Skip to main content

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

शुक्रवार, 23/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

                           अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यामध्ये खून करण्यात आला. नागरिकांचे संरक्षण हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते. दाभोळकरांच्या खुनाने सरकार नागरिकांचे रक्षण करू शकत नाही, हे अधोरेखीत झाले. सर्वत्र जनक्षोभ आणि संतापाची लाट उसळली, ज्यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले. जनक्षोभाचे विक्राळरूप बघून सरकार हादरले. भयमुक्त जीवन जगण्याचा नागरिकांचा अधिकार जोपासण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी तडकाफडकी मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत निर्णय घेऊन जादूटोणा-विरोधी अधिनियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

                           जो अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे. 

                    "प्रत्येक प्रश्नाची उकल केवळ नवा कायदा निर्माण केल्याने होते" अशी आधुनिक वेलक्वालिफ़ाईड प्रगाढ अंधश्रद्धा बाळगणार्‍या सरकारने कायद्याच्या घनदाट जंगलात आणखी एका नव्या कायद्याची भर घातली आहे. वस्तुतः: राज्यात आधीच इतके सक्षम कायदे आहेत की, कोणत्याही गुन्हेगाराला वठणीवर आणण्यास पुरेसे ठरावे. पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडे नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण नुसते नवेनवे कायदे केल्याने नव्हे तर कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी केल्याने मिळवता येते, याचे भान कायद्याच्या रक्षणकर्त्यांना केव्हातरी यायला हवे. 

                           अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्‍ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे. 

                           जादूटोणा-विरोधी अधिनियम या प्रस्तावित कायद्याची सुद्धा तीच गत होईल, हे मसुद्याचे प्रारूप पाहून सहज लक्षात येते. एकंदरीत कुचकामी, निरुपयोगी पण उपद्रवी आणि पोलिसांना पैसे उकळण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारा एक अनावश्यक कायदा, असे या प्रस्तावित कायद्याचे थोडक्यात वर्णन करता येईल.

                           जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायद्याचे हे कलम अत्यंत अव्यवहार्य आहे, अनावश्यक आहे आणि शेतकरी वर्गाची गळचेपी करणारे आहे.

                           या राज्यात बहुसंख्येने शेतकरी राहतात आणि साप व विंचू यांचा घनिष्ट संबंध सर्वात जास्त शेतकर्‍यांचा येतो. सर्पदंश होऊन मृत्यू पावणार्‍यांमध्ये शेतकरी समाजच जास्त असतो. मग या विषयी एखादा कायदा तयार करायचा असेल तर शेतकरी समाजाला विश्वासात घ्यायला नको काय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेईन किंवा अशा कायद्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यापूर्वी शेतकर्‍यांशी काही सल्लामसलत करेल, ही माझी अपेक्षा नव्हती आणि आजही नाही कारण; ही मंडळी स्वतः:च स्वतः:ला एवढी तज्ज्ञ आणि विद्वान समजतात की, त्यांना कुणाचेही म्हणणे समजावून घ्यायचे प्रयोजनच उरत नाही. पण सरकारचे काय? सरकारने तर संवाद साधायला हवा! संवाद साधला नाही तेही एकवेळ समजून घेता येईल पण निदान या प्रश्नाचा खोलवर अभ्यास तरी करायला हवा की नको? तेवढी विवेकशीलता जर सरकारमध्ये शिल्लक असती तर ते कलम या कायद्यात आलेच नसते.

                           साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे आता ही परंपरागत चालत आलेली उपचारपद्धती कायदेशीर अपराध ठरणार आहे. ज्या परंपरागत उपचार पद्धतीवर अनिसच्या दबावाखाली येऊन सरकार कायदा आणू पाहत आहे ती साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी उपचार पद्धती कशी असते, ते आपण पाहू.

१) विंचू (साधा) - साधा विंचू चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता नगण्य असते. चावल्यानंतर लगेच काही मिनिटातच अत्यंत असह्य वेदना सुरू होतात. पहिले साधारण दोन-तीन तासांपर्यंत असह्य वेदनांची तीव्रता चढत्याअंगाने आणखी वाढत जाते. त्यानंतर त्यापुढील दोन-तीन तास असह्य वेदनांची तीव्रता उतरत्याअंगाने कमी होत जातात. सर्वसाधारण पणे २४ तास विंचवाच्या विषाची परिणामता जाणवते. मात्र पहिले काही तास सोडले तर उर्वरित काळ वेदना सुसह्य असतात.

यावर करण्यात येणारे परंपरागत उपचार - काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.

२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.

३) साप - विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही.
परंपरागत उपचार पद्धत : सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्याला झोप लागू देत नाही. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते. (दवाखान्यात उपचार करणार्‍या डॉक्टरचे सर्व पर्याय संपले आणि कोणताही रोगी शेवटच्या घटका मोजायला लागला की डॉक्टरमंडळी सुद्धा रोग्याची सलाईन सुद्धा काढून टाकतात आणि छातीवर जोरजोराने भार देऊन त्याचा श्वासोश्वास बंद पडू नये म्हणून कृत्रिमरीत्या प्रयत्न करतात. अर्थात ही उपचार पद्धती वैद्यकीय शास्त्रात सुद्धा वापरली जाते) मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही
.......(अपूर्ण).........
                                                                                                                             - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24914
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

माझे ह्या विषयावर अगदी थोडेफार वाचन आहे. आणि त्यामुळे मी तुमच्याशी वाद घालत बसणार नाही. पण मला एक प्रश्न सतत पडतो आहे की नरबळी सारख्या प्रथांना मोडित काढण्या साठी कुणी कायदा करत असेल तर त्याला इतका विरोध का व्हावा? त्यातली काही कलमे अजुनही दुरुस्त करता येतील. पण त्यावर "सुचना" न होता.. आक्खा कायदाच अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी ?? तुम्हाला काही पटलं नसेल तर जरुर मांडा.. त्यावर विचार करुन सर्वमान्य असा मार्ग निघु शकेल. पण एक्-दोन कलमे मान्य नाहीत म्हणुन सगळाच कायदा कसा मोडीत काढायचा? आणि अंनिस म्हणजे देव-धर्म न मानणारी संस्था, म्हणुन त्यांनी ज्याचा पाठपुरावा केला तो कायदा पण तसाच देव विरोधी असेल, त्यांचे कार्यकर्ते अतिशहाणे असतील असंच का वाटत असेल बर्‍याच लोकांना? त्यांचा हेतु का नाही कुणी समजुन घेत? ह्यात त्यांचा काय अर्थिक फायदा असेल? समाजासाठी जर कुणी काही करु पहात असेल तर त्यातल्या चुकाच दाखवण्या पेक्षा त्यातील चांगल्या बाबींना पाठिंबा देणे आणि न पटणार्‍या गोष्टीं साठी सुधारणा सुचवणे हे जास्त योग्य वाटते.

In reply to by पिलीयन रायडर

नरबळी सारख्या प्रथांना मोडित काढण्या साठी कुणी कायदा करत असेल
नरबळी हा खून च असल्यामुळे त्याच्या साठी वेगळा कायदा असायची गरज नाही. नरबळी साठी शिक्षा देण्यास सध्याचा कायदा सक्षम आहे

वाचतोय. विंचु साप चावल्यानंतर वैद्यकीय उपचार न घेता हे उपचार करावेत किंवा योग्य असतात असे तुम्ही कुठेही म्हटलेले नाही पण तुमचा एकंदर विरोध बघता तुमचा विचार तसाच असावा असे वाटते. तसे असल्यास असे का हे जाणुन घ्यायला आवडेल. नसल्यास प्रश्नच नाही. तुमचा विरोध थोडाथोडा कळतो आहे. माझ्यामते तो कायदेशीर बंधनाला असुन वैद्यकीय उपचारपद्धतीच्या श्रेष्ठत्वाला आव्हान देणारा नाही. कृपया थोडे सविस्स्तर सांगा.

In reply to by मृत्युन्जय

जे कोणी साप विंचू चावल्या वर वैद्यकिय उपचार न घेता तंत्र मंत्र करत असतील त्यांच्या वर कोणी जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी घ्यावेत वैद्यकीय उपचार कोणी आडवले आहे. माझ्या मते तर आयुर्वेद आणि होमिओपाथी ला पण खरे तर ह्यात घातले पाहीजे जर रोगी बरा व्हावा अशी सरकार ची इत्छा असेल तर. ती पण मोठी ढोन्ग आहेत असे माझे मत आहे. पण कोणाकडुन उपचार करुन घ्यायचा हे ज्या त्या व्यक्तीने ठरवावे, सरकार ने मधे पडु नये.

