Skip to main content

कविता

गुलाब

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब तू राजा असे सर्व फुलांचा, मानही मिळतो तुझ्या गुणांना। सौंदर्याची बरसात करतो आवडतो तू सर्वांना सर्व रूपांत। फूल होता, तू सुकुमार दिसे। साठवता सौंदर्य तुझे, सौंदर्याचा वरदहस्त तुला पहिला मान गुलाबाला, विविध रंग रूप तू घेऊन येतो। आम्हांस तू चकित करतो - प्रसन्न होऊनी आम्ही वाहतो, तुला `श्री' चरणी, दिमाखात, तू कोठेही विराजतो, सौंदर्याने बघणारायाचे मन जिंकतो, किती रंगात रंगून जातो तू, स्वरक्षण करण्या काटे आणतोस तू, जीवनाचे सत्य जाणण्या, काटेरी वाट करतोस तू, तुझ्या सौंदर्याने घायाळ आम्ही, बोचवितो तो काटा तू। आधी काटे मग गुलाब, आधी कष्ट मग सुख हेच शिकवतो आम्हांस तू।।

आई

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आई असा एकही दिवस नाही,तुझी आठवण येत नाही, सतत डोळ्यासमोर असते तू ,भू लोकी नसूनही करते पाखरण आमची I मनात हूर हूर दाटून येते ,तू असतीस तर किती बरे वाटले असते, मार्ग दर्शन तुझे लाभले असते ,काही वेळा काही सुचतच नाही I चलबिचल मनाची होई ,तुझ्या फोटो समोर येऊन मी उभा राही, तू गेल्याने झालेले नुकसान कसे बरे भरून येई? मनातील पोकळी कशी बरे भरून येणार ? तुझ्यावर भार टाकून अश्रूंना मोकळी वाट करून कशी देऊ ? प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आई तू , दुरून का होईना पाखरण करतेस तू , माया ,ममता प्रेमाचा तुझा स्पर्श , आठवणीत जपून ठेवला तो, सुरक्षित असे आशीर्वाद रुपी कवच ,सौरक्षण करते आमचे , निर्भय पणे वावरतो आम्

बाबा

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो , स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो । असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो, उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो। माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो , आद्य कर्तव्याची कास धरतो । घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो, दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता, सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो। उच्च अधिकारी होतो तो, गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो। जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।

पुन्हा अनोळखी होऊ .... !!

लेखक psajid यांनी सोमवार, 26/08/2013 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….
काव्यरस

तुही नाही मीही नाही …………. !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/08/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुही नाही मीही नाही …………. प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ……… पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ……… सहजच घडते अशी असते भेट, पण साधला योगायोग कधीच ….

एक आगळी वेगळी पाऊस कविता

लेखक जुईचे फूल यांनी सोमवार, 26/08/2013 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसात तुझ्यावर काही लिहिलं नाही लिहावंसं वाटलं. बऱ्याच दिवसात मनासारखं काही केलं नाही करावंसं वाटलं. तू पडतोच आहेस रे माझ्या लहानपणापासून मीच खूप लांब आले तुला तिथेच सोडून बऱ्याच दिवसात मनाची कवाडं उघडली नाहीत उघडावीशी वाटली. बाहेर सगळे चांगलेच आहेत पण माझे कुणीच नाहीत खरंतर मी सुद्धा परकी झालेय माझी उरलेच नाही बऱ्याच दिवसात आपलं कुणी भेटलं नाही भेटावसं वाटलं. मला वाटलं तू खोटा झालास माझा पैसा खरा केलास पण तू अजूनी तसाच माझा पैसा खोटा केलास बऱ्याच दिवसात बालपण जगलेच नाही जगावसं वाटलं आज तुला पाहिलं पूर्वीसारखंच निरखून आज तुला पहिलं पूर्वीसारखंच हरखून बऱ्याच दिवसात स्वत:ला विसरलेच

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

मनकवडी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 25/08/2013 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आहेस ?…… प्रश्न एसेमेस मसस्स्स….स्त !!………. उत्तर एसेमेस … लिहिलेला "मस्त" हा मुका शब्द गाभ्यातला कातर स्वर लपवू शकला नाही उत्तरकर्त्याचं आत्मभान, स्वाभिमान, उसनं अवसान ओसांडून वहात होतं त्याच्या अंतर्मनाच्या सांत्वनासाठी… मन, स्वत:शी आणि त्याच्याशी एकरूप झालेल्या द्वैताशी प्रतारणा करू शकत नाही व्यक्त अणि अव्यक्त यांतून परिस्थितीनुरूप एकाच भावनेचे भ्रामक अथवा अर्धसत्य अविष्कार घडत असतात त्यातल्या सत्य वाहनाला "टेलीपथी" म्हणतात असे सूक्ष्म संदेश नेमके वाचू शकणारी माणसं "मनकवडी" असतात ……………………. अज्ञात
काव्यरस

तु फक्त एकदा हो म्हण...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 25/08/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
तु फक्त एकदा हो म्हण... तु फक्त एकदा हो म्हण तुझी व्हायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण सगळं जग विसरायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण, सगळं समर्पित करायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.. आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....

असणे नसणे

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 22/08/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यात उगिच सजते असणे अक्षरांत झिंगवते नसणे असणे नसणे ओसांडे मन हसण्यात सदा किण किण श्रावण आभास सदा पथदूर कुठे शोधासा कठिण पडते कोडे मेघावळ पिंजुन एकांती धड धड करते काळिज वेडे आकाश; खोल पोकळ वासा आवेग; न ठावे थांग जसा पवनासाहि ना कळलेले हे वाहतो सवे निशिगंध कसा ………………… अज्ञात
काव्यरस