मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

आई कसे म्हणु मी...

rahulkransubhe ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आई कसे म्हणु मी Mummy येई मुखी English याच्या जगात मराठी मन माञ दु:खी बाबांचे झाले Daddy ताईची झाली Sister English च्या जगात नवरे झालेत Mister जग झाले सारे Fast-food जे चांगले ते झाले Good मिञ सर्व झालेत Friend शनिवार झाला Weekend राञ झाली आता Night मारामारी म्हणजे Fight जे बरोबर असेल ते Right आज पैशाचे झाले दोन प्रकार एक Black तर दुसरा White English च्या या जगाचे काहीच खरे नाही कालपर्यंत होते जे उद्या काहीच दिसणार नाही जुन्या सर्व गोष्टींचा नव्यापीढीसाठी झाला इतिहास इंग्रजी शिकावी प्रत्येकानं हाच आधुनिकीकरणाच्या ध्यास
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनग

प्राणिपात कोटि कोट

सतिश ·
लेखनविषय:
दाबुन हुन्दक्आना या स्पुन्धतात भिन्ति हलुवर काकाणचि किण्किण थाम्बलेलि शन एक खालि झुकले हे उन्च उन्च ईमले पायातली तयानच्य मज्बुत वीट हलली तुम्च्याच दर्शनचि तीज आस होति दादा करुनि ह्रुदय समर्पित हलकेच ती निमालि वय थोरेले परन्तु वारधक्य नाहि आले सेवेत देह झिझला जीवन सुवर्ण झाले अव्घया नभास भेदुनि वैकूनट लीन झाली प्राणिपात कोटि कोटि त्या थोर माउलिला कवि सुरेश्चन्द्र जोशि दोम्बिवलि २२/११/२००८

पुढार्‍यांचे देशभक्ती गीत

चन्द्रशेखर गोखले ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
या मातेचे कुपुत्र आम्ही आम्हास कसली लाज बटीक बनवली आम्ही तिजला भागविण्या अमुचीच खाज गरीबांच्या या टाळु वरचे आम्ही खातो लोणी नित्य नवी आम्हा लागते रम आणि रमणी कोण कुठले भगतसिंग..? अन कोण कुठले राजगुरु.. आम्ही वंदितो भाई ठाकुर अमर, अरुण, साटम गुरु.. उच्च नीच नाही कोणी सगळेच आम्ही महान एकजुटीने आम्ही ठेवला अमुचा भारत गहाण.....!!!

(भणंग २)

चतुरंग ·
लेखनविषय:
सकाळी सकाळी चमत्कारी ह्यांची 'भणंग २' ही गजल वाचून आमच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि हे लगोलग हे विडंबन बाहेर पडले! ;) उषःपान झाले सकाळी सकाळी तुला 'छान' झाले सकाळी सकाळी चवीला बिडी मस्त ओठात घेता 'धुरापान' झाले सकाळी सकाळी 'तिथे' पोचता पाहिले एकमेका कसे ध्यान झाले सकाळी सकाळी जरा 'वेग' आल्यावरी लोक सारे गतीमान झाले सकाळी सकाळी इसबगोल सर्वास उ:शाप झाला बक:ध्यान झाले सकाळी सकाळी म्हणालाच 'रंगा', तरी शेवटाला समाधान झाले सकाळी सकाळी चतुरंग

खेळ खुर्चिचा

मनोज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
खेळ जुना खुर्चिचा हा पुन्हा नव्याने चालला जे गेले बळी त्यांचा खेद कुणा वाटला? कोण आले? कोण गेले? मारीले कुणी ? कोण मेले? सत्तेचे भुकेले बघ पुन्हा प्रवासा निघाले आतंकाचे कुंड जळते अन मुक्यांच्या आहूती कोणी रक्षावे कुणाला? षंढ सारे भोवती विध्वंसाचे पर्व मोठे आघात त्यांचे विषारी हात व्यस्थ रक्षकांचे खुर्चीचे सारे पुजारी हे नित्याचेचा आता सवय याची लाउन घे मेले त्यात तु नव्हता धन्यता मानुन घे

सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

कपिल काळे ·
लेखनविषय:
चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरविते सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. पदावर मुख्य नव्हता पोलिसांना मंत्री नव्हता मनी त्याचा सल नव्हता पित्त्या बसवायचा होता गुरहाळ चर्चेचे किती घालते ...... सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. जन्तेला फाट्या मारिले नवे नायक नाही दिले पायांना कितीक खेचले पछाड धोबी टाकले डाव कुटील किती मी खेळते........ सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते.

झुंज त्याची व्यर्थ गेली

पुष्कराज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लाख दिवे विझु नये त्याने स्वताचीच वात केली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली नभी चंद्र्मा खेळ्तो खाली माझा रवी तळपे हा सार्‍या दगड्-धोंड्यात माझा एक तारा झळके हा घाव सोसले सोसले त्याने ह्रद्याची ढाल केली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली वीर गती मिळे त्याला डोळा पाणी का आणावे पण लाख मेल्या मनांसाठी एक त्याने का मरावे? तरी झुंजला झुंजला त्याने वाद्ळाला मात दिली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली हार्-फुले फिके शब्द सारा क्षणाचा देखावा धग चितेची तशीच खेळ सत्तेचा पहावा आज माझा रवी मावळला उद्या तुमचा जाइल आज बैल सत्तेवर उद्या राज्य रेड्या

पुरे झाले चंद्र सूर्य!

केदार केसकर ·
लेखनविषय:
मित्रांनो, ही माझी नवीन कविता. कशी वाटतेय ते नक्की सांगा. एका स्त्रीचे मनोगत रेखाटण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय? कशी सुचली हे नंतर सांगेनच.

पुन्हा जिवंत परत आले तर

सुवर्णमयी ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पुन्हा जिवंत परत आले तर मरण अटळ आहेच... रोज जीव वाचला याच समाधान मिळावे असेही घडते.. पण जगायच कस ते ठरवता आल असत तर?

अजुन मी...

राघव ·
लेखनविषय:
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.