In reply to by प्रसाद१९७१

जे कोणी साप विंचू चावल्या वर वैद्यकिय उपचार न घेता तंत्र मंत्र करत असतील त्यांच्या वर कोणी जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी घ्यावेत वैद्यकीय उपचार कोणी आडवले आहे.
अत्यंत मान्य. फक्त थोडा बदल / अ‍ॅडिशन करतो.. नेमकं कोणाकडे गेल्यास काय फायदा / आउटपुट मिळेल याचं ज्ञान सर्वांना मिळण्यासाठी /पोचण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील जे कायद्याच्या कक्षेत नाही. हा सरळसरळ शिक्षणाचा भाग आहे.
माझ्या मते तर आयुर्वेद आणि होमिओपाथी ला पण खरे तर ह्यात घातले पाहीजे जर रोगी बरा व्हावा अशी सरकार ची इत्छा असेल तर. ती पण मोठी ढोन्ग आहेत असे माझे मत आहे.
होमिओपथीविषयी सरळसोट सहमत. आयुर्वेदाविषयी, औषधांच्या आधुनिक मार्गाने सिद्धता होईपर्यंत सहमत. यात अनेक अन्य चिकित्साही घालणं अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by गवि

धन्यवाद गवि साहेब
हा सरळसरळ शिक्षणाचा भाग आहे.
माझे तेच म्हणणे आहे. सरकार ने असले कायदे करण्यापेक्षा काहीतरी खरे उपाय करावेत. गावो गावी वैद्यकीय सुविधा पोचवाव्यात, लोक आपोआपच मंत्र तंत्र करणे बंद करतील.

प्रस्तावीत कायद्यमधील कलम क्र. ९ खालील प्रमाणे. --------------------------------------------------- ९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे. ------------------------------------------------- यात कुठेही घरगुती उपचार करु नये कीवा करता येणार नाहीत असे लीहीलेले नाही आहे. हा मसुदा http://www.antisuperstition.org/ इथे वाचता येईल.

In reply to by खटपट्या

मला समजलेल्या माहितीनुसार हे कलम मुळातच केवळ एखाद्या व्यक्तीला/पिडिताला इछ्चा असुनही वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे व त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे. या कृतिसाठी आहे. व अन्य कोणतिही उपचार पध्दति स्विकारणे अथवा नाकारणे याबाबत निर्णय घेण्याचे संपुर्ण स्वातंत्र्य पिडिताला/संबधितांना बहाल करत आहे. बरेचदा अन्य गोश्टी प्रभावे इछ्चा असुनही पिडिताला/संबधितांना वैद्यकिय मदतीऐवजी इतर उपचार पध्दती लागु करुन त्या जिवावर बेतल्याच्या अनेको घटना घडत असल्याने हे सामाविश्ट केले आहे. शेवटी वैद्यकिय मदत हा उपाय (सक्सेस रेशो तुलना करुन बघितल्यास) सर्वोत्तम आहे व तो इच्छा असताना नाकारणे अतिशय अन्यायकारक आहे इतकेच हे कलम सुचवते..... अर्थात ही झाली पुस्तकी संयमित व्याख्या. वास्तवात मला कोब्रा चावलाय अन तरिही वैद्यकिय मदत नको, अमुक तमुक घेइल बघुन असे छातिठोकपणे म्हणनारी व्यक्ती(वा नातेवाइक) काय तयारिचे असतिल याची कल्पना नसल्याने... हे कलम सर्वसामान्यांना चिंतेमधे पाडणार आहे हे सकृतदर्शनी नक्कि आहे.

कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करण्यापासून रोखणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. न वाचता न समजता लिहू नका ही नम्र विनंती!

तुमचा मुद्दा समजला. सर्प/विंचू दंश आणि त्यावरच्या पारंपारिक उपायांची परिणामकारकता यावर डॉक्टर मिपासदस्य सुबोध खरे, इस्पिक एक्का, बाबा पाटील आदि लोक अधिकारवाणीने लिहू शकतात. मिपाचे गारूडी जॅक डॅलियल्स सुद्धा. पण
अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्‍ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे.
हे म्हणजे थोरल्या भावाचा घटस्फोट झाला म्हणून धाकट्याला लग्नच न करण्याचा सल्ला देण्यासारखं आहे. कायद्यांना विरोध का? कायदे केल्याच्या दुसर्‍या दिवसापासून लोक बटण बंद केल्यासारखे ती गोष्ट करायचे थांबतील आणि कायद्याच्या कक्षेत येतील अशी अपेक्षाच चूक आहे. कायद्याचे सामाजिक परिणाम दिसून यायला, त्यातून समाजमनात बदल व्हायला अनेक वर्षं, कधी दशकं जावी लागतात. सतीबंदी कायदा, हुंडाप्रतिबंधक कायदा ही अगदी सहज आठवणारी उदाहरणं. कायदा करणे ही सामाजिक बदलाची सुरुवात असते. समाजकल्याण करणारं सरकार काही अनिष्ट प्रथांना लगाम घालत आहे ही भूमिका यातून स्पष्ट होते. त्यातून हा तर वटहुकूम (ordinance) आहे ना? विधीमंडळापुढे सहा महिन्यांत वटहु़कूम चर्चेसाठी ठेवला नाही तर तो घटनाबाह्य ठरतो. वर पिलियन रायडर यांनी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक कलम / पोटकलम चर्चेसाठी घेता येतं आणि अयोग्य वाटलं तर नापास करता येतं. त्यासाठी सगळ्या कायद्यालाच आडकाठी करण्याची गरज नाही. शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचा शिखंडी करून कोणी त्याआडून बाण चालवत आहे का - हा खरा प्रश्न आहे.

In reply to by आदूबाळ

शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचा शिखंडी करून कोणी त्याआडून बाण चालवत आहे का - हा खरा प्रश्न आहे.
हं.. आता कसं बोललात... लोकांना वाटतय कि दाभोलकर पक्षपाति होते, खोटारडे होते, सरसकट सगळा देवधर्म गुंडाळुन ठेवणारे होते म्हणुन त्याम्ची हत्या झाली... हे सोयिस्कर्पणे नाकारताएत का की कुणाची तरि आर्थिक गणितं चुकत होती म्हणुन "सराईत गुंडा" कडुन त्यांचा "काटा काढला"... हाच गांधी हत्या आणि दाभोलकर ह्यांचा खुन ह्यातला फरक आहे...

In reply to by पिलीयन रायडर

म्हणजे जास्त रेव्हेन्यु असणार्‍या बाबा, बुवांची चौकशी व्हायला हवी या संदर्भात.. सनातन वगैरे पैशाच्याबाबतीत खूपच मागासलेले असावेत.. पण त्या कॅटॅगरीतले बाबा बुवा मंत्रीमंडळ आपल्या पायशी बाळगुन असतात.. मग कशी होणार त्यांची चौकशी??

In reply to by पिलीयन रायडर

म्हणजे जास्त रेव्हेन्यु असणार्‍या बाबा, बुवांची चौकशी व्हायला हवी या संदर्भात.. सनातन वगैरे पैशाच्याबाबतीत खूपच मागासलेले असावेत.. पण त्या कॅटॅगरीतले बाबा बुवा मंत्रीमंडळ आपल्या पायशी बाळगुन असतात.. मग कशी होणार त्यांची चौकशी??

In reply to by पिलीयन रायडर

तुम्हाला खरे च असे वाटते आहे का की अनिस किंवा दाभोलकरांमुळे कोणाची आर्थिक गणिते बिघडत असतील. दाभोलकर गेली ३० वर्ष तरी ह्या वर काम करत आहेत. पण समाजात बाबा, बापू, माता, मावशी, अम्मा , मम्मी वाढल्याच आहेत. समाजाला बाबा, बुवा, गंडेदोरे हवे आहेत. अनिस ची तेव्हडी ताकद नाही की ते कोणाची आर्थिक गणिते बिघडवू शकतील.

In reply to by प्रसाद१९७१

ओक्के.. ते माझं मत झालं.. तुम्हाला काय वाटतं की का केला असेल मग त्यांचा खुन?

