मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

(सख्या रे, घामट मी तरुणी!)

चतुरंग ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली! (श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले!

उघड्या खांद्यावरती सखये--

पुष्कराज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उघड्या खांद्यावरती सखये जरा ओढ्णी ओढून घे तू नजर विखारी असते सखये त्या नजरेला जाणून घे तू साडी जेव्हा नेसतेस तू गाली जेव्हा हासतेस तू शततारा त्या जळूनी जाती अशी अप्सरा वाटतेस तू सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू डंख मारण्या सगळे तत्पर एवढेच बघ जाणून घे तू वीज नभातील लखलख्णारी सहज जाळ्ते कोणालाही परि ती उतरून येता खाली सखे शेवटी विझूनी जाई शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती

अरे संस्कार,संस्कार

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
"अमेरिकेत प्रथमच येणाऱ्यानी आपले जूने संस्कार विसरूं नयेत, तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपली सुधारणा करून रहावं.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच पंचाईत करून घेतो.याची नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही." असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले. मी त्याना म्हणालो, " हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र आहे.संस्कार म्हटलंत तर "तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा"हेच इकडचे संस्कार आहेत"कसले संस्कार घेऊन बसलात?" थोडसं नाराज होवून मला महणाले, "सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का? अरे संसार संसार.

जिवलगा...

फटू ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
व्हायचं ते तसं होऊन गेलं आहे फक्त आठवणी उरल्यात आता कालचा दिवस केव्हाच संपला आलीस सोडून तू काटेरी वाटा समजायचं तसं ते एक वादळ होतं आयुष्याला फिरवून ते निघून गेलं किती खंबीर आहेस तू मनाने हेच जाता जाता त्यानं जाणवून दिलं वेदनांमधून सार्‍या बाहेर पड आता एक छान हसरं आयुष्य दिसेल तुला पुन्हा एकदा भर मनात उत्साह जरा दिसेल जागोजागी प्राजक्त फुललेला तुझ्या निरागस भावी आयुष्यामध्ये माझी भाबडी साथ तुला चालेल का तुझा जीवनसाथी होण्याचं भाग्य जिवलगा, सांग मला मिळेल का ? (ही कविता ऑन डिमांड पाडलेली आहे.

उद्धवा! अजब तुझे सरकार

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
दिवस उजाडूनी होतो सुरू होतात अवहेलना अन तक्रारी त्याही पेक्षा ती रात्र बरी उजळणी होते रात्रीची स्मरूनी बाचाबाची सकाळची तू तू अन मी मी ची अन खऱ्या खोट्याची उद्धवा! अजब तुझे सरकार जनार्धनाची हीच तक्रार तुझ्याच दारी न्यायमंदिरी खोटे बोलणे झाले असुनी खरे मानण्याची कसली जबरी सत्तेची ही कसली खूमखूमी श्रीकृष्ण सामंत

दाखविली मातेची व्यथा कौतुके

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना घेई तुला ती माऊली पोटाशी रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी वेळी अवेळी जवळ घेवूनी पाजिते ती तुला घेवूनी पदराशी दुदु पिताना तू मात्र तिला लाथेने धुसक्या मारिशी शिकविले चालण्या जिने तुला हांक मारता दूर धावशी सोडून तिला तुला खेळण्या आणे ती खेळणी एक एक करूनी टाकशी तू मोडूनी गोड खाऊ करूनी देते तुला बशी जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी छान छान कपडे तुला तिने आणिले खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला संगीत शिकण्या दाखल केले शाळेला रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला मित्रासंगे

सुखाचा शोध

काळा_पहाड ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
न मागता मिळणे मागुन मिळणे अन मागुनही न मिळणे मनाचा खेळ मिळाल्याची चिकित्सा पुर्तीची अपेक्षा आनंदाचा स्तर भावनांचा कल्लोळ प्राप्तीचा आनंद मागण्याची खंत नाकारल्याचे दु:ख सारीच अपेक्षा सुखाचा शोध अगम्य तो बोध दु:खाचे भय अन दु:खाचीच उपेक्षा
काळा पहाड

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
ताई म्हणे बाळूला जावून सांगते आईला तुच मारीलेस मला ऐकून हे आई म्हणे ताईला दुसरी बाजू ऐकली पाहिजे कोकरू म्हणे लांडग्याला जावून सांगते मर्कटाला तुच खाणार मला अन करीशी नुसता बहाणा ऐकून हे मर्कट म्हणे कोकराला दुसरी बाजू ऐकली पाहिजे प्रवीण मारे प्रमोदला पोलीस सांगती कोर्टाला ऐकून हे जज्ज सांगे कोर्टाला दुसरी बाजू ऐकली पाहिजे अपराधी अन निरपराधी बाजू मांडती अपुली आईची प्रीती मर्कटाची भीती अन जज्ज्याची कार्यपद्धती वापरूनी ते ते मध्यस्थी अपुल्या निर्णयास येती शेवटी योग्य निर्णय मात्र ठरवित असते नियती श्रीकृष्ण सामंत

आठवणी

अथांग सागर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवणी जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं या आठवणींत बुडुन जाताना आजचं नाही उरत भान क्षण ते परत ना येतील आता तीच होती सुखाची खाण आठवणी असतात अनेकांच्या तुमच्या, माझ्या, सर्वांच्या प्रत्येकाची असते एकतरी आठवण दु:खाची अथवा सुखाची साठवण माझ्याही आहेत अशाच आठवणी पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या जीवन झाल्या त्याच आठवणी सुवर्णरुपी गतकाळाच्या ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पा