Skip to main content

कथा

अधुरी इक कहानी....

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी बुधवार, 04/12/2013 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आधुरी एक कहाणी अचानक येनारी वळवाची सर जशी आसमंतात एक अनमिक थांडवा देऊन जाते काहीशी तशीच अनुभूती, तिचे पहिले वाहीले दर्शन त्याला देऊन गेली!भाणावर आला त्यावेळी कळले की तो शाळेच्या मैदानावर आहे आणि त्याचे वर्गमित्र त्याला बोलावत होते.कुठल्याही १६-१७ वर्षाच्या किशोर्वयीन मुलाचे व्हावे तसेच झाले त्याचे पण !मन कुठेच रमेना...कुणाला विचारू ते कळेना.......पण विचारू काय तेही सुचेना !तसाच घरी आला,पण रात्रभरसारखे तीचेच रूप डोळ्यासमोर!डोळे उद्या पुन्हा तिला बघायला आसुसलेले! ती दुपारी दिसली होती म्हणजे हे नक्की होते की तिची आणि त्याची भेटी नक्कीच दुपारी होईल!पण राहून राहून त्याला इक प्रश्न सारखा सतावत होता

कथा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 03/12/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो.

'आधारा' ची रात्र

लेखक विशाल चंदाले यांनी बुधवार, 27/11/2013 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्याच्याला आपल्या गावात आंधाराची रात हाये हो... ओ ओ ओ..." "तरी समद्यांनी उद्या सांच्याला ७ वाज्त्ता चावडीवर हजर राहंच हाये हो ...ओ ओ ओ..." "येताना समद्यांनी विलेक्शन कारड आनाचं हाये हो.... ओ ओ ओ..." म्हादूनं हलगी वाजवत दवंडी द्यायला सुरुवात केली तसं चावडी जवळ खेळणारी पोरं सगळी खेळ थांबवून एकमेकाकडे बघून हसायला लागली. त्याचं कारण हि तसच होतं, त्यांनी त्यांच्या उभ्या जन्मात दवंडी कधी ऐकली नव्हती. जवळ जवळ सगळ्याच पोरांना हि गोष्ट नवीन होती. म्हादू जसा चावडीकडून पुढ निघाला तसं सगळे पोरं एखादी नं बघितलेली गाडी गावात आल्यावर कसं मागे जातात. तसं त्याच्या मागे जायला लागली.

हे इकडचे भैये ते तिकडचे भैये.

लेखक सचीन यांनी बुधवार, 27/11/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १ "काय,जोशी साहेब कसे आहात थकलेले वाटताय "ऑफिस वरून येणाऱ्या जोशींना सानेनी विचारले.'अहो ,काय करणार साने साहेब ,मध्यावरच छोटस स्टेशन आपले.सकाळी गाडीत चढायचे वांधे तर संध्याकाळी उतरायचे. 'अहो चालायचच शहरे म्हटली कि अस व्हायचच'साने उतरले. 'अहो साने साहेब, गर्दी किती वाढलीय. फक्त मुंबईच नव्हे तर पुणे नाशिक ह्या ठिकाणाची गर्दीही बरीच वाढली आहे. ह्याला कारणीभूत ' भैये' युपी बिहारचे' जोशी म्हणाले. अहो हे भैये आपल्या इथे मोठ्या संख्येने येतात साऱ्या शहराची वाट लावून टाकलीय यांनी.ह्यांच्यामुळे आपले तरुण बेकार राहतात. अहो मिळेल त्या पैशावर काम करतात सोळा सोळा तास राबतात.

ब्रम्हदेवाची पृथ्वी

लेखक सचीन यांनी बुधवार, 27/11/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आपली हजारो वर्षाची झोप पूर्ण करून ब्रह्मदेव नुकतेच उठले होते.ब्रह्मदेव जागे झाल्याची बातमी जशी त्रिलोकात पसरली, तसे त्यांना भेटायला देवगण हे ब्रह्मलोकात जमा झाले.जग बनवण्याच्या कामात अत्यंत श्रम पडल्याने त्यांनी हि हजारो वर्ष झोप घेतली होती. सर्व देवांचे ब्रह्मलोकात स्वागत करून ब्रह्मदेवाने विचारले,”अरे शक्तिशाली देवानो तुम्ही चिंतेत दिसताय, त्याचे कारण काय?” यावर नारदमुनी म्हणाले, “ ब्रह्माजी, तुम्ही तुमचीं सुंदर रचना पृथ्वी बनवली आणि झोपायला गेलात .इथे त्रास मात्र आम्ही भोगतोय. यावर ब्रह्मदेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले ‘कसला त्रास, मला काही कळेल का ?इतके झालय तरी काय.

