Skip to main content

कविता

मन रे

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 11/02/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
मन रे धाव रोखुनी घे सरती मागे सोस वयाचे निजलेले ना अजुनी जागे रोज सकाळी सायंकाळी काळ सरकतो मागे मन रे धाव रोखुनी घे……. असलेले ओंजळीतले जग श्वास तयास लगडलेले बघ घे पिउनी अमृत भरलेले ते जितके तितकेच पुरेसे जगण्या अधिक न लागे मन रे धाव रोखुनी घे……. मरण अखेरी शून्य सोबती झुळुक वादळे येती जाती वातीविण तेवे ना पणती धर छाया कळवळते ज्योती व्यर्थ मानवी दंगे मन रे धाव रोखुनी घे……. ……………. अज्ञात
काव्यरस

बरंच बरंच काही...

लेखक जुईचे फूल यांनी मंगळवार, 11/02/2014 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
आकांक्षेच्या भरारीने उजळून निघतं सारं आणि "जगण्या"च्या काळोखात भरडून निघतं सारं मनाला उभारी मिळता मिळता ध्यास कोलमडत जातो हाकेच्या अंतरावरला हेतूही दिसेनासा होतो तरीही... धावत आलो, धावत असतो, धावत राहणार मी भविष्याच्या पडद्याआड साचलेलं पहाणार मी शोधत राहणार सुख-बिख फिरत दिशा दाही तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही जाणीव नेणीवेच्या मधेच मी झुलत राहतो असाच आत बरंच वाटत राहतं, बाहेर काही तिसराच बदलण्याचा आव...

निळा पक्षी (बुकोवस्कीची क्षमा मागून)

लेखक मनिष यांनी सोमवार, 10/02/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
लिहितांना बुकोवस्कीच्या ब्ल्यूबर्ड चा अनुवाद करायचा नाही किंवा संपुर्ण त्या कवितेवर आधारीत कविता लिहायची नाही हे नक्की होतं. नंतर लिहिलेल्या काही कडव्यांवर अर्थातच बुकोवस्कीचा प्रभाव जाणवेल, पण तरीही ती बर्‍यापैकी स्वतंत्र झाली आहे असं मला वाटतं. बुकोवस्की माहित नसतांना जी कविता मनात जाणवली होती पण शब्दात उतरली नव्हती, ती शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केलाय...

आज आसु मझ्या.....

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी शुक्रवार, 07/02/2014 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज आसु मझ्या डोळा आले ते पाहुन हसु तुझ्या ओठी आले क्वचितच घडते असे कधी कधी दुखावतो जेव्हा मीही अधी मधी कणखर म्हणवतो पुरुष आम्ही स्वतःस तरी अलगद फसतो अशाच हळव्या क्षणांस मग येतेस तु जवळ ठेवतेस डोक्यावर हात नकळत सांगुन जातेस आहेना माझी साथ मीही मग हसतो हलकेच श्वास सोडतो ठेवतो अलगद डोके ओंजळीत तुझ्या..... - कवी म. ना. दे.

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला - झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 07/02/2014 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या तळटीप : नमस्कार हे उघड्या पुन्हा जहाल्या या उमाकांत काणेकर लिखीत गीताचे विडंबन आहे. हे विडबंन सुचण्यासाठी पळसाला पाने तीनच या मि.पा.
काव्यरस

ऋण

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 07/02/2014 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
भांबावतो कल्लोळ. माझ्या उरात दडू पाहतो. पाहता पाहता नभही अलगद झाकोळून येतं. आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो... तुझा माझा मांडलेला पसारा पाहते. त्यातून स्वत:ला निर्लेपपणे बाजूला काढायचं ठरवते. हळूच एक प्रश्न डोकं वर काढतो, विचारतो, कधी चुकतं करशील तुमच्या नात्याचं देणं? परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं, ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...
काव्यरस

चिमुटभर

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 06/02/2014 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी ………………अज्ञात
काव्यरस

एक गीत

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 06/02/2014 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर, आज बर्‍याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे. ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे, परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे ! एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की, अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे? हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले? तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे? बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा, ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे! पुढील कडवे मात्र नवीन आहे बघ तुझा हात फिरे, आंधळ्यास ये दृष्टी, ये फिरुन परतुनी, डोळ

संत मीराबाईची विराणी

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 03/02/2014 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही|| पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग| चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग|| पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला | कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला|| जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको| विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको|| अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा| बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा|| राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो| विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||
काव्यरस
Taxonomy upgrade extras

पांडुरंग

लेखक आतिवास यांनी सोमवार, 03/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
बेल वाजली.. ’आत्ता या वेळी कोण?’ चडफडत दार उघडले, तर समोर पांडुरंग - मला म्हणाला, “बोल". कटेवर हात नव्हते, पायाखाली वीट नव्हती, चंदनाचा टिळा नव्हता, भोवती भक्तीचा मळा नव्हता. मी म्हटले, “या, बसा. सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर, पण उगीच दांभिक देवत्त्वाचा आव आणू नका.” “हे तर लई बेस झालं" म्हणत तो विसावला, आरामखुर्चीत बसून गॅलरीतून दिसणारा आकाशाचा तुकडा न्याहाळताना हरवून गेला. त्याने मला प्रश्न विचारले नाहीत, मीही नाही. त्याने मला उपदेश केला नाही, मीही नाही. त्याने स्वत:भोवती एक अदृष्य भिंत रचली, मीही तेच केले. माझ्या सहवासात त्याने स्वत:चे एकाकीपण मनमुराद जपले - मीही तेच केले. तरीही आम्ही