In reply to by पिलीयन रायडर

२ शक्यता १. ह्या मागे राजकारण आहे. ह्या खुनाचे निमित्त करून सरकार हिंदु संघटनांना backfoot वर ढकलत आहे. अश्या घटना अजुन घडतील कारण ह्या सरकार ला जनतेला दाखवायला तोंड राहीले नाहिये. अश्या निमित्तानी समाजवादी मते आपल्याकडे वळवुन घेत आहे सरकार. २. दाभोलकरांच्या जमिन वगैरे असू शकतात, काही आर्थिक व्यवहार असू शकतात. जमिनीवरून कीती खून होतात तुम्हाला माहीतीच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

>>> १. ह्या मागे राजकारण आहे. ह्या खुनाचे निमित्त करून सरकार हिंदु संघटनांना backfoot वर ढकलत आहे. अश्या घटना अजुन घडतील कारण ह्या सरकार ला जनतेला दाखवायला तोंड राहीले नाहिये. अश्या निमित्तानी समाजवादी मते आपल्याकडे वळवुन घेत आहे सरकार. + १. मालेगावला सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इ. ९ जणांना आरोपी ठरवून ऑक्टोबर २००८ पासून कोणताही पुरावा नसताना जामीन न देता अटकेत ठेवले आहे. सुरवातीला महाराष्ट्र सीआयडी, नंतर करकरेंच्या नेतृत्वाखालील एटीएस, नंतर एक एसआयटी, नंतर सीबीआय, नंतर अजून एक एसआयटी आणि आता एनआयए अशा अनेक चौकशी संस्थांकडून चौकशी करूनसुद्धा त्यांच्याविरूद्ध पुरावा मिळालेला दिसत नाही. त्यामुळेच आजतगायत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. २००९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप व हिंदू संघटनांना बॅकफूटवर नेण्यासाठी व निवडणुकीत त्यांच्याविरूद्ध "हिंदू अतिरेकी", "हिंदू दहशतवादी" असा प्रचार करण्यासाठीच या सर्वांना लटकाविण्यात आलेले होते असे दिसत आहे. कै. दाभोळकरांच्या खुनामागचा हेतू लक्षात येत नाही. ते १९९६ पासून या विधेयकाच्या मागे आहेत. त्यामुळे या विधेयकामुळे त्यांचा खून झाला असावा असे वाटत नाही कारण हे विधेयक कधीही मंजूर होणार नाही हे स्वतः दाभोळकरांना व विधेयकविरोधकांनाही माहित होते. दाभोळकरांमुळे कोणत्याही भोंदू बाबांची दुकाने बंद झाल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना गेल्या १०-१२ वर्षात अनेक नवीन भोंदू बाबा-महाराज उदयास आले आहेत व त्यांची दुकाने व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे एखादा बाबा-महाराज या मागे असावा असे वाटत नाही. दाभोळकरांचे कोणाशीही व्यक्तिगत शत्रुत्व नव्हते. त्यांचे अनेकांशी वैचारिक मतभेद होते. त्यामुळे व्यक्तिगत सुडाचा हा प्रकार नसावा. मग नक्की काय कारण असावे? २०१४ मध्ये निवडणुक आहे हे लक्षात घेतले तर या खुनाचे निमित्त करून भाजप, हिंदू संघटना इ. ना पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकलण्यासाठी यामागे राजकारण सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. >>>> २. दाभोलकरांच्या जमिन वगैरे असू शकतात, काही आर्थिक व्यवहार असू शकतात. जमिनीवरून कीती खून होतात तुम्हाला माहीतीच आहे. दाभोळकरांचे असे काही व्यवहार होते का याची अजिबात कल्पना नाही. एकंदरीत खुनामागचा नक्की काय हेतू होता हे गूढच आहे. पण या खुनामुळे तापलेल्या वातावरणात आपली निधर्मी राजकीय पोळी भाजून घेण्याचे अत्यंत घृणास्पद प्रयत्न सुरु आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मालेगाव स्फोटातले आरोपी हे "अभिनव भारत" या सावरकरांनी चालू केलेल्या आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळात विसर्जीत केल्यावर नव्याने चालू केलेया संघटनेतले होते. दाभोलकरांच्या हत्येनंतर राज्य सरकारने "अभिनव भारत" ह्या संघटने वर बंदी आणावी म्हणून केंद्राकडे शिफारस केली. तर त्यांच्याकडून (मालेगावचा अरोप सोडल्यास) कुठलेही देशविघातक कृत्य झाल्याचे दिसलेले नसल्याने केंद्रातील गृहमंत्रालयाने ती मागणी फेटाळून लावली आहे. सध्याची "अभिनव भारत" योग्य कार्य करते का नाही हे माहीत नाही, आणि हा येथे प्रश्न नाही. प्रश्न इतकाच आहे की कुठलेही ठोस पुरावे नसताना, राज्य सरकार कडून दोनचार संघटनांना या निमित्ताने बंदी घालून वेळ मारून नेण्यातला प्रकार वाटला. अर्थात त्याबद्दल कोणीच काही बोललेले दिसले नाही. बातमी देखील लो की प्रोफाईल पद्धतीने आल्यामुळे सहज दिसत नाही. (म.टा. मधे तर दिसलीच नाही!)

In reply to by विकास

आपल्या प्रतिसादाला आक्शेप नाही पण
"अभिनव भारत" या सावरकरांनी चालू केलेल्या आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळात विसर्जीत केल्यावर नव्याने चालू केलेया
यात सावरकरांचा सन्दर्भ खटकला. सध्याच्या "अभिनव भारत" चे नाव तेच आहे या पलिकडे, आपणच म्हणल्याप्रमाणे सावरकरांनी सुरु आणि विसर्जित केलेल्या "अभिनव भारत"शी फार संबंध नसावा. आणि फार जोडुही नये असे वाटते.

In reply to by अगोचर

आपण पुर्नस्पष्टीकरण केलेत त्याबद्दल आभारी आहे! :) माझा लिहीण्याचा तोच मुद्दा होता. बर्‍याचदा माध्यमे (विशेष करून इंग्रजी) सावरकरांचा हळूच (नरोवा कुंजरोवा) संबंध जोडातात. त्यात परत सद्याच्या प्रमुख हिमानी सावरकर, म्हणून अजूनच गैरसमज... त्यामुळे येथे हे वाचकांच्या (माहीत नसल्यास) लक्षात यावे म्हणून तसे लिहीले होते.

In reply to by अगोचर

सावरकारानी बंद केलेली अभिनव भारत संघटना हिमानी सावरकरान्नी सुरु केली आहे. हिमानी सावरकर या स्वातंत्रवीर सावरकरांच्या ( भावाच्या) सूनबाई आहेत. त्या नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत. ( ही ऐकीव माहिती आहे, कन्फर्म करावी, ही नम्र विनंती.)

दाभोलकरांचे कार्य केवळ वैचारीक पातळीवर (पुस्तकलेखन, भाषणे) नसून अंनिसच्या माध्यमातून बाबाबुवा आणि तत्सम उपद्रवी लोकांना आव्हान देउन त्यांचा पर्दाफाश करणे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन पिडीत लोकांना सोडवणे या पातळीवर होते. ही आव्हान प्रक्रीया फार खडतर असते. बहुतेक वेळा धमक्या,शारीरिक हल्ला यांच्याशी सामना करावा लागतो. पोलिस अथवा शासकीय अधिकारी हे देखिल कायदेशीर बाजू पक्की असल्याशिवाय मदत करु शकत नाहीत. आव्हान प्रक्रीया ही किती विचारपूर्वक आणि पद्धतशीर आखणी केलेली असते याची माहीती त्यांच्या पुस्तकातून मिळते. इतकीवर्ष इतके तपशीलवार नियोजन करून कार्य केल्यावर बर्‍याच ठिकाणी त्यांना प्रचलित कायद्यांच्या मर्यादा लक्षात आल्या. त्यातूनच नवीन कायद्याची गरज लक्षात आली, त्यावर पूर्णपणे विधिमंडळावर अवलंबून न रहाता स्वत: सहकार्‍यांसह झटून मूळ मसुदा तयार केला. तेव्हा १० ओळी वाचून त्या कायद्याला अनावश्यक, उपद्रवी ठरवणे हे खचितच अयोग्य ठरेल. कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी त्याची समीक्षा जरूर व्हावी पण यामुळे पूजा करणार्‍याला तुरुंगवास होईल अशा नाहक भितीने संपूर्ण कायद्याला विरोध करण्याने काहीच साध्य होणार नाही.

