Skip to main content

कथा

हरवले मधुमुरलीचे सूर.........

लेखक तिरकीट
गुरुवार, 12/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.

मेरे सामनेवाली खिडकी मे... ३

लेखक वडापाव
गुरुवार, 12/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे सामनेवाली खिडकी मे मेरे सामनेवाली खिडकी मे... २ ********* या संपूर्ण कथेत माझ्या मनाची ब-याचदा द्विधा अवस्था झाल्याचं मला स्वतःलाच लेखन करताना लक्षात येतंय. आता, ओळख झाली, त्यात नंबरही मिळाला. मी समोरच राहतो म्हटल्यावर ती गोड हसली होती. त्यामुळे तिला पाहायची, तिच्याशी बोलायची इच्छा अजुनच बळावत चालली होती. पण त्याचवेळी आता किचनाच्या खिडकीतून तिला बघत बसण्यासाठी मन धजेना. मी आता कमालीचा धास्तावलो होतो. जर त्या रितेशऐवजी तिने मला तिला बघताना पकडलं असतं तर?? तसं तिनं एकदा पकडलंही होतं म्हणा.

मेरे सामनेवाली खिडकी मे... २

लेखक वडापाव
रविवार, 08/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे सामनेवाली खिडकी मे ***** ती बसली होती. मी तिच्या समोर बसलो होतो. ती माझ्याकडे बघून हसत होती. मी तिच्याकडे बघून हसत होतो. तिने माझ्याकडे बघत बघत मला हनुवटी खाली करून जवळ बोलावलं. मी हळूच सरकत तिकडे गेलो. माझी छाती धडधड करत होती. मी जवळ गेलो. ती लाजली. हसली. माझ्या छातीतली धडधड वाढली. मग तिनं एक हात माझ्या खांद्यावर ठेवला, आणि दाबला. मी त्यामुळे जरा खाली झालो. तिने माझ्या कानाजवळ दुस-या हाताचा कंस केला आणि तिचे ओठ माझ्या कानाच्या अगदी जवळ आणले. काय सांगेल ही आता मला? खरंच काहीतरी सांगणार आहे की दुसरंच काहीतरी करणार आहे?

श्री - भाग १

लेखक मीता
रविवार, 08/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
"श्री आपण नाही भेटू शकत आता कधीच" "पण का ? मला बोलायचं आहे खूप तुझ्याशी." "तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे . " "मीतू तुला एक सांगू ? " "सांग ना." "तू तशीच आहे माझ्यासाठी जशी भेटली होतीस पहिल्यांदा .काहीच नाही बदललं. सोडून गेलीस तेव्हा खूप राग आला तुझा. खुप तिरस्कार केला .पण तुझ्या वर प्रेम करणं नाही थांबवू शकलो." "आपण या विषयावर नको बोलूया आता ." "मीतू नीट राहशील ना ?

एकमात्र

लेखक जयनीत
शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गम घाटातील अरुंद वाटा, कठीण चढ अन खडकाळ जमिनी वरून तोल सांभाळत चालतांना जनावरे दमुन जात, सर्वांगातून घामाच्या धारा लागत, अतिश्रमाने जनावरांचे तोंड फेसाळून येई, जनावर अतिशय गलितगात्र होऊन जाई. भूताच्या फे-यावर पोहोचल्या वर मी मी म्हणणा-या निधडया छातीच्या गाडीवानांच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय रहायचे नाही. घाटातील ह्या दोन वळणात उंचच उंच कड्याकपारीं अन खोल खोल द-या खो-यातून घोंगावणारे वारे, घनदाट झाडीतील पानांची सळसळ, दूरवर कोसळत असलेल्या धबधब्याचा आवाज ह्या सगळ्यांनी अनेक स्पंदने निर्माण होत. अशी स्पंदने आणि छाया प्रकाशाचा खेळ भूताच्या फे-यात जरा जास्तीच गूढरम्य विभ्रम निर्माण करीत असे.

