इच्छापूर्ती..! (कथा)
छे ! वैताग आला आज हातात बाईक नव्हती तर ! कॉलेजला जातोय तेंव्हापासून विनाबाईक हा पहिलाच प्रवास. तुम्ही म्हणाल - मग घरी बसावं. पण नाही, अण्णांनी उभारलेला ज्ञानवृक्ष आणि त्यांच्यातील मायाळू - मनमिळाऊ प्राध्यापकांशी हितगुज नाही झालं तर चुकल्या - चुकल्यासारखं होतं. माणसांच्या वाळवंटात भरकटलेल्या कोकरागत मन कासावीस होतं. म्हणूनच हातात बाईक नसतानाही कॉलेजला आलो होतो. खूप दिवसांनी आज बस चा प्रवास अनुभवला होता. आता घरी जाताना रिक्षाने जावे म्हणून रिक्षा स्टेन्डकडे चाललो होतो. मारुती चौकातून दोनच मिनिटाच्या अंतरावर रिक्षा स्टेन्ड होते. चौकात येउन सहज डावीकडे नजर गेली.
मिसळपाव