>>>>>अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे. आता दैनिकात याबद्दल खूप छापून आलं आहे. अंधश्रद्धा विरोधी कायदा असे शीर्षक जावून जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रवास पाहिला तर लक्षात येईल की या मसुद्याची आणि प्रारुपाची प्रचंड अशा विविध हरकती पूर्वीच आल्या आहेत. विविध सामाजिक चळवळींच्या घटकांनी सतत त्याबद्दल विरोध करुन करुन हे असावं ते नसावं असं म्हणून या विधेकातील काही मुद्यांना सतत विरोध केला काही मुद्दे बदलायला लावले आहेत. अगदी शेवटचा बदल मला वाटतं वारक-यांच्या विरोधामुळे केला गेल्याचे अनेकांना स्मरत असेल, त्यामुळे सामाजिक संघटनांना विश्वासात न घेता सदर वटहुकूम राज्यपालांकडे पाठविण्यात आला या मुद्यात तसे काही तथ्य नाही, असे वाटते. >>>> बाकी, कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. अतिशय उत्तम. दवाखान्यात जाऊन उपचार घेणे रुग्णासाठी केव्हाही चांगले. बाकी, मंत्र तंत्राने विष उतरवणार्‍यांना डायरेक्ट जेलात घातलं पाहिजे. किमान तीन महिने जामीन मिळु नये. जामीन मिळत नाही, तो पर्यंत अशा मंत्रतंत्र सिद्धी येणार्‍यांना जेलात इतके कष्टाचे कामं द्यावीत की राहीलेल्या आयुष्यात पुन्हा त्याला मंत्राची आठवण होऊ नये. आता अवांतर :मुटे साहेब, तुम्ही खेडंगाव चांगलं पाहिलं आहे मीही पाहिलं आहे, तसं ते अनेकांनी पाहिलंय. वर तुम्ही विंचवाचं उदाहरण दिलं आहे त्यात तुम्हीच म्हणता की विंचवाच्या दंश एक तासभर माणसाला मरणप्राय अशा वेदना देत असतो आणि तासाभरानंतर त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. मंत्र-तंत्रात काही दम नसतो मंत्र म्हणनारा म्हणत असतो त्यात बराच वेळ जातो आणि हळुहळु विंचवांचा दंशाची तीव्रता कमी होत जाते. ते काही मंत्र-तंत्राने होत नाही, हे आता मला तरी समजू लागले आहे. साप चावल्यानंतर कोंबडीचं ढुंगन साप चावलेल्या जागी लावलं की कोंबडी विष ओढून घेते. कोंबडी मेली की विष उतरतं असे काहीच्या काही समज आपल्या खेड्यात अजूनही गच्च भरुन आहेत. काही आधार नसतो या गोष्टींना. बिनविषारी साप चावल्यानंतर अशा कृती करणा-या तांत्रिक मांत्रिकाचं अशा कोणत्याही उपायानं नाव होतं. आणि आपण नसत्या गोष्टींचं समर्थन करतो. पिसाळलेला कुत्रा चावला तर कुत्रा चावला आहे त्या रुग्णाला हात बांधुन कुत्र्यासारखं रांगायला लावून कोणत्या मंत्र तंत्राची भाकरी खाऊ घालतात, याच्यासारखा फालतू विलाज कोणता नाही. सरळ दवाखान्यात जाऊन योग्य उपचार घेणे, तरच रुग्णाचा जीव वाचेल, नसता रेंबीजची लागण झालेल्या रुग्णाचे हाल काय लिहायचे... असो, समाजाचं प्रबोधन करणार्‍यांना समाजासाठी अजून किती काळ लढावं आणि मरावं लागेल माहिती नाही...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, मंत्र तंत्राने विष उतरवणार्‍यांना डायरेक्ट जेलात घातलं पाहिजे. किमान तीन महिने जामीन मिळु नये. जामीन मिळत नाही, तो पर्यंत अशा मंत्रतंत्र सिद्धी येणार्‍यांना जेलात इतके कष्टाचे कामं द्यावीत की राहीलेल्या आयुष्यात पुन्हा त्याला मंत्राची आठवण होऊ नये.
का जेलात टाकले पाहीजे? ते काय कोणावर जबरदस्ती करत आहेत का? सरकारने असले फालतू कायदे करण्यापेक्षा गावोगावी वैद्यकीय सेवा कशा पोचतील ते बघायला पाहीजे. मंत्रतंत्र सिद्धी करणार्‍यांचा धंदा आपोआपच बसेल.

In reply to by प्रसाद१९७१

>>> का जेलात टाकलं पाहिजे. आता का जेलात टाकलं पाहिजे. मंत्र-तंत्र हा उपचाराचा इतका अघोरी प्रकार आहे की उपचार करुन घेणा-याची बुद्धी गहाण पडलेली असते, उपचाराची गरज असलेल्यास मलमुत्र खायला दिले तरी डोळे मिटून खातील तेव्हा कोणतेही शास्त्रीय उपचार करण्यापेक्षा ज्या उपचारांची अजिबात खात्रीच नाही, अशा उपचारांनी रुग्णाचा जीव जाणारच आहे, असे उपचार घेऊन काय उपयोग, तेव्हा, असे उपचार करणा-यांना आणि अशा उपचाराचं समर्थन करणा-यांनाही जेलात घातलं पाहिजे. कारण ज्या रुग्णाला उपचाराची गरज असते, तेव्हा काही लोक दवाखान्यात उपचारासाठी सुचवतात तर काही बुवाबाबांचा रस्ता दाखवतात. अशा वेळी बाबाबुवांचा रस्ता दाखविणा-यांनाही जेलात टाकलं पाहिजे, असं माझं मत आहे. >>> ते काय कोणावर जबरदस्ती करत आहेत का ? ते काय कोणावर जबरदस्ती करतील ? अशिशिक्षित समाज नव्हे तर सुशिक्षित म्हणवून घेणारे लोक जेव्हा आपली बुद्धी गहाण टाकुन आम्ही अमुक धमुक रोगांवर उपचार करतो असा दावा करणा-यांकडे लोक जातात तेव्हा समाजाची दिशाभूलच करत असतात, तेव्हा अशा उपचारांचा पर्याय उपलब्ध नसणे हीच आवश्यक गोष्ट आहे. . >>>सरकारने असले फालतू कायदे करण्यापेक्षा गावोगावी वैद्यकीय सेवा कशा पोचतील ते बघायला पाहीजे. फालतू कायदे असं वाचतांना मला एकूण समाजाच्या मानसिकतेचा अंदाज येतोच येतो. तेव्हा, सरकारने लवकरच या वटहुकुमाला अंतिम स्वरुप द्यावे, असे माझे मत आहे. बाकी, राहीला लंगडे समर्थन करतांना गावोगावी वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली पाहिजे याची,तर माझ्याकडे आता काही विदा नाही, पण जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात आता प्राथमिक उपचाराची सोय आहे, किमान वीस-पंचवीस किलोमिटरच्या परिघात सरकारी दवाखाने उपलब्ध आहेत.आणि प्राथमिक उपचार सहज होऊ शकतील. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहेब मान्य आहे,पण त्यासाठी प्राथ्मिक आरोग्य केन्द्रात आधी डोकटर उपलब्ध असावे लागतात्,तसेच सर्पदन्श लस उप्लब्ध असावी लागते, तसेच वीस - पन्चवीस किलोमिटर ला जायला वाहन उपल्ब्ध असावे लागते ते काही सरकार पुरवत नाही की अनिस, एकिकडे आपल्या कडे विदा नाही असे म्हणायचे, तरिसुद्धा त्याना विरोध करताना या गोष्टीन्कडे मात्र काणाडोळा करणे योग्य नाही तसेच एका माणसाच्या बोलण्यावर समाजाच्या मानसिकतेचा अन्दाज बान्धणे म्हणजे सुतावरुन स्वर्ग गाठने असे वाटते.

