वाट चुकलेलें कोंकरूं
दिनांक २८ मे
हिन्दु हृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस.
काल त्या पुण्यश्लोकाच्या स्मरणाच्या एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला.
तिथे दोन शब्द बोलायचेही होते. मग म्हणून सावरकरांच्या साहित्य गाथेचा
धांडोळा घेत होतो. तो खालील कविता हाती लागली.
हे काय बंधु असतो जरि सात आम्हीं । त्वत्थंडिलीच दिधले असतें बळीं मी ॥
असें जावल्य शब्द लिहिणार्या या संन्यस्त योग्याचे हृदय असें कोमलही होते
या प्रत्ययाने मन भारावून गेले. तोच प्रत्यय समस्त सावरकर भक्तांसाठी :-
शीर्षक : वाट चुकलेले कोकरुं
कां भटकसि येथें बोलें । कां नेत्र जाहले ओले
कोणिं का तुला दुखविले । सांग रे !
Taxonomy upgrade extras
मिसळपाव