पत्रं
( काही वर्षांपूर्वी लिहिलेली आहे ... आत्ता आठवली )
पत्रं लिहिण्यास कारण कि ...
आजची सकाळ खूप छान होती
कसलीच मला घाई नव्हती
घड्याळाचा बंद करून गजर
ठरवले लवकर उठायचेच नाही |
रोजची धावपळ , गोंधळ गडबड
ऑफिसची वेळ गाठायची धडपड
त्यातच सतत वाजणारा फोन
माझ्यासाठी अजिबात नसते सवड |
संध्याकाळची ही न्यारी तऱ्हा
सगळेच प्लान्स - तीन - तेरा
अर्जंट मिटींग , कॉन्फरन्स, कॉल्स
संपता संपता रात्रीचे बारा |
आज मात्रं तसे काहीच नाही
कारण तुझी ती अमेरिकावारी ..
स्वैपाकाला सुट्टी, शाळेला बुट्टी
आनंदी आनंद - घरी अन दारी |
पण माहीत नाही असं का ?
मिसळपाव
सांगू का ?
मी कसा अन तू कशी ?
तुटता निद्राबंधन
करिता मुखमंजन
ब्रश मी अन पेस्ट तू शुभ्रशी-
सका-सकाळी
चहाच्या वेळी
कप मी अन तू बशी !-
करावया ईशचिंतन
धूप मी, तू निरंजन
तैसेचि टाळ मी, घंटी तू मधूरशी!-
नळाभोवती
भाजन जमती तिथे
हंडा मी अन तू कळशी !-
भोजन पंगती
आपण संगती
वाटी तू या ताटापाशी !-
होता उदरभरती
चढली सुस्ती
तक्क्या तिथे मी अन तू उशी !-
उद्यानी त्या सायंकाळी
रमणीय स्थळी
भ्रमर मी, तू कळी इवलीशी !