वेडा गणू

लेखक सचीन यांनी मंगळवार, 26/11/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
गजाअण्णांना सकाळी सकाळी आपल्याकडे पाहून ज्योतिषी महाराज खुश झाले. "या या अण्णा, अलभ्य लाभ, आज आमच्याकडे कस येणे केले. यावर गजाभाऊ उतरले,"अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा गणू वेड्यासारखे वागतोय, इतका शिकला पण हुकलाहो. भलते सलते प्रश्न विचारतो. हे अमुक का? हे तमुक का? मागे ३ महिन्यापूर्वी तुमच्या कडे चांगले दहा हजार खर्चून त्याची शांती केलीय. पण आता तर तो भलताच अशांत झालाय. तुम्ही खरेच न हो बरोबर शांती केली होती? "तर हो, आपल काम म्हणजे सोळा आणे खरे" "अहो आम्ही ज्योतिष लोक, म्हणजे पृथ्वीवरचे सर्वज्ञच हो. "ते मरू द्या,तुमचे कीर्तन. मला आमच्या गणूची झकास पैकी कुंडली काढून द्या.

स्त्रियांचे राज्य

लेखक सचीन यांनी सोमवार, 25/11/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
काळ झपाट्याने बदलत चालला होता बघता बघता ३००० वे साल उजाडले. ह्या एवढ्या वर्षात बरेच बदल झाले होते.आपल्या भारतात आता स्त्रियांचे राज्य आले होते.सर्व प्रमुख पदांवर स्त्रिया कार्यरत होत्या. पुरुषांनी त्यांच्यावर हजारो वर्षापासून केलेल्या अत्याचारांची सव्याज भरपाई करत होत्या. गायात्रीबाई ह्या देशाच्या मुख्य होत्या. त्या अत्यंत सनातनी वृत्तीच्या होत्या.त्यांनी सत्तेवर आल्या आल्या समस्त पुरुषांची पंचाईत करून ठेवली होती. ‘वंशाचा दिवा’ हि पुरुषांची पदवी जाऊन त्या एवजी ‘वंशाची टूबलाईट’ हि नवी पदवी स्त्रियांना मिळाली होती.

सांजवेळ

लेखक सचीन यांनी रविवार, 24/11/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत. आतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिगूअण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व. शेजारच्या सखारामबापूंचे भरलेल कुटुंब त्यांना नेहमीच मोहवत असे.

ज्याचे करावे भले.....

लेखक सचीन यांनी शनिवार, 23/11/2013 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
भिकाऱ्यांच्या त्रासाने गणपतराव त्रासले होते. जेथे बघावे तेथे भिकारी. ह्या भिकाऱ्यांचे करायचे तरी काय?असा प्रश्न गणपतरावांना पडला. सकाळी ऑफिसला जायला निघाले तर नाक्यावरचा भिकारी पैसे मागायचा.त्याचे झाले कि ट्रेनमध्ये कळकट भिकारी अंगचटीला येवून पैसे मागायचे कि त्यांच्या जवळकी पेक्षा पैसे देणे गणपतरावांना प्रशस्त वाटायचे.गणपतरावांचा मूळ स्वभाव हा भिडस्त होता. लोक काय म्हणतील याची त्यांना नेहमी भीती वाटत असे. इतर माणसे जशी भिकाऱ्यांना हाकलून लावत, खर्जातला आवाज काढून त्यांच्यावर ओरडत ते काही केल्या गणपतरावांना जमत नसे. त्यामुळे ह्या भिकाऱ्यांच्या त्रासापासून त्याची सुटका काही होत नसे.

दुष्ट योगायोग!!

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 22/11/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
अद्वैत आणि सीमा एकाच कॉलेजात होते. दोघांत मैत्री होती. कॉलेज संपलं, आणि एकमेकांचा विरह सहन होईनासा झाला. दोघं पुन्हा त्यांच्या ग्रुपच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटायला लागले. हळूहळू जाणीवपूर्वक दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच-सहा वर्षं उलटली. सीमा करिअरिस्टिक मुलगी होती. हुशार आणि कर्तबगार होती. तिला कामात लगेच बढती मिळायला लागली. अद्वैतला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप हालअपेष्टा सहन करून, खस्ता खाऊन त्यानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली. पण काम भरपूर होतं. प्रेशरही खूप.