"अमेरिकेत प्रथमच येणाऱ्यानी आपले जूने संस्कार विसरूं नयेत, तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपली सुधारणा करून रहावं.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच पंचाईत करून घेतो.याची नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही."
असं एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले.
मी त्याना म्हणालो,
" हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवं ते करायला इकडे स्वातंत्र आहे.संस्कार म्हटलंत तर "तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा"हेच इकडचे संस्कार आहेत"कसले संस्कार घेऊन बसलात?"
थोडसं नाराज होवून मला महणाले,
"सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का? अरे संसार संसार.