कवितेचे रसग्रहण - ३ (नावं)
"नावं" ही सोनल कर्णीक वायकुळ यांची कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. ही कविता जितकी भावूक खोल, आणि गहीरी आहे तितकीच तर्कदृष्ट्या भक्कम देखील. त्यामुळे ती वाचकाचा आनंद द्विगुणीत करते. तर्कदृष्ट्या भक्कम म्हणते आहे कारण कवितेची धाटणी थोडी गणिती सिद्धांताप्रमाणे आहे. प्रथम भूमिका मग स्पष्टीकरण मग समर्पक उदाहरणे.
कवितेचा विषय आहे नावं दिलेली अथवा न दिलेली नाती.
कवयित्री सुरुवातीलाच काही ओळीत तिचे म्हणणे मांडते - की नात्यांना नावं शोधायची नसतात, नात्यांना नावं ठेवायची नसतात. आणि कवयित्री नावांना "पिंजरा" हा शब्द संबोधून तिची नावांविरुद्धची भूमिका अधोरेखीत करते. शिवाय प्रत्येक नातं म्हणजे जणू एक देखणं रूप लाभलेला , मन असलेला प्राणीच अशी अनवट उपमादेखील ती नात्यांना देते.
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात
नावांच्या पिंजा-याबाहेर सुद्धा एक सुंदर बन आहे
त्यातल्या एकेक प्राण्यालाही एक सुंदर मन आहे
‘कोण आहे तो तुझा’ हे व्यवहाराला बर आहे
‘ओळख आहे आमची’ हेच उत्तर खर आहे
आणि मग संपूर्ण कवितेमध्ये या ओळींचे अर्थात कवयित्रीच्या भूमिकेचे स्पष्टीकरण येत जाते. आणि ते इतक्या समर्थ शब्दांत सामोरे येते की आपण त्याच्या समर्थनार्थ होकारच भरतो.
पुढील कडव्यात जखमेवरच्या खपल्या आणि भीजलेले दिवस हा विरोधाभास लगेचच्या ओळीतील परसातला चाफा अन कुंपणातल्या तारा या विरोधाभासाने प्रतिबिंबित होतो. हे या कवितेतील सौंदर्यस्थळ आहेच.
ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी
जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी
ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी
परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी
ओळख पटते आगंतुक डोळ्यामधल्या हसण्याशी
आणि ओळख निघते गही-या लाघव डोळ्यामधल्या स्वप्नाशी
नातीच ना हो हि सगळी कळत नकळत जोडलेली
बहरलेल्या वेलीसारखी अंगा खांद्यावर वाढलेली
कवयित्रीने परत एकदा नात्यांना वेलीची उपमा देऊन निसर्गाशी सन्निध्य साधले आहे. कडवी वाचत आपण नकळत भावूक होत जातो आणि कवयित्रीचे म्हणणे साधारण पटू लागते तोच कवयित्री अतिशय चपखल उदाहरणेच आपल्यासमोर ठेवते. यशोदा आणि पन्ना दाईचे. आणि तिचा मुद्दा अगदी आता तर निर्विवाद पटवून देत आपल्या रूढ समजूतींना खो देते.
नावं देवून सांगा त्यांना व्याख्येत कस बांधायचं?
कस सांगायचं आतापासून पुढे असंच वागायचं?
पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?
पुढील कडव्यात कवयित्री नावे असलेल्या पण कोंडमारा झालेल्या नात्यांचादेखील ओझरता उल्लेख करते जो मनाला चटका लावून जातो.
नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती
म्हणूनच सांगू का
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात
ही कविता वाचल्यावर पुढील ओळी उगाचच मनात रेंगाळू लागतात -
"सिर्फ एहेसास है येह रूह से मेहेसूस करो,
प्यार को प्यार ही रहने दो कोइ नाम ना दो"
याद्या
7713
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
वाह!
"कविता ह्या लेखनप्रकाराची
In reply to वाह! by सहज
छान रसग्रहन.. तुमच्या
नात्यांच्या नावांना
ही मालिका वाचतोय.
शुचि तै, रसग्रहन मस्तच , अजुन
हाहा ओके. नक्की.
In reply to शुचि तै, रसग्रहन मस्तच , अजुन by गणेशा
मस्तच
कविता निसटली होती.. पण आता
आधीही वाचायची सुरुवात केली होती
शुचि, मस्तच
शुचि, मस्तच
शुचि, खुप खुप आभार. माझ्या