In reply to by अनिरुद्ध प

मला वाटलंच होतं की प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स उपलब्ध आहेत काय, हा मुद्दा येईलच. ही गोष्ट मलाही मान्य आहे की नियमित डॉक्टर्स उपलब्ध असत नाही, असले तरी ते शहरात राहण्यासाठी गेलेले असतात. वगैरे. नर्सेस दवाखाना चालवितात, वाहने उपलब्ध नाहीत. औषधं नाहीत. पण, डॉक्टर्स नाहीतच असं काही नाही. आता गावागावात प्राथमिक आरोग्य केंद्रे उभी राहीली आहेत. आणि रुग्णांना तिथे उत्तम उपचार मिळतात, असे उपचार मिळालेच पाहिजेत. प्रार्थमिक आरोग्य केंद्रात कोणी डॉक्टरांनीच असा विदा द्यावा. की विंच दंशाचे रुग्ण किती आले, सर्पदंशाचे किती आले, उपचार कितींना मिळाले, किती रुग्ण दगावले. मला वाटतं बाबाबुवांपेक्षा उपचारांच्या बाबतीत सरासरीने डॉक्टर्स पुढेच असतील. एका माणसाच्या बोलण्याच्या मानसिकतेवर म्हणजे शंभरात, हजारात असा एक म्हणु अशी माणसं असलेल्या विचारांचाही समाज आहे याचा अंदाज येतोच की, नसेल तसं तर माझं निरिक्षण चूक आहे, याचा विदा आपण द्यावा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका माणसाच्या बोलण्याच्या मानसिकतेवर म्हणजे शंभरात, हजारात असा एक म्हणु अशी माणसं असलेल्या विचारांचाही समाज आहे याचा अंदाज येतोच की, नसेल तसं तर माझं निरिक्षण चूक आहे, याचा विदा आपण द्यावा.
अहो प्राध्यापक साहेब - मी वयाच्या १५-१६ पूर्ण नास्तिक आहे, तसेच सर्व प्रकार च्या अंधश्रद्धांपासुन दुर आहे. पण सरकारचे दुसर्‍यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करणे पसंत नाहीये. मी डॉक्टर कडे जावे का मांत्रिका कडे हे ठरवण्याचा अधिकार मला पाहिजे. कोणावर सक्ती किंवा जबरदस्ती नसावी. सरकार जर ह्या गोष्टी ठरवू लागले तर फार धोकादायक आहे. दुसरे सरकार आले आणि त्यांचे मत वेगळे असेल तर, ते सर्वांनी आस्तिक असावे आणि रोज पूजा / नमाज करावेत असा वटहुकुम काढेल.

In reply to by प्रसाद१९७१

>>>> प्राध्यापक साहेब - मी वयाच्या १५-१६ पूर्ण नास्तिक आहे, तसेच सर्व प्रकार च्या अंधश्रद्धांपासुन दुर आहे. आत्ताशी कुठं बरं वाटलं....! धन्स. >>>>> सरकारचे दुसर्‍यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करणे पसंत नाहीये. सरकारनं आपल्याल्या शिक्षणाची दारं उघडून दिली. आपण सरकारलं म्हटलं का, आम्ही अशिक्षितच बरे होतो... कशासाठी तुम्ही आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहात ? पण, शिक्षणाचा फायदा असा झाला की चांगलं वाईट याची समज आली. हिशेब टीशेब करता आले, आधुनिक विचारांची ओळख झाली. शिक्षणाचा फायदाच झाला ना ? काही चांगलं होत असेल तर तुमच्या माझ्या सारख्याने समाजाच्या भल्या गोष्टींचं समर्थन केलं पाहिजे. मला वाटतं सध्याचा कायदा पाहता त्यात काही धोकादायक आहे असे वाटत नाही. आणि असेलच तर सध्याचा कायदा म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ नाही की झाला तो निर्णय अंतिम आहे, त्यात बदल होतील. पण, एकदा कायदा तर येऊ द्या.. कायद्याचे ब-या वाईटाचे विचार होत राहतील. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा पूर्ण आदर राखून कळकळीची विनंती... कॄपया "धन्स" नको "धन्यवाद" लिहा.

In reply to by रामपुरी

>>>> कॄपया "धन्स" नको "धन्यवाद" लिहा. आपल्या विचारांचा आणि विनंतीचाही आदर करतो, पण, मला काय लिहायचं ते मी लिहीन. धन्स. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारनं आपल्याल्या शिक्षणाची दारं उघडून दिली. आपण सरकारलं म्हटलं का, आम्ही अशिक्षितच बरे होतो
प्राध्यापक साहेब - मी पण तेच म्हणतो आहे. सरकार ने शिक्षणाची दारे उघडुन दिली, पण सक्ती केली का शिक्षणाची? किंवा कोणी आई बापानी मुलाला शाळेतुन काढले तर त्याला जेल मधे टाकु असा कायदा केला का? शिक्षणाची सोय करुन दिली जेणे करुन ज्याला शिकायचे आहे तो शिकू शकेल. तसेच सरकार नी वैद्यकिय सेवा उपलब्ध करावी, लोकशिक्षण करावे. पण ज्याचे त्याला ठरवून द्यावे त्यानी काय करावे ते.

In reply to by प्रसाद१९७१

पण सरकारचे दुसर्‍यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करणे पसंत नाहीये. मी डॉक्टर कडे जावे का मांत्रिका कडे हे ठरवण्याचा अधिकार मला पाहिजे. कोणावर सक्ती किंवा जबरदस्ती नसावी. सरकार जर ह्या गोष्टी ठरवू लागले तर फार धोकादायक आहे.
याच न्यायाने उद्या तुम्ही असही म्हणाल की स्वतःला मुलगा हवाय की मुलगी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मुलीला गर्भातच मारलं तर त्यात चुकीचं काय?. किती लग्न करावी हा पण ज्याचा त्याचा प्रश्न मग होऊन जाउदे अ‍ॅट अ टाईम दहा बारा जणींशी/ जणांशी लग्न.... व्यक्तीस्वातंत्र्याचं मुल्य आम्हालाही उच्च वाटतंच हो... पण तुमचं व्यक्तीस्वातंत्र्य समाजाला हानीकारक असेल तर त्याला कायद्याचा वचक हवाच...

In reply to by आनन्दिता

याच न्यायाने उद्या तुम्ही असही म्हणाल की स्वतःला मुलगा हवाय की मुलगी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
यात चूक काय आहे? मला मुलगा हवा कि मुलगी हे ठरवण्याचा हक्क मला असावा, सरकारला नको. आणि… ज्या समाजात स्त्रियांविरुद्धचे गुन्हे सर्वाधिक वेगाने वाढत आहेत, त्या समाजाला माद्या पुरविण्याची जबरदस्ती मुलींचे-बहिणींचे रक्षण करण्यास अक्षम असलेल्या पांढरपेश्या बाप-भावावर कशासाठी?

In reply to by आनन्दिता

मला वाटते तुम्हाला पण मी काय म्हणतो आहे आणि गर्भात मुलीला मारुन टाकणे ह्यातला फरक समजतो आहे. जर १८ वर्ष वयाच्या पुढच्या मानसिक संतुलन ठीक असलेल्या माणसानी मला मांत्रिका कडुन च उपचार करुन घ्यावे असे ठरवले असेल तर सरकार कोण नाही म्हणणारे.

In reply to by प्रसाद१९७१

मी डॉक्टर कडे जावे का मांत्रिका कडे हे ठरवण्याचा अधिकार मला पाहिजे. कोणावर सक्ती किंवा जबरदस्ती नसावी.
सहमत. (अंनिसच्या संस्थळावरील मुद्यांच्या भाषेवरून) पण मला वाटते की जर मसुदा योग्य असला तर जे फसवत आहेत त्यांच्या विरोधात हा कायदा आहे. पक्षि: तुम्ही मांत्रिकाकडे जाऊ शकता नो प्रॉब्लेम, पण कायद्यानुसार मांत्रिक लबाडी करत आहे हे सिद्ध झाले तर त्याला त्याचे प्रोफेशन गुंडाळावे लागेल अथवा शिक्षा भोगावी लागेल. फक्त तुम्ही (लेट अस से) मांत्रिकाकडे जाण्याचा निर्णय घेत असताना त्याचा वाईट परीणाम हा एखाद्या असहाय्य (आजारी, मनोरूग्ण वगैरे) जीवावर होत असला तर त्याला तुम्ही जबाबदार ठरू शकता. हा मुद्दा एथिक्सचा आहे आणि त्यावर बरीच होऊ शकते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतक्या वर्षात कोकणात आणि सह्याद्रीच्या बहुतांश भागात फिरलोय ,आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली …सगळीकडे आरोग्यकेंद्रे आहेत , दुर्गम वाड्यात ऑन व्हील आरोग्यकेंद्रे आहेत. जिथे सरकारला पोचत येणं शक्य नव्हत अशा ठिकाणीही प्रवरा ट्रष्ट, कृष्णा मेडिकल फौंडेशन, वारणा ट्रष्ट इ. संस्था आरोग्यविषयक सेवा निशुल्क पुरवतात.प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावर औषध उपलब्ध असतेच भोंदू उपचारांमुळे भारतात दर वर्षी १.५ लाखांपेक्षा जास्त लोक दगावतात.

