Skip to main content

कविता

कश्या कश्याला मुकलो ते...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/02/2014 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो.. समोर तु उभी प्रसन्न वदना. मोकळा केश संभार. काजळ कोरलेले आतुर नयन आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते.. तुला पाहिले अन उमगले. कश्या कश्याला मुकलो ते...

बसा की एकदा खुर्ची वरती

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/02/2014 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५.१२.२०१३ ला ही कविता भावी मुख्य मंत्री साठी लिहली होती. दिनांक २८.१२.२०१३ ला श्री केजरीवाल मुख्य मंत्री बनले. त्यांचे मुख्य मंत्री बनण्याचे आणि वनवासी होण्याचे भाकीत खरे ठरले. च्यायला आपण बी जोतिषी झालो. कसला राव विचार करता बसा की एकदा खुर्ची वरती तोडा आकाशीचे तारे पूर्वा हौस जनतेची. विजेची बिल कमी करा मुफ्त मध्ये पाणी द्या दाखविलेले स्वप्न जनतेला तोडू नका हो राव तुम्ही. पुकारते ही खुर्ची कसी होऊ नका हो वनवासी औलीयाची श्रापित वाणी करू नका हो पुन्हा खरी. औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला.
काव्यरस

निर्मोही

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 17/02/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
अंशात तुझ्या वसलो मीही वाहिले हवे ते निर्मोही समिधा सुखदा अक्षत ग्वाही आतंक मनी कुठला नाही मन अबोलसे स्वर विकलांगी प्रतिमा न कधीही एकांगी ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी हृदयात वलय लय शतरंगी लाटेस काठ हळवा म्हणुनी खेळते किनाऱ्यावर पाणी भारती ओहटते ओघळुनि डोहात माणकांच्या खाणी ………अज्ञात
काव्यरस

घाव

लेखक लाडू यांनी सोमवार, 17/02/2014 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यांतुनि तयांच्या त्यांचेच भाव होते हातात गोंदलेले त्यांचे न नाव होते लटकेच हासणे अन् खोटे मुरडणे ते अंगात भिनलेले सगळे बनाव होते शुक् शुक माझ्या कानी चारीकडून आली मी एकटाच होतो त्यांचेच गाव होते हातात हात कोणी घेऊन जात होते जणु आपसांत त्यांचे जमले ठराव होते शरिरातल्या भुकेचा बाजार पाहताना का वेदना निघाली, माझ्या न घाव होते
काव्यरस

नाते आपुले तसेच आतून...

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 16/02/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
जसे फुलावे रंग साजिरे श्यामनिळ्याच्या मोरपिसातून मुके तरी मोहाहुन मोहक नाते आपुले तसेच आतून.. मी मुरली तू सूर खुळासा मी यमुना तू माझी खळखळ तू कविता, मी तुझ्या आतली आर्त खोल दडलेली तळमळ तू कान्हा मी अधीर राधा राघव तू मी तुझी मैथिली नर्तक तू मी नुपुर नादमय छुमछुमणारे तुझ्या पाऊली भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. © अदिती जोशी

भविष्य

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 16/02/2014 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
कुठूनतरी सरकावी वाळू, भुकंपासारखी धसावी जमीन आतल्याआत. सार्या आसमंताने ढुंगण हलल्यासारखे हेलकावे द्यावे.

कै. भाऊसाहेब पाटणकर

लेखक शरद यांनी शनिवार, 15/02/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरील लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी भाउसाहेबांचा पहिला शेर-ओ-शायरीच्या वाचनाचा कार्यक्रम पुण्यात साहित्य परिषदेच्या सभागृहात झाला. प्रा. क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. आम्ही २५-३० ऐकावयास. काय बहार आली. सर्वजण मंत्रमुग्ध. पण वाहवा म्हणावयास आम्ही पोरेच. थोडे ज्येष्ठ खुश होते पण दाद देण्यास थोडे मागेच. लगेच दुसर्‍या दिवशी शोधून "मराठी शायरी" मिळवळी. बहुतेक दुकानदारांना पुस्तकाचे नावच माहीत नव्हते.. वाचून झाल्यावर लगेच परत जाऊन १२ रु. खर्च केले व ४ प्रती विकत घेऊन मित्रांना वाटल्या. नच तरी माझी प्रत नाहिशी होणार होतीच.

टेंडर

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 15/02/2014 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
टेंडर काढा....साहेब म्हणाले त्या सरकारी कार्यालयाची भिंत ओल पकडत होती गेले काही महीने एक वेळ छप्पर गळकं असलं तरी चालतं पण आधार देणा-या भिंतीच जर कमकुवत झाल्या तर कसं चालेल...नाही का? तर टेंडर काढा...साहेब म्हणाले...भिंती रंगवून घेऊ . . . रंगारी आले मग भिंत केली साफ घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट सगळं सगळं काढलं आणि दिला रंग छानसा शेड तीच पण तरी छान वाटत होतं सगळ्यांना घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट गेलं परत आपापल्या जागी साहेब खुश...काहीतरी काम झालं ऑफिसात म्हणून पण पंधरा एक दिवस आणि प

... तुझ्यासाठी बहर होते

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 13/02/2014 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे वस्ती न घर होते.. मला सारे शहर होते तुझ्यासाठी र्रुतू सारे,तुझ्यासाठी बहर होते दिला तू कोणता प्याला, फुटे हा प्राण म्रुत्यूला.. कळेना काय ते होते: दवा होती, जहर होते.. घरांचे बंद दरवाजे, कुणी माणूसही नाही.. सुन्या गावात म्रुत्यूचे किती वेडे कहर होते ! नको कोठेच अश्रूंना मिळू दे माझिया थारा तुझी दुःखे सुखी होती : तुझे अश्रू अमर होते जरा पाहून घे राणी र्रुतूंच्या जिर्ण तसबीरी कधी येथे फुले होती, कधी येथे भ्रमर होते अता मी वेचतो आहे तुझ्या विरहातले मोती मला स्मरते युगे होती ..तुझ्यासाठी प्रहर होते ! डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

रंग

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 12/02/2014 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेख कलाकृती, ईश्वरी निसर्ग छंद कणा काणात दाटला, खुलला रंग रंग ll १ ll निळ्या नभावरी, आरंभ लख्ख सूर्य कृष्ण रजनी मिरवी, तारका शुभ्र रंग ll २ ll सृष्टी पांघरे, वनराई गर्द हिरवाई तेथ नटले कितीक, सुबक पंख रंग ll ३ ll निळ्या गगनातळी, खळाळे जल निळाई गूढ तयात मिसळती, जीव कैक रंगारंग ll ४ ll उन्हात माळवरती, देह वृक्ष निष्पर्ण निरोप सावळा मेघ, उमेद जीवनरंग ll ५ ll नाजूक धागा नात्याचा, भासता जीर्ण समेट घट्ट सांधितो, पुन्हा प्रेंमरंग ll ६ ll सोसता एकांत, व्यथा वा दर्द तो आधार एक, भावभक्ती पावन रंग ll ७ ll - सार्थबोध www.saarthbodh.com