राजकारणातील घडामोडींकडे लक्ष ठेवणार्यांसाठी एक हलकाफुलका विरंगुळा !
----------------------------------------------------------
त्याला जरा रागवा ना बाई
तो काही माझे ऐकत नाही…
घर बदलले दार बदलले
मी सारे आधार बदलले
तो काही माझे पाहत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … १
आषाढ गेले श्रावण आले
महिने काय सालही गेले
तो काही पाऊस पाडत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … २
दबाव टाकले गार्हाणे नेले
विमानही ते ओळखीचं झाले
तो म्हणे की डाळ शिजत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … ३
लोक जमवले पार जागवले
पत्रकार तर नेहमीचे झाले
तो म्हणे की बार उडत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … ४
---------------------------------------
लग्नाआधी अनिरुद्ध अभ्यंकरांची हळुवार'चाहूल' आम्हालाही लागत होती आणि त्या प्रणयधुंद काळानंतरची वास्तवाची चाहूल आम्हाला लागली ती अशी! आमच्यापाशी मूल सोडून काही कामानिमित्त गावाला गेलेली बायको दूरध्वनीवरुन विचारते आहे सगळे ठीक आहे ना?
किरकिरे तुझे ते मूल
मला चाहूल
सतत कानाशी
होईल पहाट
बदलतो कूस
पुन्हा जराशी
चालीत कसा मी मंद
गात्रात कुंद
दिवसाचा
हा असाच चाले
दिवस मास उत्सव
रडण्याचा
आकंठ रडे ते झोळीत
मुते खोलीत
तिथे ओल
तो स्पर्श नको
मज नको
बोबडे बोल
हे स्वप्ना परी वाटे
पण नसे खोटे
बोलू कुणाशी
थोपटले निजून मी
मूल लवंडलेले
उशाशी
चतुरंग
मन कातर कातर...
फार जपलं जपलं...
पाणी गढूळ गढूळ...
उडे चिखल चिखल...
एक बोचला कातळ...
वाहे रक्त भळभळ....
मनी उठले काहूर...
एक वेदनेची लहर...
परत लाटांचा कल्लोळ...
पण जल निर्मळ निर्मळ...
मनी आशेचा मोहोर...
वाहू थांबले रुधिर....
मन कातर कातर...
झाले नितळ नितळ...
होता श्रावणाचे आगमनं
सुरू होते सणांची उधळणं
गोड धोड मिळे खायला
आणि सुट्ट्यांना उधाण
प्रथम येते नागपंचमी
फुलोय्रावाचून हिची महती कमी
काढून सर्पनक्षी देवघरा
त्यापुढे सान-थोरही नमीं
मग येते पौर्णिमा नारळी
जमती सारे बांधव कोळी
पूजती त्या सागरदेवतेला
जो त्यांना हो सांभाळी
दिन हा रक्ष
(अनुवादीत. कवी--समीर)
केला आहे दुष्टपणा दुष्टानी
केले तरी कुठे कमी दोस्तानी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
लागे दोस्तीला कुणाची नजर
बदल होता तुला नसे ती खबर
नाही राहिल्या आणा अन शपथा
साथ साथ मरण्याचा एकही इरादा
दौलतीला राहती सर्वस्व मानूनी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
प्रीतिचा लवलेश नसे तुझ्या नयनी
मित्र होऊनी अर्थ मैत्रीचा घे समजूनी
दौलत कसली कसली दोस्ती
नाती गोती सर्वच नावा पुरती
पश्चातापे जे होईल ते अनुभवूनी
सच्चाईचा मार्ग ही अंगिकारूनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
श्रीकृष्ण सामंत
(अनुवादीत. कवी--अनामिक)
केशभार असा सोडून
नको बागेत येऊस
फुलांच्या सावल्यांना
नको लज्जीत करूस
प्रेमाचे गुणगान
नको तू ही गाऊस
गीताचे भ्रमराकडून
नको हंसे करून घेऊस
प्रेमाचे भ्रमराला
असे कसले ज्ञान
मी काय सांगू?
कळ्यानांच तू विचार
लफंगा असे हा भूंगा
शिकवील तो मग तुला
त्याचीच नकली कला
अन घेशील नंतर
तूं माझाच पंगा
शोभे न तुला
हे असे बोलणे
पावित्र्य प्रेमाचे
असे विटवीणे
देशी का मज
तू साथ तिथे
हे क्षीतज जिथे
पूरे पूर्ण झुकते
येईन मी ही
तुझ्या संगती
नको वाटेत होऊस
तू कधी वेगळा
प्रेम आपुले पाही
हा जमाना सगळा
श्रीकृष्ण सामंत
हळूवार तुझे पाऊल
मला चाहूल
तरीही उराशी
होईल पहाट
नको जाऊस
थांब जराशी
उतरो न कधी ही धुंद
श्वासात गंध
रात्रीचा
हा असाच चालो
नसा नसात उत्सव
प्रीतीचा
आकंठ बुडूदे डोळ्यात
तुझ्या देहात
मला खोल
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
हे स्वप्न जरी वाटे
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
- अनिरुद्ध अभ्यंकर