मन रे

अज्ञातकुल जे न देखे रवी...
मन रे धाव रोखुनी घे सरती मागे सोस वयाचे निजलेले ना अजुनी जागे रोज सकाळी सायंकाळी काळ सरकतो मागे मन रे धाव रोखुनी घे……. असलेले ओंजळीतले जग श्वास तयास लगडलेले बघ घे पिउनी अमृत भरलेले ते जितके तितकेच पुरेसे जगण्या अधिक न लागे मन रे धाव रोखुनी घे……. मरण अखेरी शून्य सोबती झुळुक वादळे येती जाती वातीविण तेवे ना पणती धर छाया कळवळते ज्योती व्यर्थ मानवी दंगे मन रे धाव रोखुनी घे……. ……………. अज्ञात
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

4 टिप्पण्या 1,147 दृश्ये

Comments

आयुर्हित नवीन

घे पिउनी अमृत भरलेले ते जितके तितकेच पुरेसे जगण्या अधिक न लागे १००% सहमत एकदा जर अमृत पिले तर मरणाची कसली आली भीती? पण "मन रे धाव रोखुनी घे" हे काही पटले नाही. नकारात्मक का झालात आपण आज? रोज सकाळी सायंकाळी काळ सरकतो मागे:-- तर अजून जोरात धावयाला हवे, नाही? धर छाया कळवळते ज्योती व्यर्थ मानवी दंगे:---हे तर डोक्यावरून गेले

अज्ञातकुल नवीन

In reply to by आयुर्हित

तुमचं काही अंशी पटलं मला. म्हणजे मला जे अभिप्रेत आहे ते नीटसं मांडालं गेलं नाही असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे मी. खर तर हे नकारात्मक नाहीये. जगण्यापुरेसं मिळाल्यावर त्यामागे अधिक धावणं थांबव असं हे मनाला केलेलं अर्जव आहे. "मानवी दंगे" म्हणजे मनात उठणारी द्विधेची वादळे आता थांबली पाहिजेत आणि जन्माच्या उद्दिष्टांचा शोध घ्यायला हवा म्हणून " धाव रोखुनी घे " आणि मरणाच्या आधी त्याचा प्रयत्न कर असा आशय मला उधृत करायचा आहे. आपल्या प्रांजळ मतांचा मी मनापासून आदर करतो. असाच लोभ असू द्यावा. :)