ते...

लेखनविषय:
ते हायेत आपलेचं असं समजुनं वागलो केला इस्वासं म्हनून असे भिकीले लागलो फोळं ये लोक हाताले असं दयन दयलं पिठं भरुन नेतानी आमी त्याईले पायलं ताट आमच्या नावाचं सफा त्याईनच केलं खाली सांडलं खर्कटं तेई सावळूनं नेलं तेल घालून डोयात केलं पीकाच राखन देठा लांबोला त्याईनं ठुली आमाले आकन शिसी बसले ते आता जीव काताऊनं गेला हेला पखाली चा शेवटी पानी वाहू वाहू मेला

ती त्सुनामी...

लेखनविषय:
काव्यरस
सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते प्रलयतांडव ती त्सुनामी आतले उधळून जाते साचले सांडून जाते घडविले उखडून जाते वेचले विखरून जाते मांडले मोडून जाते ....ती त्सुनामी विप्लवी पण केवढे शिकवून जाते !

एक सल नेहमीच - भावानुवाद

लेखनविषय:
एक सल नेहमीच एक दरवळ नेहमीच अंगावरून जातो डोळ्यांदेखत नेहमीच एक काठ नदीचा भरतो एक नाव नेहमीच किनाऱ्याशी थडकते एक रीत मला नेहमीच, लांबून खुणावते मी आहे तिथेच बसतो एक दृश्य नेहमीच, धूळीत साकार होते एक चंद्रही नेहमीच खिशात सापडतो धिटुकली खार झाडावर सूर्य गिळून घेते हे जग तेव्हा नेहमीच वाटाण्याएवढे भासते एका तळहातावर जणू अलगद मावते मी आहे तिथून उठतो एक रात्र नेहमीच, मुंगीच्या पावलांनी येते एक हसणे नेहमीच झुळूकीसारखे वाटते एक नजर नेहमीच उबदार कानटोपी चढवते एक गोष्ट नेहमीच पर्वतासारखी दिसते एक नीरवता नेहमीच मला गुंडाळून ठेवते मी जिथे असतो तिथून चालू लागतो एक सल नेहमीच, प्रवास होऊ

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

लेखनविषय:
काव्यरस
बघ जरा झोळीत माझ्या काय आहे…. ....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे ….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे ….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे ….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे ...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे …शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे …फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे …वास्तवाला तोलणारे यंत्र आहे … प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे …अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे ....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ... ....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे…. .....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे

जपमाळ

लेखनविषय:
काव्यरस
हेही बरेच आहे, तेही बरेच होते, आपापल्या परीने, सारे खरेच होते मोजून पाप माझे जपमाळ ओवलेली, मोक्षास गाठण्याला, तितके पुरेचं होते, आयुष्य तारकांचे मोजीत रात्र होती मोहक असे मनाला भूलवीत बरेच होते खाणीत नांदण्याचा कोळश्यास शाप आहे नसते ठिसूळ तुकडे तर तेही हिरेच होते सरणास भेटताना गेली नजर मागे चेहरे ओळखीचे हसरे सारेच होते -शैलेंद्र

चंद्रमण्यांचे पाझर

लेखनविषय:
काव्यरस
आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल

अहेवपण ...

लेखनविषय:
काव्यरस
कातरवेळी अस्वस्थ मनाला दुरच्या दिव्यांची वाटे आस स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा कितीक स्मरती हळवे भास उगाच ओठी शब्द अडकती दूर कोणी कोकिळ बोलतो तुडुंब मनाचे आगर भरतां उद्रेकाला मग वाट शोधतो नाद खगांचे, स्वर समीराचा कातळडोही अनाम खळबळ विजनवास व्रतस्थ मनाचा गर्द सावल्या सावळ सावळ पैलतीरी उभे दुत प्रकाशी कुणी छेडले सनईचे सूर अहेवपण सजले सरणावर प्रिया मनी हे कसले काहूर? © विशाल कुलकर्णी

*बालदिन *

लेखनविषय:
*बालदिन * हासूया खेळूया नाचूया गाऊया आनंद घेऊया मुलांसवे कोवळ्या निरागस मुलांपासून मिळते आम्हा सुख नवे पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज म्हणती त्यास बालदिन मुले असती फुले देवाची होऊ त्यांच्यात तल्लीन मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू सद्विचारांचे शिंपण करूनी उद्याचे आदर्श नागरिक घडवू --शब्दांकित (वैभव दातार ) १४ नोव्हेंबर २०१७
Subscribe to कविता