मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

मरण मला पाहून हंसले

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
मागे वळून मी पाहिले माझेच मरण मला पाहून हंसले हंसण्याचे काय कारण पुसता म्हणाले ते आलीच वेळ नेण्याची, न विसरता असते मी सदैव सर्वांच्या मागे सावली होऊन पहाते कोण कसा वागे झडप घालते पाहून तो गाफील जो न समजे जीवन असे मुष्कील खातो मी सदैव हेल्थी फूड ठेवीतो माझे मी आनंदी मूड घेतो मी नियमीत व्यायाम का मी नये राहू इथे कायम जनन मरण असे निसर्गाचा नियम घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त मरणे हे तरी असे उद्याचे सत्य श्रीकृष्ण सामंत

आयुष्यावर प्रेम करावे--

पुष्कराज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे कधी वाटते का जाउ मी सोडून माझे सखे सोबती अशाच वेळी श्वास कोंडतो विझुनी जाते जीवन ज्योती येणे जाणे आणि थांबणे आपुल्या हाती नाहीच काही तोच मांडतो खेळ पसारा तोच नकळता आवरून घेई तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे

अशी गुमसुम आवडतेस मला

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अशी गुमसुम आवडतेस मला *** अशी गुमसुम आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे खूप दुरून ऐकतेयस - माझा ... आवाज तुला नाही शिवत. वाटते तुझी दृष्टी तुला ... सोडून गेलीये दूर उडून एक चुंबन जणू तुझे ... ओठ असावे घट्ट शिवत. * सगळ्याच गोष्टी आहेत जशा ... माझ्या आत्म्याने भरलेल्या माझ्या आत्म्याने भरलेली ...

द्विधा मनाचि

namdev narkar ·
लेखनविषय:
सा॑गु कसे तुला मी माझ्या मनातले ओठा॑त शब्द येन्या आधीच था॑बले ह्या मुक भावना असत्या तुला कळाल्या नसत्या का मग सरीता सागरास मिळाल्या ती नजरा नजर अन चोरुन पाहणे कावरे बावरे होउन गर्दीत मज शोधणे मग कळले मलाही सम भावना तुलाही मग कशास तिश्ठणॅ हे मन का देत नाही ग्वाही

पावसा!

ऋषिकेश ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश

माझी कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रयत्नही करुनही जमत नाही कविता तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप माझ्या अहंकाराला डिवचतो. ही अस्वस्थता कोसळत जाते, तिन्ही सांजेला. धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते.

kai aahe tuzya manat........????

स्नेहश्री ·
लेखनविषय:
Ajun tuzya janiva utaraychya aahet maazya manat Ajunahi kalat nahi kai aahe tuzya manat........ Kadhi tuza asaswath karanar baghan, Tar kadhi abola dharan Ajunahi kalat nahi kai aahe tuzya manat........ Kadhi baghtos samorachya daraadun Kadhi jatos maazi najar chukvun kadhi laksha nahi asa dakhvatos.... Tar kadhi mast Ragavtos Ani mhnanun Ajunahi kalat nahi kai aahe tuzya manat........ Bahuda tula hi kalal aahe ki kai aahe maazya manat.......... Maaza te haluhalu chorun baghana kadhi tuza raag raag karana kadhi tuzyashi ladat bolana Tar kadhi tula baghun harkhun jaana... Bahuda tula hi kala

पाहिले मी !

कौस्तुभ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाहिले मी पाचोळ्याला फांद्याना लटकून रडताना,जगताना तर कधी फुलण्या‌आधी कळी गळून पडताना ऐन बहरात फुलांचा रंग उडून जाताना अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला गंध ओवळून टाकताना पाहिले मी डेरेदार वृक्षाखाली सावली हरवून जाताना तर कुठे इवल्या रोपाखाली वारूळ उभे रहाताना वादळाशी झूंज देत इतिहास नवा रचताना तर कुणी अलवार झूळकीसरशी मुळासकट पडताना पाहिले मी देवळात दगडावर अभीषेक दुधाचा होताना तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात अन्कुर उद्याचा फुटताना खडकाळ बंजर जमीनीवर नांगर (प्र)यत्नाचा फिरताना तर कुठे नर्मदेच्या तीरावर गोट्यांचे पीक येताना पाहिले मी हिमालयाला नतमस्तक धरेसमोर होताना तर कधी इवल्या शीळेला मिज

इज्जत

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
जिथे नाही कुणाला इज्जत तिथे जाण्यात कसली लज्जत जीवनासाठी लागते अन्न श्वासासाठी लागते हवा तान्हेसाठी लागते पाणी लाजेसाठी लागते वस्त्र जिथे नाही कुणाला ह्याचे भान तिथे कसाला आला सन्मान चांगल्या वागण्याकरिता असावा सदाचार चांगल्या निर्णयाकरिता असावा सुविचार जिथे अति होतात आचारविचार त्यालाच नाही का म्हणत लाचार श्रीकृष्ण सामंत