं. हे सांगणं खरंच आवडलं नाही पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही तोच तो प्रवाह तोच तो जमाव आयुष्य नावाचा धावता बनाव त्यात एक काठी माझ्या बाजूने वाट शोधत चालत होती वाटेवरची अवघी गर्दी काठीला त्या टाळत होती 'टक टक' काठीच्या त्या आवाजाची राखण होती 'काय मंदासारखे चालतात लोक' ही अनेकांची अडचण होती 'कुठे जायचंय काका?' आपसुक प्रश्न केला मी 'प्लाझा' म्हणाले आणि त्यांचा लगेच हात धरला मी गेलेही असते आपले आपण, त्यांना नव्हती भीड त्याची
काव्यरस