वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - फायनल - भारत विरुद्ध श्रीलंका
२ एप्रिल २०११
वानखेडे, मुंबई
भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमान असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोन आशियाई संघ समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने कोलंबोला न्यूझीलंडचा पराभव केला होता तर भारताने मोहालीला पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमधलं आपलं रेकॉर्ड ५-० असं पुढे नेलं होतं.
मिसळपाव