हाक आभाळाची येता

लेखनविषय:
काव्यरस
रूटीनाचे गंजलेले यंत्र अखंड घुमते जुन्या व्रणावर रोज नवी जखम करते अनावर भोवंडून शिणलेल्या प्राणासाठी वाटेवरच्या झाडाची साथ वाटे मला मोठी त्याचा मायाळू विस्तार घाले हिरवी फुंकर एक रंगीत पाखरू झुले उंच फांदीवर इवल्याश्या कंठातून काढी तरल लकेरी हाक आभाळाची येता झेपावते दिगंतरी

संकल्प

लेखनविषय:
समेटून सारे थागे सुर्य अस्ताला निघाला पुन्हा येण्याचा त्याने संकल्प सोडला झाली निवृत्ती वेळ निवांत मीळाला काय भोगल सोडल याचा हिशेब कळाला उरल सुरलं पुर्ण करावं म्हणतो जायच्या आधी काही लिहावं म्हणतो काय अन कीती लिहावं याला काही अंत नाही आवडेल कुणाला, कुणाला रुचेल कुणी वाचेल कुणाला पटेल याचा खेद किंवा खंत नाही इथल सगळं इथेच सोडून पुढल्या मुक्कामी निघावं पाऊलखुणा मीटण्या आधी म्हटलं जरा थोडंस लिहाव मागे वळून पहाता पाश जणू कोळ्याचे जाळे कुठुन करू गोळा सुचेनासे झालेhi न तोडता धागे आवराव वाटलं जायच्या आधी लिहून ठे़वाव वाटलं आले पीक दाण्यावर खळ्यात आडवे पडले ज्याच्ये त्याला

काय आहे तुझ्या ...माझ्यात ???

लेखनविषय:
काय आहे तुझ्या ....माझ्यात मैत्री,आपुलकी की अजुन काही? माझ्या जे मनात असतं ते तुझ्या बोलण्यातुन जाणवतं.. तुला जे करावसं वाटतं ते माझ्या कृृतीतून झळकतं.. काहीतरी पुर्वजन्मीचं नातं असावं आपल्यात .. नाहीतर उगाच का इतकी ओढ आहे .... तुला माझी अन् मला तुझी ... खरचं .....ए....मागच्या जन्मी कोण असेल मी तुझी ?? सखी,सोबतीण की अजुन कोणी??

हाय काय अन् नाय काय!

लेखनविषय:
मला चांगलंच ठाऊकाये, की चित्रबित्र मला बिल्कुलच काढता येत नाही. पण तरीही.. एकदा मी तुझं चित्र काढणार आहे. बघंच तू. सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय! आधी दहाचा आकडा काढेन. हं पण त्यातला एक जरा पसरटच. का म्हंजे काय? तुझ्या कपाळावरच्या इतक्या सगळ्या आठ्या मावायला नकोत का? आणि त्यावरचा शुन्य थोडा चपटा, मला चिडवतानाचा तुझा मिश्किलपणा पुरेपूर भरलेला. नाकाच्या जागी आठाची तिरकी रेषा काढताना हात जरा मी मोकळाच सोडेन. कित्ती कित्ती तिरकेपणा तो? कळायला नको?

तुन्हा मन्हा जुगुमले...

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे तुले मनावाले जास मी काकोळीतखाल तुन्हा भ्या मा खंगाईसन तुन्ही गोटना उगरा टोकले मी तुन्हामाच रवळी जास... मन्हाच रंगतवरी माले थापन देवानी मी कितली काकोळीत कई आनि मोर्‍हला उच्छाव येवानं आदुगरच मी व्हई गऊ घुमर्‍या तुनी पसरेल- आखडायेल कपारनी गौळ नादमा... मी घांगळी वाजी पाही पावरी वाजी पाही टापरा वाजी पाह्या चिमटा हालाई पाह्या तुन्ही थाळीना नाद आझुनबी आयकू येत नही मी रातभर घुमी र्‍हास...

