Skip to main content

विचार

अवगुंठन

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 29/05/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
उगाचंच बिचारी वाटते माझी मी मलाच... तुझ्याशिवाय.... सगळंच तुझ्या अवगुंठनात बांधलेलं सोडवू म्हटलं तर अजूनच आवळणारं कसा घेणार रे मी मोकळा श्वास... कसली होतेय तडफड...
Taxonomy upgrade extras

गीता, पुल, आणि कोसंबी

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 29/05/2009 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपाच्या मुखपृष्ठावर गीतेत सांगितलेली "स्थितप्रज्ञाची" लक्षणे यावरून " तुझे आहे तुजपाशी "मधील काकाजींचा संवाद वाचला. या मराठी साहित्यातील अजरामर नाटकाने मराठी मनाला बरीच मोहिनी घातलेली आहे. पुल यांच्याबद्दल तर सांगणेच नको. पुल यांनी एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रातील एक मोठा लेखकवर्ग तर समाजातील एक बराच मोठा विचारी वर्ग (मध्यमवर्गीयही असेल कदाचित) घडवला असे म्हणता येईल. एक उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मला मंगला गोडबोले यांचे "स्त्री" मासिकामध्ये येणारे "झुळूक" सदर आवडत असे, याचे कारण त्यांच्या विनोदी लेखनावर असलेला पुल यांचा प्रभाव.

धूतवस्त्रांकिता

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 26/05/2009 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
निम्नबावरी सुप्तपहाडी कलियुग सडता बोगनवेली तप्तशहाळी वित्तडहाळी अलगद शीतल भूतलबोली समतादुस्तर प्रतीकअस्तर प्रीतलावणी दुष्टकापणी सचिंत अधरी बलाक समरी चपखल बाला मूर्तवारुणी झाला जोडे आलाप ताना तरुवर प्रस्तर दृष्यआननी की रोगाची भलती चिन्धी दुर्धर तव परमाणुचाचणी निरलस अनघड कलाकऋजुता तीव्राषाढा धूसर चोली प्रत्येकाची कांचनवटवट तीव्रदुधारी तरुवरढोली मथुरापर्वा चाळणदूर्वा भ्रष्टचिकोडी लोळणफ़ुगडी गलितगात्र शतसूर्यविहारी वस्त्रवृत्र अवकाशरांगडी भिन्नशहारी साजणगर्वी तप्तसहाणी उगळचंदनी धूतवस्त्र उलगडे शरीरी लोभसबाला आरसपानी २६ मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras

पालकांनी उत्तीर्ण करण्याची अकरावी प्रवेशपरिक्षा: काही प्रश्न व सुचना

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 26/05/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावी प्रवेश सुरळीत व कमी कटकटीचा होण्यासाठी अनेक घटक, शासन, महाविद्यालये आपपल्या परीने प्रयत्न करीत असतातच. परंतू मला काही सुचना द्यायच्या आहेत व काही साधे प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्नांच्या उत्तरासाठी जाणकार मिपाकर ह्यांच्या मदतीची अपेक्षा आहे व सुचनांची पडताळणी व्हावी आणि आपणही सुचना ह्या धाग्यात द्याव्यात. जर त्या सुचना यदाकदाचित योग्य व्यक्तिंनी पाहिल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल अशी माफक अपेक्षा मला आहे. ***[संगणकाव्दारे वर्गीकरण करुन प्रवेश देण्याची बातमी वाचली आहे. ते जर होऊ शकले नाही तर काही सुचना व प्रश्न लागू पडतील]*** प्रश्न: १.

मनासारखे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/05/2009 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
हसू खुलू दे मनासारखे जरा घडू दे मनासारखे तुझी दिठी केसांत माळुनी मला सजू दे मनासारखे मुठीत बांधू नको कळीला तिला फुलू दे मनासारखे खुळे तुझ्या स्वप्नात जागते, मना करू दे मनासारखे दंवात न्हाते पहाट ओली, धुके झरू दे मनासारखे सुरांसवे माझ्या काव्याचे दुवे जुळू दे मनासारखे पसायदानी मागे ज्ञाना, जनां मिळू दे मनासारखे
Taxonomy upgrade extras

मौन तुझे

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 23/05/2009 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
बोल एकदा काहितरी रे मौन तुझे घायाळ करी रे कातर हळवी सांज गातसे तरल विराणी दर्दभरी रे श्रावणातही तळमळते मी झेलुनिया अलवार सरी रे जाणवते ती तुझी असोशी इथे दाटतो श्वास उरी रे देहच उरतो माझ्यापाशी मन घुटमळते तुझ्या घरी रे अंतरण्याने अंतर वाढे मिटव दुरावा हा जहरी रे पंचप्राण ज्यांच्यात गुंतले छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे
Taxonomy upgrade extras

एका छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 23/05/2009 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
१ जानेवारी २००९ साली ही डायरी लिहायची म्हणजे कटकट आहे.. ही नवी भलीमोठी डायरी आणली त्यासाठी .. आता सहज म्हणून अनुदिनी लिहावी ( की दैनंदिनी.. जाउदे मरुदे ना..)म्हटलं तर इतकी मोठी डायरी केवळ नाईलाज म्हणून आणावी लागली... कारण काय तर छोटी डायरी जवळच्या स्टेशनरीवाल्याकडे नाही... लुटतात भ*वे... ... घरी आलो तर पेन मिळेना... बरं... सकाळी शर्टाच्या खिशाला लावलेलं पेन ऑफिसात विसरलो... आता ते टेबलाच्या खणात राहिलं का कोणी पळवलं आठवत नाहीये... छ्या ..

जवाबः शहरातला आणि खेड्यातला मुलगा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/05/2009 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाषाणभेद यांनी शहर किती वाईट आणि खेडं किती चांगलं हे इथे सांगितलं आणि मग मी विचार केला का बरं लोकं एवढं चांगलं खेडं सोडून शहरात येत असतील?

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

लेखक भोचक यांनी बुधवार, 20/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

कोण म्हणाले

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/05/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणाले हे तुजला ; ऐसे मी करणार नाही खोट्या शपथाना या पुढे अजिबात बधणार नाही दिल्या घेतल्याशिवाय होतात व्यवहार हे मी सांगणार नाही दिल्या घेतल्या शिवाय व्यवहार अजिबात मी करणार नाही प्रतीज्ञेत " भावंड्"म्हणेन; आप-पर मानणार नाही स्वार्थ माझा येता समोरी ; आप-पर जाणणार नाही "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे मिथ्य मांडणार नाही "दिल्या घेतल्याने होत आहे आधी दिलेघेतलेची पाहिजे: हे सत्य सोडणार नाही जमवेन जरी नाठाळांची गर्दी ;नाठाळ मी ठरणार नाही तालावरी नाचेन त्यांच्या मग विरोधच उरणार नाही लाचार जरी कोणी म्हणेल ; लाज मला वाटणार नाही लाचारीमुळेच मिळे मलीदा ;सत्य त्यांस सांगणार नाही बोल
Taxonomy upgrade extras