In reply to by मालोजीराव

तसे असेल तर उत्तमच्,परन्तु मी कोकणातला असल्याने,बहुतेक वस्ती ही दुर्गम भागात आहे म्हणजेच दरीत्,जीथे रस्त्यापर्यन्त पोचण्या साठी एक तर पुर्ण डोन्गर चढावा लागतो,(कधी एक उतरुन नदी ओलान्डुन) तेव्हा आप्ल्या व्हेन पर्यन्र्त पोचणे देखिल कठीन असते,आणि आपण वर्णन केलेला बहुतेक भाग हा पश्चिम महराष्ट्रात येतो तो काही इतका दुर्गम नाही,त्यामुळे दवाखान्यात उशीरा पोचल्याने सुद्धा रोगी दगावण्याचा धोका जास्त असतो.

सरकार जी घाई करतंय (आणि आधी इतका उशीर 'लावल्यावर' आता घाई) त्याबद्दलचा आक्षेप मी समजू शकते. यातून लोकशाही प्रक्रियेवर आघात होतो हे मान्य. बाकी आक्षेप समजण्याइतकी माझी मती नाही :-)

शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचा शिखंडी करून कोणी त्याआडून बाण चालवत आहे का - हा खरा प्रश्न आहे. शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचाच नव्हे तर प्रत्येकाचा शिखंडी करून नेते (कोणत्याही पक्षाचे नव्हे तर सर्व नेते) त्याआडून बाण चालवत आहेत हा कायदा जर असा वटहुकूम काढूनच करायचा होता तर आधी करायला हवा होता. कोण रोखत होतं. आणि येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हा कायदा संमत झाला नाही तर- झाला तर निवडणुकीसाठी उत्तम भांडवल... नाही झाला तर बघा विरोधकांनी नाही होऊ दिला कायदा. एक नवं भांडवल... कालच एका च्यानेलवर श्याम मानव ह्या कायद्याचा मसुदा / कलमे वाचून दाखवीत होते. ह्या आधी ती कलमे आम्हा साऱ्या जनतेला त्यांनी किंवा त्या च्यानेलने का वाचून, समजावून सांगितली नाहीत. ह्याचे उत्तर त्यांनी आधी द्यायला पहिजे. वारकऱ्यांचा ह्या कायद्याला विरोध होता तर मग ह्या कायद्याच्या, कलमांच्या प्रती काढून त्या संपूर्ण समाजामध्ये, किमान जे वारकरी होते त्यातील अनेक समजूतदार आणि अनुभवी व्यक्तींना का वाटल्या नाहीत. ह्यात आपल्या वारकरी समाजाच काही नुकसान नाही हे का नाही सांगितलं अनिस वाल्यांनी. कोणी रोखले होते त्यांना. का हा कायदा प्रत्येकाने त्यांच्या संस्थळावर जाऊनच पाहायला हवा होता

रोम्युलस व्हिटेकर, निलीमकुमार खैरे यांच्यारख्या सर्पतज्ञांनी तुम्ही वर नमूद केलेल्या सो कॉल्ड पारंपारिक उपचारपद्धती बोगस असल्याचे सिद्ध केले आहे. आणि ज्या प्रकारे भगत्या सर्पदंश झालेल्यांना मंदिरात नेउन देवाचा जप करायला लावून वेडेवाकडे चाळे करून, कधी कधी नागमणी (?) लावून विष उतरविण्याचा प्रयत्न करतो ते बघता या गोष्टी जादू-टोणा कायद्या अंतर्गत नक्कीच याव्यात. -भगत्याला चेम्बवलेला मालोजी

मुटे सरांचे आरोप खरोखरच हास्यास्पद आहेत.
साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे.
मी वयाची पहिली पंचवीस वर्षे एका टीपिकल खेडयात काढली आहेत. साप किंवा विंचू चावल्यानंतर डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाचा "पारंपारिक" उपाय केल्याने लोकांनी जीव गमावलेला पाहीला आहे.
काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.
हे जंगली पानांचे उपाय तपासता येतील का?

In reply to by धन्या

मी वयाची पहिली पंचवीस वर्षे एका टीपिकल खेडयात काढली आहेत. साप किंवा विंचू चावल्यानंतर डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाचा "पारंपारिक" उपाय केल्याने लोकांनी जीव गमावलेला पाहीला आहे.
सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात? सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात?

In reply to by प्रसाद१९७१

सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात? सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात?
सगळं असतं. पण गावातील अशिक्षीत जनतेला डॉक्टरांच्या उपचारापेक्षा मांत्रिकाचा उतारा जास्त पॉवरफुल वाटतो.

In reply to by धन्या

हे जंगली पानांचे उपाय तपासता येतील का?
आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी तपासली आहे का? ती कशी चालते तुम्हाला आणि अनिस वाल्यांना?

In reply to by प्रसाद१९७१

आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी तपासली आहे का?
बी. ए. एम. एस. आणि बी. एच. एम. एस या अभ्यासक्रमात शिकवले जाणारे उपचार विज्ञानाने तपासलेले असतात. तसं नसतं तर हे अभ्यासक्रम शिकवणारी सरकारमान्य महाविद्यालये नसती. या विषयातील पदव्या देणारी विदयापीठं नसती. "जडी बुटी" वाले आयुर्वेद अर्थातच या कक्षेत येत नाही.
ती कशी चालते तुम्हाला आणि अनिस वाल्यांना?
वाचून अंमळ मौज वाटली. इथे घाटपांडे काकांनी म्हटल्याप्रमाणे माझ्याही नकळत मी "अंनिस" वाला झालो आहे तर. :)

In reply to by धन्या

बी. ए. एम. एस. आणि बी. एच. एम. एस या अभ्यासक्रमात शिकवले जाणारे उपचार विज्ञानाने तपासलेले असतात.
तुमची काहीतरी चुकीची समजूत आहे. अशी तपासणी कुठेही झालेली नाही.

लेख पटलेला नाही ...पण कायदा करण्यात आतातायीपणा होत आहे ह्यावर सहमत आहे . एकुणच असे गडबडीने कायदा करणे हा कायदासुववस्था ह्याबबतीत सरकारच्या अपयशाला झाकण्याचा प्रयत्न वाटतोय . कायदा व्हावा पण उगाचच कोणाच्या हत्येचे भांडवल करुन आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन होवु नये ... सारखं सारखं सुप्रीम कोर्टात तोंडावर पडंण बरं नाही. ---डान्सबारची जादु सुरु होण्याच्या प्रतिक्षेत ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

लेख पटलेला नाही ...पण कायदा करण्यात आतातायीपणा होत आहे ह्यावर सहमत आहे
+१ ------------------
---डान्सबारची जादु सुरु होण्याच्या प्रतिक्षेत
+१११११११११११११

गंगाधर मुटेंचे शेतकर्‍यासम्दर्भात लेखन आवडते आणि सहमत असतो पण .. आज ते सरळ सरळ चुकीचे लिहित आहेत ..कोणत्याही मंत्राने आजवर सर्पदंश उतरलेला नाहिये.. >> त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात ..खरे तर ह्याने रक्ताभिसरण वाढते आणि रोगी दगवतो >>काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. >> सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते ह्याबद्दल काय म्हणावे ? जर नाग देवता असेल तर चावेलच का? वाईट याचे वाटते की मुटेंसारखा सुजाण कार्यकर्ता याचे समर्थन करतो आहे ! चुकीचे उपचार करणे हा गुन्हा आहे .. सापाप्रमाणेच भुत उतरवणे , अंगात येणे यावर सुद्धा भगत -देवॠषी जे उपचार करतात ..त्यावर सुद्धा कायद्याने बंदी आणली पाहिजे ..