नुसतं हो म्हटलं म्हणून जुळत नसतं नातं..

लेखनविषय:
नुसतं हो म्हटलं म्हणून जुळत नसतं नातं.. आखून दिल्या वाटेवर रुळत नसतं नातं.. माती हवी मायेची, अन् थोडं खारं पाणी, सुक्या कोरड्या मनामध्ये रुजत नसतं नातं.. जपलं नाही जीवापाड तर मुकं मुकं होतं.. शब्दाविना स्पर्शाविना फुलत नसतं नातं.. रागावून रुसून वरून गप्प बसलं तरी, हाकेसाठी एका, आत झुरत नसतं नातं? दिवस वर्षं सरतात, अगदी कोरडे होतात डोळे व्रण जरी भरले तरी बुजत नसतं नातं..

जलाशय

लेखनविषय:
आलो परतुनी आणखी जाहलो जुना जरी अजून माझा जीव तरंगे पाचूच्या पाण्यावरी गारवा असा त्याचा की भिडतो आत्म्यास थेट वितळते जग अवघे मीच एक तरंगते बेट तिरप्या कोनातूनी येई सुवर्ण प्रकाश शलाका स्पर्षता पाण्यास गारठे कवडसे जणू मूक हाका बाजूस एका आत्ममग्न संतत स्फटीकधार सांडते घुमते गव्हारात उन्हाच्या संगीत हाकांस लाभते का अजून मी अडकलो तिथेच मनाने ना कळे बहुदा आठवती शांत ते तुझे जलाशयासम डोळे -अनुप

तप्तमुद्रा

लेखनविषय:
काव्यरस
जेव्हा निर्मम कठोर आसमंतात दाटले तेव्हा अनाहत आत खोलवर निनादले अनाघ्रात अदृृष्टाची जाणवली रूणझुण स्पर्श,गंध,रस, रंग एक झाले कल्लोळून आकलनाच्या कवेत आले-आलेसे वाटले अज्ञेयाच्या धुक्यामध्ये नकळत वितळले जाणिवेची नेणीवेशी जेव्हा थेट भेट झाली जुन्या जखमेच्या जागी तप्तमुद्रा उमटली

अवघे भरून आले..

लेखनविषय:
सोडून सांजवेळी जाता कुणीतरी ते घर मोकळेच होते.. अवघे भरून आले.. विसरावयास बसता आठव अचूक भिडतो अवकाश पोकळीतील, अवघे भरून आले.. मायेस ओतणारी.. ती ऊब सांत्वणारी.. अवघे सरून गेले.. अवघे भरून आले.. होता मनात बहुदा तो शब्द ओळखीचा.. निरभ्र अभ्र सारे अवघे भरून आले.. -- त्या थोटकात पुन्हा हिरवाच कोंब होता.. नाविन्य पालवीतून अवघे भरून आले! -- -- त्या संध्याकाळी अचानक काहीतरी निसटून गेल्याची भावना झाली.. ती हुरहुर अगदी टीपेची होती.. जशी आली तशीच गेली..! अत्यंत गहिरं आणि जड असं काहितरी मनाला भिडलं होतं हे मात्र खरं. डोळे मिटून थोडावेळ बसलो होतो.

लाख चुका असतील केल्या...

लेखनविषय:
काव्यरस
निसटले वर्ष मला पाठमोरेसे दिसले त्याची बघून हताशा माझे काळीज द्रवले म्लान वदनाने त्याने हलकेच विचारले जगशील का रे पुन्हा दिस चार माझ्यातले विचारात मी पडलो चार कोणते निवडू आनंदात गेले ते, की चुकांनी जे केले कडू निवडले मग चार चुका मोठ्या केल्या ज्यात सुधारेन म्हणताना गेलो आणखी गर्तेत नवे वर्ष नव्या चुका करण्याची आहे संधी असे असता कशाला भूतकाळा द्यावी संधी?
Subscribe to कविता