Skip to main content

विचार

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

दुनियादारी ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 22/08/2013 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
दारूचा चौथा ग्लास जळजळतच घशाखाली उतरला. सहा महिने तो त्या दोघांना फिरताना बघत होता.. मोबाईल बदलावेत तसे त्याच्या मैत्रीणी बदलायच्या.. यावेळी पठ्ठ्या लग्न करायला निघालेला.. तिच्याही आयुष्यातील तो पहिलाच मुलगा नव्हता.. वाडीतच दोन प्रकरणे होती तिची.. त्याला ‘सावध’ करणे गरजेचे होते.. शेवटी मित्र होता त्याचा... जिवलग असा.. बालपण, शाळा, कॉलेज, कट्टा.... कट्ट्यावरची कटींग चाय.. अन दोघांत ओढलेली एकच सिगारेट..!! क्षणात डोळ्यासमोर तरळले अन त्याच तिरमिरीत तो उठला.. पाचवा पेग अर्धाच सोडून..

डस्ट इन द विंड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/08/2013 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

भ्रष्टाचाराचा उड्डानपुल

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 20/08/2013 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज लोकसत्तेत आलेल्या बातमीने माझे लक्ष वेधुन घेतले... ती बातमी पुढील प्रमाणे आहे :- कमकुवत ‘सांध्यां’मुळे ठाण्यातील उड्डाणपूल धोक्यात माझ्या लहानपणी मी या पुलाची प्रस्तावीत उड्डानपुल अशी शासकिय पाटी वाचल्याचे स्मरते ! त्या पुलाचे बांधकाम २००८ साली सुरु होणार होते. तो पुल अजुन पूर्ण होउ शकला नाही त्यातच या आजच्या बातमीची भर पडली ! २००९ साली 'एमएमआरडीए'च्या निधीतून ठाणे शहरात कापूरबावडी फ्लायओव्हर, घोडबंदर रोडवरील तीन फ्लायओव्हर आणि शहरातील तीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत.

काय चुकल???/ शतशब्द कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 17/08/2013 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पोलिसांनी तिथे छापा मारला, उच्च शिक्षित परिवारांची प्रतिष्ठित शाळेत शिकणारी १५-१८ वयोगटातील पोरांना नशेच्या त्या अवस्थेत पोलिसांनी पकडले. त्यांना दम देऊन सोडण्यात आले. त्यात सोनल ही होती. सोनलची आईचे बडबडने सुरु होते, अशीच वागली तर कुठे तोंड दाखवायला ही जागा उरणार नाही... सोनल ओरडली, बSSस, तुझे प्रवचन ऐकून कान पिकले माझे! काय केलं मी, हं थोडी विस्की घेतली, मित्रां बरोबर मजा केली, एवढेच नं. घरात काकटेल पार्टी होते, आणि तुझे डान्स मॅनर, त्या दिवशी उघड्या पाठीचे स्लिव्हलेस घालून, सर्वांसमोर बासच्या गळ्यात-गळे घालून नाचत होती आणि त्याचा हात... खटाक... सोनल किंचाळली.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

मिले सुर मेरा तुम्हारा...

लेखक अनुप ढेरे यांनी गुरुवार, 15/08/2013 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर लागणारं हे गाणं माहित नसणारा माणूस विरळाच. अशोक पत्की आणि लुइस बँक्स यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जाहिरात क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव, पियुश पांडे यांनी लिहिलेलं हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं 'मेरे देश की धरती' सारखं स्फुरण चढवणारं नाहिये. किंवा 'ए मेरे वतन के लोगों' सारख डोळ्यात पाणी आणणारं पण नाहिये. हे गाणं मनाला काहिशी हुरहुर लावणारं आहे. भीमसेन जोशी यांच्यापासून सुरु होणारं हे गाणं आपल्याला ८-९ भाषा वापरून, अनेक अभिनेते, गायक-गायिका, खेळाडू, लेखक यांच्या मार्फत बहुतांश भारताची सफर घडवुन आणते.

घटस्फोट.......संस्कृतीशी

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 12/08/2013 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
घटस्फोट.......संस्कृतीशी - गुरुवार. ग्रंथालयातील पुस्तके बदलायचा माझा दिवस. पुस्तके हुडकत होतो. माझ्यामागे तिशीतल्या दोन महिला काही बोलत होत्या- " बघ ना, बिचारीचे खूप वाईट हाल झाले, शेवटी नशिबाचा भाग असतो. आता तिचे आई-वडील नवीन स्थळ बघत आहेत. पण दुसरे लग्न म्हणले कि जरा अडचणी येतातच ना, अगदी सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण होणार. ए; तुझ्या माहितीत जरी कोण असेल एखादा चांगला मुलगा तर सांग हं. दुसरी महिला म्हणाली -अग हो आणि तुला त्या मंदिराजवळच्या काकू माहित आहेत ना, त्यांना भेट ना, त्या ”घटस्फोट स्पेशियालिस्ट” आहेत, त्या नक्की तुला मदत करतील. एवढे बोलून त्यांचा संवाद संपला आणि माझा विचार चालू झाला.

ये क्या जगाह है दोस्तो

लेखक शरद यांनी सोमवार, 05/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
ये क्या जगह है दोस्तो श्री.गोरा सौमित्र यांच्या " प्रलयानंतरची प्रार्थना" या लेखा (ते कथा म्हणत असले तरी मी गद्यकाव्यच म्हणतो) वरचे प्रतिसाद वाचल्यावर मला आठवण झाली ती ये क्या जगह है दोस्तो, ये कोनसा दयार है ? हद्दे निगाहतक जहॉं गुबारही गुबार है ! मित्र हो, आपण मिपावर लिहितो तेव्हा आपण एमेचा पेपर सोडवत नसतो, सेमिनारमध्ये वाचावयाचा निबंधही लिहित नसतो, नाही सत्यकथेत प्रकाशित व्हावी अशी कविता. आपली छायाचित्रे नॅशनल जीओग्राफित प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेची नाहीत हे आपल्याला माहीत असते. निदान माझी तरी अशी समजुत आहे.