In reply to by कपिलमुनी

>>>> वाईट याचे वाटते की मुटेंसारखा सुजाण कार्यकर्ता याचे समर्थन करतो आहे ! होना राव. आमचे मुटे साहेब, अशा काही गोष्टींचं समर्थन करतील असं वाटलं नव्हतं. असो, चालायचंच.. :( -दिलीप बिरुटे

२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच. मुटेसाहेब तुम्ही डॉक्टर हिम्मतराव बावस्कर नांव ऐकले आहे का..? इंगळी किती विषारी असते आणि त्याचे काय काय परिणाम होतात, किती मृत्यू होतात हे अनिल अवचटांच्या "कार्यरत" या पुस्तकामध्ये "विषावर उतारा" या लेखामध्ये वाचायला मिळेल. इंगळी मुळे होणार्‍या विषबाधेवरती उपचार करण्यामध्ये डॉ बावस्कर हे जगभरामध्ये "ऑथॉरिटी" मानले जातात. माझ्या मते - साप, विंचू व इंगळी चावल्यानंतरच्या तुम्ही दिलेल्या परंपरागत उपचारांना फारसा अर्थ नाहीये. आधुनीक विज्ञान शास्त्राकडे उत्तर नाही म्हणून परंपरागत उपचार करावेत हा आग्रह अयोग्य वाटतो.

In reply to by मोदक

+१ हिंमतराव बाविस्करांचं बॅरिस्टरचं कार्ट पुस्तक वाचा.... तुम्हाला विंचु दंशाच्या भयानकते विषयी आणि तंत्रमंत्राच्या फोलपणा ची ख्ररी कल्पना येईल... टु अ‍ॅड, विंचुदंशामुळे होणार्या मृत्युंचं जगभरातलं प्रमाण आजही ३-२२% आहे....

विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही. वरील विधाने पूर्णपणे असत्य आहेत फारच क्वचित माणूस एक तासाच्या आत दगावतो आणि ते सुद्धा बर्याच वेळेला त्याने सापाशी झटापट केल्यास साप अनेक वेळा चावल्याने विषप्रभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने असे होते. वैयक्तिक रित्या मी स्वतः १ ३ विषारी सर्पदंश रुग्ण पाहिलेले आणि उपचार केलेले आहेत. बहुसंख्य लोक सहा ते आठ तास सुद्धा प्रवास करून रुग्णालयात पोहोचून सहज जिवंत राहतात प्रसिद्ध सर्प तज्ञ श्री रोमुलस व्हिटेकर हे तीन वेळा नागराज(king cobra) चावूनही अजून जिवंत आहेत. विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णास कोणत्याही पारंपारिक पद्धतीने उपचार करून पूर्णपणे बरे करता येते हे मुळीच सिद्ध झालेले नाही. जे पारंपारिक उपचार आपण लिहिलेले आहेत ते विषारी साप चावल्यावर पूर्णपणे निरुपयोगी आहेत. साप चावतो तेंव्हा बर्याच वेळेला त्वचेवर जखम दिसत नाही आणि साप विष आपल्या पोकळ दातातून त्वचेच्या आत खोलवर(इंजेक्शन सारखा) सोडतो त्यामुळे चुना हिरवा वगैरे होत नाही. दुर्दैवाने पारंपारिक पद्धतिचा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर मांत्रिक रुग्णाला सरकारी दवाखान्यात "फुटवतो"(जगाला तर मी जगवला मेला तर सरकारी दवाखान्यात) यात मौल्यवान असा वेळ फुकट जातो आणि रुग्ण मृत्यू च्या अधिक जवळ मात्र जातो. वैद्यकीय भाग तेवढा लिहिला आहे बाकी सामाजिक भाग हा चर्चेचा भाग आहे.

In reply to by सुबोध खरे

श्री रोमुलस व्हिटेकर हे तीन वेळा नागराज(king cobra) चावूनही अजून जिवंत आहेत.
कात्रज सर्पोद्यान चे संचालक निलीम्कुमार खैरे यांनाहि ७-८ वेळा सर्पदंश झालेला आहे, अशाच एका सर्पदंशामुळे त्यांना एक हात गमवावा लागला (त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती पण शिकाऊ डॉक्टरच्या चुकीमुळे हात कापावा लागला )

In reply to by मालोजीराव

अण्णांना (निलीमकुमार खैरे)किंग कोब्रा कधीच चावला नाही (नशीब चांगले आहे त्यांचे :)) त्यांना चावलेले साप सगळे बिग फोर मध्ये येतात. यामुळे अण्णांची महती आणि कार्य कमी होत नाही, किंवा मला तसे म्हणायचे पण नाही. पण मला असे वाटते की, वरती डॉ.खरे साहेबांनी किंग चे उदहरण दिले आहे कारण किंग च्या विषाचे प्रतिविष अजून भारतात उपलब्ध नाही. जे काही वापरले जात ते थाईलंड च्या किंग साठी बनवलेले प्रतिविष आहे. त्यामुळे थोडे जुगाड करून का होईना त्या प्रतीविषाने व्हिटेकर साहेब वाचले. अण्णांच्या हाताला घोणस चावला होता.

In reply to by सुबोध खरे

"साप चावतो तेंव्हा बर्याच वेळेला त्वचेवर जखम दिसत नाही "??? उलट मी असं वाचलं होतं की साप चावलेल्या जखमेवरून लक्षात येतं की साप विषारी होता की बिनविषारी. जर दातांच्या खुणा एक सारख्या असतील तर तो बहुधा बिनविषारी असतो आणि जर समोरचे दोन दात ठळक उठून दिसत असतील तर तो बहुधा विषारी असतो.

In reply to by रामपुरी

साप चावल्या वर फक्त दाब पट्टी बांधून त्या व्यक्तीला आडवे झोपवावे. (त्याची हालचाल मर्यादित ठेवावी)नंतर त्याला ताबडतोप सरकारी दवाखान्यात 'हलवावे' (हा शब्द महत्वाचा आहे, टेबल उचलून हलवतो तसे)तसेच सरकारी दवाखाना कारण तिकडे अनुभवी डॉक्टर असतात. सर्पदंशाच्या उपचाराला अनुभवी डॉक्टर लागतो तो फक्त सरकारी दवाखान्यात असू शकतो कारण भारतातले सर्पदंश जास्त खेड्यात किंवा शेतात होतात. म्हणून शेतकरी नेहमी सरकारी दवाखान्यात जातात.(सरकारी दवाखान्यात उपचार स्वत असतो: मण्यार चावल्यावर private दवाखान्याचा फक्त प्रतीविषाचा(antivenom) चा खर्च ५०००० ते ६०००० पर्यंत गेलेला मी पहिला आहे आणि तो माणूस वाचला पण नाही) १) जखम धुण्यात वेळ घालवू नये कारण खूप वेळा जखम हि मोठी नसते, साप फक्त दात लावून जातो (दाढी करताना किवा भाजी कापताना जी जखम होते तेवढी). काही पुस्तकामध्ये विषारी सापाच्या दातांचे व्रण दिलेले असतात, तशी जखम व्हायचे प्रमाण खूप कमी असते. त्वचेवरचे विष बघून ओळखणे खूप कठीण आहे कारण विषाला अगदी थोडा पिवळा रंग असतो. डॉक्टर नेहमी रोग्यावरून ठरवतो की कुठल्या सापावरचे प्रतिविष द्यायचे(हे खूप वेळा खूप अवघड असते, त्या साठी मी लिहिले तसा अनुभवी डॉक्टर लागतो) म्हणून जखम धुण्यापेक्षा चावलेला साप कुठला आहे ते आजूबाजूला बघायचा प्रयत्न करा. २)सर्पदंशाच्या जखमेवर कधी पण ब्लेड मारू नये (लोकं ब्लेड मारताना मी पहिले आहे). चुकून नस कापली जावून जास्त रक्तस्त्राव व्हायची शक्यता असते. समजा तसे झाले तर रक्तस्त्रावामुळे ग्लानी येऊ शकते किंवा मृत्यू पण येऊ शकतो.काही बाबतीत मी असे ऐकले आहे कि खराब ब्लेडमुळे जखम सडून गेली आणि डॉक्टर ला प्रतिविष द्यायला त्रास झाला. विष शरीराबाहेर पडू शकत नाही कारण ते खूप लवकर शरीरात पसरते (१०^-९ सेकंदात). सर्पदंशाचे उपचार सोपे नसतात (animal-planet किंवा discovery सारखे ) आणि माणूस वाचल्यावरसुद्धा जखमेमध्ये बाधा होऊन कधी कधी अवयव कापून टाकावा लागतो. त्यामुळे सर्पदंश झाल्या वर जास्त जखमेशी खेळ न करता सरकारी दवाखान्याचा मार्ग पकडावा. सापाचे विष पाण्यासारखे प्यायले तर ..१)पोटात किंव्हा तोंडात जखम (ulcer) असेल तर माणूस मरेल.२) जखम नसेल तर त्याचे पोट बिघडेल smiley (जास्त प्रोटीन पचवणे अवघड असते )

