Skip to main content

विचार

नको तो रविवार !!

लेखक वडापाव यांनी बुधवार, 13/05/2009 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
चौथे चिमणराव ह्या चिं. वि. जोशींच्या पुस्तकात चिमणरावांना रविवार हा कधीच सुखाचा सुवर्णदिन वाटला नाही. त्यावरुन रविवारला हल्लीच्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून नावे ठेवण्याची मला कल्पना आली. ती पुढीलप्रमाणे मांडत आहे - मौजेचे सहस्रावधी क्षण वाटते असतील विलक्षण व्यर्थ जातात पण तोचि रविवार म्हणावा थोडक्यात काय, सुट्टी मिळते, पण फुकट जाते. शनिवारी शाळेतून प्रचंड गृहपाठ मिळालेला असतो. तो रविवारावर ढकलण्यात येतो. शनिवारीच काय ती मौजमजा!

माझी मद्रास ची सफर

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 13/05/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... मी मिपा ची एक शांत वाचक.. ईथे बरीच मंडळी धो-धो लिहीताना पाहून वाटे.. की आपणही लिहावं.. पण का कोण जाणे.. पट्कन गूगल क्रोम उघडले जाते... नी त्यात.. एक अक्षर खोडले , की पुढची अक्षरं बोंबलतात.. पण आताशा ही उर्मी जरा जास्तच उचल लागलीय... कारणे दोनः एक, पेशावर मधल्या एका गायिकेची भावांकडून हत्या.. कारण काय.. तर ती टी. व्ही. वर गाते... आणि दुसरे.. देवांनी चालु केलेली.. मद्रास ची लेखमालीका... चला... काही कारणाने सुरुवात तर होतेय... मी हे माझ्या तिथल्या वास्तव्यातले अनुभव मांडतेय... काही नव्याने माहीत झालेल्या गोष्टी... काही विचित्र वाटलेल्या.. त्यातल्या काही तर खुपच खटकलेल्या...

एका बेसावध क्षणी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 12/05/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी तुझ्या सोबतीचा किती गर्व, अभिमान होता महाराज्ञी होते जशी, जग सारे जिंकून मी चार भिंती, छत, दारे यांना घरपण दिले चांदण्याचे कवडसे अंगणात शिंपून मी चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले रंग माझे विसरले तुझ्या रंगी रंगून मी नाही घेतला मी ठाव, नाही मोजली मी खोली तुझ्या अस्तित्वात असे दिले मला झोकून मी तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी तुझ्या यशाचे मंदीर, शिखराचा तूच धनी नामदेवाची पायरी तशी दारी थांबून मी माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिन्दू तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी एक
Taxonomy upgrade extras

कृष्ण

लेखक दशानन यांनी गुरुवार, 07/05/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण पाडवांच्या विंनती नूसार हस्तिनापूरला दुर्योधनासमोर पांडवांचा संधी प्रस्ताव घेऊ निघाले होते... त्यांच्या सारथी दारुक कृष्णाला विचार मग्न पाहून विचारतो की "महाराज, आपण दुखी आहात की आनंदी हे आपल्या चेह-याकडे पाहून मला समजले नाही कृपया आपण स्वतःच सांगा" "सारथी दारुक! तो बघ अस्ताला चालेला सुर्य ! प्रभात काळी तो विजेता असतो.. एकदम तेजस्वी...व जेव्हा अस्ताला चालेला असतो तेव्हा देखील तो अक्राळस्तेपणा न करता धीर गंभीर पणे.. शांत... रक्तमय लालीमा अंगावर खेळवत... आपला पराजय खुल्या मनाने स्वीकारत.... पुन्हा लढण्याची... उद्या उगवण्याची तयारी करत चाललेला असतो !

ऐतीहासीक अजरामर वाक्ये...

लेखक अडाणि यांनी मंगळवार, 05/05/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
काही वाक्ये अशी आहेत कि त्याला फार मोठा इतीहास आहे आणि ती अजरामर झालेली आहेत. मला माहित असलेली काही टंकत आहे, तुम्हिही भर घाला. वाक्यांबरोबर त्यांचा संदर्भ, काल अशी पुरक माहिती पण द्यावी. १. "माझ्या बंधु आणि भगिनींनो" - स्वामी विवेकानंदांचे हे (अर्ध) वाक्य अतिशय प्रसिद्ध् तर आहेच, पण आपल्या भारतिय संस्कॄतीची सर्व जगाला ओळख करून देणारे आहे. स्थळ - शिकागो. २. "I have a Dream" - मार्टीन ल्युथर किंग ह्यांचे हे वाक्य (आणि त्या नंतरचे भाषण) वर्णद्वेषाविरूद्द् चळवळीचा एक मोठा भाग मानला जातो. - स्थळ - वॉशिंटन ३.

आयुष्य

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 05/05/2009 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
रमत गमत जगायचं, हसत हसत मरायचं जन्मभर उन्हाच्या झळा सोसून सावलीसाठी झुरायचं बकुळगंधाच्या स्मृती घेऊन बाभुळबनात फिरायचं एकाकीपण विसरून जाऊन मैफलीत बहरायचं निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं रित्या ओंजळीला गोड गुलाबी आठवणींनी भरायचं बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं

विचार चालु आहे

लेखक गोगट्यांचा समीर यांनी सोमवार, 04/05/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करतो तुला सांगाव कसं? माझं मन तुला कळावं कसं? सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही, Romantic मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही, हा विचार तर चालुच राहिल , पण मला तु आवडतेस आणि हा विचार बदलत नाही!
Taxonomy upgrade extras

संवादाचा सुवावो

लेखक भोचक यांनी रविवार, 03/05/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 02/05/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले ( काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....". हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ?