Skip to main content

कविता

उरेल काही उणे उणे

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, भोगाच्याही पदरी उरते, वेदनेचे गाणे मखमलीच्या दाव्याला, जीवा बांधणे. उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, कुणी गावे उद्याच्या, आशेचे गाणे उगवतीच्या पोटी लपले, अंधाराचे लेणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, बेधुंद होऊन छेडावे, उगीच का तराणे भैरवीचे सूर घेते, अखेरीचे गाणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, -- सागरलहरी

"स्वामी तिन्ही जगाचा"

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 30/08/2013 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
गोंडस रुप तुझे, घेतले डोळ्यात भरुन। बोबडे तेझे बोल, ठेवले हृदयी कोरुन॥ दुडू दुडू चाल तुझी, पायी खणकतो वाळा। दॄष्ट लागेल म्हणोन, लावला काजळाचा टिळा॥ चिऊ काऊचा करुन, भरविला दुध-भात। पोट भरताच तुझे, धरीसी तू माझा हात॥ काम करता करता, हाती पाळण्याची दोरी। झोप लागावी म्हणुन, ओवी होती ओठावरी॥ लागलास चालायला, आंगण झाले थोडे। होई काळ्जाचे पाणी, जेंव्हा दॄष्टीस न पडे॥ जमविले सवंगडी, खेळ मांडला दारात। जेवायला किती वेळा, बोलाविले मी घरात॥ तहाण भूक विसरुन, खेळ खेळ्ण्यात रंगला। लागला मित्रांचा संग, आईलाच विसरला॥ आईविन नाही माया, असो रंक अथवा राव। ठेच लागताच येते, मुखी आईचेच नाव॥ सर्व मिळेल विक

भ्रांत....?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 30/08/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुना एकांत मनांत भ्रांत, कसे जगावे तुझ्यासवे ? तू गुणांची 'माया' मनाची, ओंजळ फुलांची सुगंधित ! प्रेम मनांत मन बंधनात, विरह आघात पिढ्यानपिढ्या ! मन पारवा ओला गारवा, तरी हा आघात वारंवार ! खंबीर होई विरुद्ध लढाई, तन बंबाळ जखमांनी !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी (सान्गली)
काव्यरस

वेगळी आहे

लेखक कैलास गायकवाड यांनी शुक्रवार, 30/08/2013 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
पारदर्शक वागण्याची आंधळी स्थित्यंतरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे खोल गर्तेतील जाणिव उन्मळावी सारखी संपल्यावरती पुन्हा इच्छा बळावे आणखी सूर्य,तारे,चंद्र सारे टांगलेली झुंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे सुप्त इच्छा गुप्त होता लुप्त झाली वादळे लाट येते लाट जाते की किनारी आदळे वेदना,दु:खे ,निराशा माजली अवडंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे ओलसर अंतर्मनातिल पापणी तर कोरडी धडधडत शिरते उरी संवेदना माजोरडी पोट भरल्यावर कशाने वासरागत हंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे वादळाने वादळागत वादळावे वादळा मी मला जपणार अन जपणार हा गोतावळा जीव गेला ,जावु दे त्याची कुणाला खंत रे वेगळी आहे धरित्र

स्वप्न

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 29/08/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच आसवांना मी रोखुनी पहावे ह्रुदयात गुंफ़लेले ते गीत मी पुसावे समजाविते मला मी, ते एक स्वप्न होते काट्यात गुन्तलेले ते एक फ़ुल होते माझ्यासमोरुनी तो मार्गस्थ सुर्य झाला माझी दिशा तरिही तम होवुनीच उरली फ़सवेच हे तरन्ग मी मानले जीवाचे नजरेसमोर माझ्या,हे स्वप्न भग्न माझे गुंतेल जीव असला मज वाटले ही नव्हते खोटाच तो जिव्हाळा, ते बेगडीच नाते का व्यर्थ दोष द्यावा, सारी अशीच नाती ह्रुदयी विसावली ती , माझी कट्यार होती उधळुनी स्वत्व आता, झाले रिती मनाने तु वाट वेगळी ती ,बघ चालशी सुखाने

अजाणता

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/08/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
अजाणता जाणले कसे इप्सित शब्दांनी मनातले भातुकलीने लक्ष्य वेधले गतकाळात विखुरलेले चिमणी पोपट बुलबुल आदी सवंगडी सारे जमले चित्त हरखले हरली चिंता वय उरले शैशवातले बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले …………… अज्ञात
काव्यरस

राधेचा कन्हैया -

लेखक विदेश यांनी बुधवार, 28/08/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी .. फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी .. पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी .. लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी .. मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी .. पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी .. लिपटे जैसी वृक्षास लता, एकरूप होऊनी गाली लाली क्षणात येई कन्हैयास बिलगुनी .. .
काव्यरस

कृष्ण नाही गोकुळी

लेखक जुईचे फूल यांनी बुधवार, 28/08/2013 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही गंध नाही रास नाही गोकुळी विरह वेड्या गौळणीचा श्वास नाही गोकुळी गोपिकांचे लक्ष भारी दूध लोणी लपविती दूध लोणी चोरण्याची आस नाही गोकुळी सांज वेळी कृष्ण जाई वाजवूनी बासुरी अधर वेड्या बासुरीचा वास नाही गोकुळी मोहनाने मोहलेल्या गौळणीला गाठली कृष्ण प्रेमी गुंगण्याचा भास नाही गोकुळी आठवांचे लोट येती नंदराणी सांगते गोकुळीला जगविणारा त्रास नाही गोकुळी

ज्योती

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीचा दिवा मालवू देऊ नको , प्रज्वलित ठेव ती ज्योत अंतापर्यत I तिच देईल तुला आधार, कार्य करण्या तत्पर होशील तू तयार I अंधारातून मार्ग दाखवते , प्रगतीपथावर ती नेते ,वाट ती किती बिकट , खाच खळगे किती असती त्यावरी I प्रयत्न कष्ट ,आत्माविशासाचा मार्ग दाखवते ती आम्हास, असाध्य ते साध्य कराया सायास , तू जा या वाटेवरुनी उज्वल भविष्याची ती वाट मोकळी I कवी म्हणतो , चालून आली नामी संधी , नाही दवडणार मी कधी , प्रकाश पडला अंतरीच्या मन चक्षुवरी , योग्य दिशा ,मार्ग सापडे त्यास, तेवत राहू दे अंतरीचा दिवा अंतापर्यत I

गुलाब

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब तू राजा असे सर्व फुलांचा, मानही मिळतो तुझ्या गुणांना। सौंदर्याची बरसात करतो आवडतो तू सर्वांना सर्व रूपांत। फूल होता, तू सुकुमार दिसे। साठवता सौंदर्य तुझे, सौंदर्याचा वरदहस्त तुला पहिला मान गुलाबाला, विविध रंग रूप तू घेऊन येतो। आम्हांस तू चकित करतो - प्रसन्न होऊनी आम्ही वाहतो, तुला `श्री' चरणी, दिमाखात, तू कोठेही विराजतो, सौंदर्याने बघणारायाचे मन जिंकतो, किती रंगात रंगून जातो तू, स्वरक्षण करण्या काटे आणतोस तू, जीवनाचे सत्य जाणण्या, काटेरी वाट करतोस तू, तुझ्या सौंदर्याने घायाळ आम्ही, बोचवितो तो काटा तू। आधी काटे मग गुलाब, आधी कष्ट मग सुख हेच शिकवतो आम्हांस तू।।