Skip to main content

कविता

निरलस

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 20/01/2014 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते ………………. अज्ञात
काव्यरस

पारा

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 17/01/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
...पारा तुझ्या पावलांची इथे खुण अजुनी पडे पावलांना तुझी भुल अजुनी नभी कल्पनेच्या उन्हाचा धुराळा तुझ्या सावलीला उरे प्राण थोडा दिशांच्या उरी वादळाची कहाणी उरे जन्म आता दिव्याच्या ठिकाणी फुटे प्राण उल्केसम वेदनेला फुलांच्या उरी दाटतो घाव ऒला तुझा शब्द प्राणातुनी साद देतो जुन्या मैफिलीची जुनी य़ाद देतो तुझे ऒठ हळव्या मदाच्या मशाली रुधीरातुनी वाहते तप्त लाली उङो सप्तरंगी निशेचा धुराळा असा चंद्र श्वासातुनी माळ थोडा तुझे गात्र॑ गात्र लपेटून घेतो तुझे भास श्वासात माळून घेतो मिठीने सरावा युगांचा दुरावा इथे ज्न्म अवघा फुलांचा उरावा फिरे कालचक्रावरी उष्ण पारा .. उरे फक्त थोडा मिठीचा किनारा ड

मन अंतर्मन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 17/01/2014 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
उगवतीस क्षितिजावर हसते दिसते लोभस मोठे मावळतीला पुन्हाहि हसते पण ते खोटे खोटे दोन ध्रुवांची विलग अंतरे सलग न वाटे कोठे दिशा चुम्बकांच्या ऐशा अंतरात साटे लोटे कुणास ना ठाऊक कसे हे काळिज धडधडते क्षण एका भेटीस्तव मन अंतर्मन धडपडते ……………………… अज्ञात
काव्यरस

सैनिक

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 13/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा संपल्यावरही केबिनमध्ये  दिवा जळता ठेवून  योजना आखत राहणारे मुख्याध्यापक  कलत्या दिवसावेळी दमून येऊनही 'पुस्तक हवे' म्हणल्यावर  उत्साहाने सायकल काढणारे बाबा  तापाने फणफणत असूनही  थंडीत चार वाजता उठून  अभ्यासाआधी चहा देणारी आई स्वत:ची दिवाळी मनाआड टाकून  माझ्यासारख्या अनेकांना  उत्सवासाठी घरी नेणारा एसटीचालक महायुद्धाच्या पटावरचे लक्षावधी छोटे सैनिक  कदाचित असेच असतील नाही?…  जीव विझू आला तरीही  शेवटच्या श्वासापर्यंत….  मनापासून कर्तव्य बजावणारे !  -- अमेय

प्रीत खुळी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 12/01/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचीत कशी कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी मेघ दाटल्या नभओळी अंगणी सणाची रांगोळी वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी ……………………… अज्ञात
काव्यरस

अपेक्षा

लेखक मि मिपाचा मित्रच यांनी शुक्रवार, 10/01/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार माझा मिपा वर हा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न .. काय लिहावे असा विचार करत असताना वृद्धाश्रम वरील शतशब्द कथा वाचली आणि खालील कविता - संग्रही असलेली - आठवली ,कविता खूप जुनी आहे, मी लिहिलेली नाहीय - पण भावना पोहचवण्या साठी अश्या गोष्टींची गरज नसते.. स्वतःचे लिखाण नसेल तर ते मीपा वर टंकता येते कि नाही हे माहित नाही, हि कविता या आधी मिपा वर पूर्व-प्रकाशित झाली आहे कि नाही ते पण माहित नाही. जर अशी परवानगी नसेल किंवा पूर्व प्रकाशित असेल तर आधीच क्षमस्व. !! अपेक्षा !!

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 10/01/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

काळजातली धग विझु देउ नकोस.......

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी गुरुवार, 09/01/2014 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रश्न विचारावासा वाटतो देवा तुला असा कसा संसाराचा गाडा तु उभा केला कुणी न जिंकती कुणी न हारती कुणी न हसती कुणी न रडती सारेच अभिमन्यु इथे नशिबाच्या चक्रव्युहात अडकती पैजांचा असतो डाव तीन पत्त्यांत रंगतो खेळ इथे कुणाचे कुणीच नसती फक्त असतो हाता-तोंडाचा मेळ क्षितीजाच्या वाटेवरती डोळे सारेच लावुन बसतात तोच सूर्योदय पुन्हा सूर्यास्त मनातल्या मनात हसत राहतात ठिणग्यांची कमतरता इथे अगदीच आहे असे नाही पण सारे रानच पेटुन उठावे असे काही घडतच नाही अद्याप घंटानाद होतोय गाभारी देवा तुझ्या अद्याप आस लावुन बसलोय पायरीशी देवा तुझ्या तुच आता ओढुन आण लाट वादळांची एखादी मुठी वळु दे नसा तापु दे होउन जाउ

नविनच

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 07/01/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे हे जरा नविनच होते चिंब होऊनही मी धुंद न होणे हे जरा नविनच होते . हा कुठला नवा खेळ? . दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो 'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो ढग फुटून 'तो' असा काही बरसतो त्या गंधाने मी आकंठ मोहरतो . नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो सचैल भिजून भान हरपतो कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते मनात वसंत रुंजी घालाया लागतो मग आजच असे का व्हावे? . हा वर्षाव कोरडा का वाटावा कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा . . हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती तो तुझ्या घराला टाळून आला होता हे जरा नविनच होते....
काव्यरस

क्षण

लेखक चाणक्य यांनी रविवार, 05/01/2014 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी किरणं अंगावर पडली तशी त्याची चुळबुळ सुरु झाली किणकिण्या डोळ्याने पाहिले त्याने आजूबाजूला आज नेहेमीपेक्षा जरा जास्त लख्ख वाटत होतं काय की... थोडं जास्त दिसतही होतं पण तरी अजून काही पहावं असंही वाटत होतं त्याला धडपडत ऊठलं ते आपल्या चिमुकल्या पायांवर तोल सांभाळत आजूबाजूच्या अनुभवी जीवांना कळलं आता काय होणार आहे ते त्यांना एकीकडे आनंदही होत होता आणि थोडं दु:खही कारण आज 'तो' दिवस होता... कुठुनशी एक आदिम ऊर्जा अंगात भरून झोकून दिलं त्याने स्वतःला आसमंतात त्याने....त्या पक्ष्याच्या ईवल्याश्या पिल्लाने आणि ऐकू आली ईतर अनुभवी पक्ष्यांना ती चितपरीचित फडफड पंखांची 'मी उडालो आई' 'हो रे पिला, तू उडा