अधुरि एक कहानी भाग-४

शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने पक्याला आपल्या कॉलेज साठी गाव सोडावे लागले.त्यापूर्वी ती आणि पक्या एकदाच भेटले होते,हां पण दोघांच्याही कुटुंबासोबत...पण पक्या जवळ इतके धैर्य नव्हते की तो मनातील तिला बोलू शकेल.तिलाही माहीत होते की याच्या मनात काय आहे आणि यालाही माहीत होते की तिच्या मनात काय आहे !पण कुणी मात्र बोलायला तयार नव्हते. काळ त्याच्या वेगाने पुढे सरकत गेला.गाव सोडल्यावर पक्या चे कशात मन लागेना.सारखी तिची अबोल प्रीत त्याला खूणावत् असे.२ वर्षाच्या गॅप नंतर दोघे ही त्याच शहरात पुन्हा एकदा भेटले.तिचे कुटुंब ही आता तिथेच आले होते राहायला.पक्याला आणि तिलाही बरे वाटले.पण मनातील कुणीच काही बोलेना.अबोल प्रेम तसेच सुर

अधुरि इक कहानी भाग-३

शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणता म्हणता दिवस जाऊ लागले आणि मग पक्याला हवी ती संधी मिळाली....तिच्या घरी जायची ! संक्रांतीचा तिळ-गुळ द्यायला तेव्हा सगळी मुले-मुली १४जानेवरीच्या सायन्काळी परिचितांच्या आणि गावातील सगल्या शिक्षकांच्या घरी ही जात.पक्याच्या घरीही येत सगळी मुले-मुली.आणि या पेक्षा उत्तम कारण पक्या ला कुठले मिळणार होते? झाले पक्याची सकाळपासूनच तयारी सुरू होती.कुठला ड्रेस आज घालायचा यावर १० वेळा विचार करून झाला होता.केस ही अगदी तेल लावून चोपून कोंबडा बनवून बसवून घेतले होते ठीक ठाक.

अधुरी एक कहानी- भाग-२

शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पक्या आपल्ल्या कथेचा नायक,तसा १० वीला होता यंदा.वर्गातील नव्हे तर शाळेतील एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेला होता.आणि का असु नये,अहो शिक्षकाच्या घरात जन्माला आलेले २ रे रत्न होते ते.अगदी सरळ रेषेत जीवन जगणे त्याने लहानपनात शिकून घेतले होते.छोट्याश्या गावात शिक्षकाला खूप आदराने पहिले जाते.साहजिकच पक्याला ही लहानपणीच याची जाणीव पदोपदी होत राहिली आणि मग सरळ रेषेत जीवन जगणे काय असते,याचे चपखल उदाहरण बनून गेला आपला पक्या!त्यामुळे आपल्याला मिळणारा मान हा आपला नसून आपल्या तीर्थरूपानमुळे आहे हे त्याला नेहमी लक्षात ठेवावे लागे. त्यामुळे बालपण कसे अगदी शिस्तीत गेलेले.

मेरे सामनेवाली खिडकी में...

लेखक वडापाव
गुरुवार, 05/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईला बागकामाची आवड आहे. पण आम्ही तिस-या माळ्यावर राहात असल्याने, तळमजल्यावर जी मंडळी राहतात त्यांनीच बिल्डींगच्या आजुबाजुच्या परिसरात त्यांची(कसं आहे ना लोक झाडांवरही हक्क सांगतात) झाडं लावलेली आहेत. त्यामुळे आईला तिची हौस घरच्या घरीच खिडक्यांत कुंड्या लाऊन भागवावी लागते. किचनमधल्या ('स्वयंपाकघरात' असं म्हणणं आणि लिहीणं दोन्ही वेळखाऊ) खिडकीत एक लांबलचक मोठ्ठी चौकोनी कुंडी आहे. याला आम्ही खख म्हणतो (खताचा खड्डा). इथे भाज्या-फळांची सालं, बिया, उरलेला भात, शिळी पोळी, नासका पाव - थोडक्यात जे जे काही टाकाऊ आणि विघटनशील आहे ते इथल्या मातीत टाकतो.