कविता
पुन्हा...
पुन्हा ब्लास्ट
मी हादरलो, आम्ही हादरले, सारा भारत हादरला
पण 'ते' विचकट हसले... राक्षसी
रावण, कंस, बकासुर, पुतना..
सुद्धा लाजले, रडवेले झाले..
'आमचा असुरी पणा असला नव्हता हो'
मिडिया गरजले
रक्ताळलेले फोटो - बटबटलेला सूर
मी भडकलो, आम्ही भडकलो, सारा भारत भडकला
पण त्यांचा TRP वाढला
नारायण-नारायण म्हणत
नारद मात्र आपल्या आधुनिक रूपाने थक्क झाला
सरकार सरसावले
दहशतवादी हल्ला - RDX - राष्ट्र - धर्म - जेहाद
मी आलो, आम्ही आलो, सारा भारत एकत्र आला
पण त्यांची पोळी शेकली
ब्रम्हा -विष्णू - महेशाचे आर्जव करत
इंद्र मात्र या लोकशाहीत विस्कळीत झाला
श्रीराम ते अण्णा...
...
लेखनविषय:
याद्या
1115
सचेतन
आज साधारण १वर्षापूर्वी माझा मावस भाऊ (वय-२४) बाइक वरुन पडून अपघाती दिवंगत झाला.असे प्रसंग अनेकांवर येतात,हे प्रसंग विसरत तर नाहीतच,पण स्वतःच्या मनाची समजुत कशी घालावी हेही कळत नाही...त्यामुळे या कवितेला सत्याचा आधार आहेच,पण त्याही पेक्षा हे अश्या प्रकारचं कटु वास्तव स्वीकारावं कसं हा प्रश्न मला छळत होता ...तो सोडवायला मला जमला की नाही?मला कळत नाही.
याद्या
1794
काव्यरस
माहेरी जायची मला झाली आता घाई
माहेरी जायची मला झाली आता घाई
डायवर दादा रं
डायवर दादा जोरात गाडी चालीव की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं
गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला
पुरं व्हत आलं आता वरीस त्या सणाला
आखाजी संपून आता दसरा आला की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं
बा माझा कसा आसलं शेतात राबूनी
थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी
यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं
आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड
सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर
कधी भेटती ती मला आसं मला झालं रं
माहेरी जायची मला झाली आता घाई र
लेखनविषय:
याद्या
1456
मेरी चार कवितायें
मेरी चार कवितायें
मंडळी, मिपा गेले तिन दिवस बंद असण्याच्या दरम्यान आम्हाला ज्या काही कविता झाल्यात त्या येथे एकदाच देत आहे.
लेखनविषय:
याद्या
1240
ADD AS FRIEND ...!!
किती सोपे असते ना
ADD AS FRIEND ...!! .. करणे
नुसते क्लिक केले की मित्र होणे
कुठला कोण मी ..?
पण पटकन तुमचा मित्र होऊन जाईल
तुमच्या मनाच्या खिडकीतून
हळूच मी डोकावेन
छानसे चांदणे होऊन
छानसा प्रकाश फुलवीन
तुमच्या हसण्यात मित्र होईन
तुमच्या दु:खात मी धीर देईन
किती सोपे आहे ना
ADD AS FRIEND ...!! ..
लेखनविषय:
याद्या
1375
काव्यरस
अस्तित्व दान केले
अस्तित्व दान केले
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले
वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले
वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
याद्या
1374
कवितेचे रसग्रहण - ३ (नावं)
"नावं" ही सोनल कर्णीक वायकुळ यांची कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. ही कविता जितकी भावूक खोल, आणि गहीरी आहे तितकीच तर्कदृष्ट्या भक्कम देखील. त्यामुळे ती वाचकाचा आनंद द्विगुणीत करते. तर्कदृष्ट्या भक्कम म्हणते आहे कारण कवितेची धाटणी थोडी गणिती सिद्धांताप्रमाणे आहे. प्रथम भूमिका मग स्पष्टीकरण मग समर्पक उदाहरणे.
कवितेचा विषय आहे नावं दिलेली अथवा न दिलेली नाती.
कवयित्री सुरुवातीलाच काही ओळीत तिचे म्हणणे मांडते - की नात्यांना नावं शोधायची नसतात, नात्यांना नावं ठेवायची नसतात.
याद्या
7713
कविता रसग्रहन २ - 'आलेख' (कवयत्री : अपर्णा)
मुळे कविता : 'आलेख'
नोट : राजेश जीं नी कविता रसग्रहन केलेले आवडले..म्हणुन येथे त्यापुढेच २ क्रमांक लिहुन पुढे चालु केले.
माझे मिपावर बहुतेक हे पहिलेच रसग्रहन आहे..आवडले तर ते कवितेचे यश समजावे..आनि पहिलेच रसग्रहन असल्याने सोप्पी परंतु छान कविता मी निवडली आहे, आणि एक वाचक म्हनुन येथे लिहित आहे.
------------------------------------------------------
जीवन -आयुष्य कसे गमतीदार असते नाही... ? या जीवनामध्ये आपण कीती चढउतार पाहिलेले असतात, नाही ?...
याद्या
1849
मिसळपाव