Skip to main content

कविता

कल्लोळ..!!

लेखक राघव यांनी सोमवार, 16/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळजाला समेचा दिलासा.. मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला! तसे बंध कुठले-कधी जाणिवेला ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला! नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला.. असे काय होते उरी प्राक्तनाच्या.. अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..! अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले.. मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!! राघव
काव्यरस

झिम्माड पाउस...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 15/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
झिम्माड पाउस... अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झिम्माड पावसाला झाली सुरुवात ... भेटण्यासाठी अधीर झाले समुद्रकिना-यावर धावत गेले... तुफान सरी बेभान वारा बेधुंद झाला आसमंत सारा... अंगाशी झोंबत होता लडीवाळ वारा... मस्तीत स्पर्शून जात होत्या फेसाळणा-या लाटा... बेधुंद होउन मी मजेत गात होते... लाटांच्या संगीतावरही थिरकत होते... मनाला चिंब भिजवणा-या पावसात मनसोक्त भिजावेसे वाटत होते...

निरोप

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 12/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्‍हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी?

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 12/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥ कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला । मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥ न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥ मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे । कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥ न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥ प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया । धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥ नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥ तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्

सार्थक

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 10/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आभार… तिच्या गारस वयाचे ओळखीच्या समयाचे आतर्क्य यमनाचे आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या अरूप यौवनाचे ……. !! त्यातूनच उतारावरचं तारुण्य नात्याचं लावण्य शब्दांचा प्रसव आणि भावनांचा दुर्लभ शृंगार लाभला आहे मला … "माझा मी",… "नसूनही असलेली माझ्यातली ती " भेटलीय मला असंख्य वेळा ……. अस्तित्वाशिवाय ……!! या गंधर्व क्षणांमधून जन्मलेली कविताच जिवंत ठेवील मला चंद्र माधवीच्या प्रदेशात तिची प्रतीक्षा करीत चिरंतन …. !! आभार पुन्हा एकदा आमच्या न भेटण्याचे, …… आजन्म ………………. !! …………………… अज्ञात
काव्यरस

मूक आक्रोश

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 07/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील बलात्काराची शिकार झालेल्या "निर्भया"च्या शेवटच्या शब्दांवर आधारित एक कविता सध्या सगळीकडे ऐकू येते आहे. ती इंदू वर्मा यांनी लिहिली आहे.
काव्यरस

नवोदित कवींना आवाहन

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 05/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी- कै. सौ. प्रभावती केसकर यांच्या जन्मशताब्दीची या २५ ऑक्टोबर ला पूर्तता होत आहे. या जुन्या काळातल्या लेखिका-कवयित्री. त्यांनी आपल्या काव्यगायनाने अनेक समारंभ व कवीसंमेलानातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कविता आशयपूर्ण तर होत्याच, शिवाय गेयही होत्या.

पुन्हा अनोळखी होऊ .....!!

लेखक psajid यांनी गुरुवार, 05/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….

ध्यासबावळी

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 04/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती …………………. अज्ञात
काव्यरस

" दु:खा "

लेखक कैलास गायकवाड यांनी रविवार, 01/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नको अन कधी वाटतोस रम्य दु:खा तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया तुझ्यामुळे या कथा जोवरी सुरम्य दु:खा ---डॉ.कैलास गायकवाड