In reply to by सुबोध खरे

माहितीबद्दल धन्यवाद डॉ. खरे!! श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांना एकदा सिंहगडाच्या पायथ्याजवळ एक अत्यंत दुर्मीळ (आपल्याकडे आढळणार्‍या बिग फोर ग्रूप पैकी नव्हे) पण अत्यंत विषारी साप चावला. त्यानंतर गणपती विसर्जनाच्या गर्दीतून स्वतः चारचाकी गाडी चालवत सिंहगड पायथा ते कात्रज सर्पोद्यान व नंतर पुण्यातील एक हॉस्पीटल असा प्रवास त्यांनी केला. उलट्या, जुलाब, लघवीतून रक्त जाणे व रक्ताचा क्लॉटींग टाईम वाढणे वगैरे त्रास होवूनही ते बरे झाले. या सर्व घटनेचे वर्णन त्यांच्या "आसमंत" या पुस्तकात आहे! तस्मात मुटेसाहेबांचे "साप चावल्यापासून १ तासाच्या आत.." ते गृहीतकही चुकीचे वाटते आहे.

In reply to by मोदक

डॉ.श्रीकांत इंगळहळ्ळीकर ना स्लेन्डर कोरल साप चावला होता. हा चावण्याच्या केसेस खूप कमी असतात कारण याचे विषाचे दात मागे असतात आणि तो जास्त करून दाट जंगलात सापडतो. याचे विष नुरोटोक्सिक (मज्जा संस्थेवर परिणाम होणारे ) असते. डॉ.श्रीकांत इंगळहळ्ळीकर त्या सापाचा फोटो काढायला गेले, त्यांनी तो साप बिग फोर मध्ये कधीच पहिला नव्हता त्यामुळे विषारी असेल असे वाटले नाही, बाटली मध्ये त्याला घालताना त्याने त्यांच्या बोटाला दात लावले. कसे बसे करत दुपारी ~४ तासने ते दत्तवाडी च्या हॉस्पिटल (बहुतेक) पोहचले आणि नंतर त्यांच्या वरती उपचार केले गेले.

या कायद्याचा सारांश खाली दिलेला आहे. लोकांचा छळ, फसवणूक, लैंगिक शोषण कुठच्यातरी जादूटोण्याच्या आधारे करणारांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. 'इतर कायदे आहेतच की' हा युक्तिवाद पुरेसा जोरकस नसतो. विशेषतः काही लोकांचा स्वार्थ समाजात पसरलेल्या अज्ञानावर आधारित असतो तेव्हा. माणसाला मारणं हा गुन्हा कायमच होता. त्याविरुद्ध कायदेही होते. पण सतीबंदीसाठी स्वतंत्र कायदा करावा लागला. आणि त्या कायद्याचा फायदाही झाला. सारांश १) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील. (भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.) २) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल. ३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा. ४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे. ५) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे. हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही. ६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे. ७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे. ८) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे. ९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे. १०) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे. ११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवणे. १२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. :) जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) http://www.misalpav.com/node/25468

मी म्हणीन, शेतकऱ्याचा विचार करून तळमळीने लिहिलेला लेख आहे, पण शास्त्रीय दृष्ट्या चुकीचा आहे. वरती खरे डॉक्टरांनी आणि अनेक लोकांनी खूप शास्त्रीय प्रतिक्रिया दिल्याच आहेत, त्यात थोडीशी भर घालतो. सुरवाती पासून जातो.. सगळे लोक छोट्या लाल विंचवाला -साधा विंचू आणि काळ्या मोठ्या विंचवाला इंगळी म्हणतात. इंगळी आणि विंचू यात पण सापासारखे प्रकार असतात. खर तर इंगळी दिसायला मोठी दिसते पण तिचे विष कमी तीव्र असते. पण लाल छोटे विंचू दिसयला साधे असले तरी त्यांचे विष जास्त जहाल असते. महाड, अलिबाग, पोलादपूर इथे Hottentotta tamulus concanensis (लाल विंचू) नावाची जी जात सापडते त्याच्या विषाने माणसाच्या मज्जा तंतू आणि रक्तावर वर परिणाम होऊन माणूस दगावतो. त्याच्या वर डॉ. हिम्मतराव बावीसकरांनी स्वस्त उपचार शोधला आहे आणि तो आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये (लान्सेत ) छापला पण आहे त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तो उपचार वापरून त्यांनी हजारो खेड्यातली लोकं बरी केली आहेत. त्यांनी स्वतः ३०००० डॉक्टरांना ते औषध कसे वापरायचे ते शिकवले आहे. त्या उपचाराचे वर्णन तुम्हाला त्यांच्या पेपर मध्ये सापडेल तो पेपर गुगल वर फुकट उपलब्ध आहे. हे उपचार एवढे स्वस्त आहेत की कोणी पण गरिब ते वापरू शकतो आणि कुठला पण साधा फिजिशियन डॉ. ते करू शकतो. डॉ. बावीसकर पेपर साधा विंचू आणि इंगळी या दोन्ही मला स्वतःला खूप वेळा चावल्या आहेत. त्या वरून माझा अनुभव असा आहे की बोटाला विंचू चावला तर, विंचवाचे विष हातामधून काखेपर्यंत वाहते (तुम्हाला ते सरकत असताना जाणवते, कारण वेदना सरकत जाते )काखेमध्ये एक छोटीशी गाठ येते आणि ती त्या विषाला पुढे जायला रोखते.( मेडिकल स्पष्टीकरण मिपाकर डॉ. खरे देऊ शकतील.) हे सगळे ४-५ तास चालते, हात दुखत राहतो. या वेळी मी कुठले पण उपचार केले नाहीत, फक्त विंचू चावल्यानंतर तो विंचू वरती वर्णलेला नाही ना आहे का हे मी तपासून बघायचो. म्हणजे माझ्या मतानुसार विंचवावरचे पारंपारिक उपचार फक्त रोग्याला मानसिक समाधान देतात, किंवा त्याचे मन दुसरीकडे वळवतात. (लहान मुलं कुठे धडपडली की आई-बाप त्यांना चोकलेट देतात.) आत्ता तुम्ही दिलेल्या वर्णनाप्रमाणे जर Hottentotta tamulus concanensis चावलेला माणसाने पारंपारिक उपचार घेतले तर तो वाचणार नाही. आत्ता आख्ख्या महाराष्ट्रमध्ये १०० लोकांना विंचू चावला तर त्यातील फक्त २० लोकांना हा विंचू चावणार आणि याचा पारंपारिक उपचार करणारे फायदा घेणार. (मी भोंदू बाबां बद्दल बोलत आहे.) या भोंदू बाबांना रोखायचे तर हा कायदा आहे.

In reply to by जॅक डनियल्स

महाड, अलिबाग, पोलादपूर इथे Hottentotta tamulus concanensis (लाल विंचू) नावाची जी जात सापडते त्याच्या विषाने माणसाच्या मज्जा तंतू आणि रक्तावर वर परिणाम होऊन माणूस दगावतो.
महाड तालुक्याच्या आधीचा तालुका माणगांव. या माणगांव तालुक्यातील एका खेडेगावात मी लहानाचा मोठा झालो. सहावी ते अकरावी या सात वर्षात गुरे राखली. सुट्टीच्या दिवशी आणि विकडेजला सकाळी मी गुरे चरायला नेत असे. त्यावेळी रानातले दगड हातातील गुरे हाकलायच्या काठीने पलटी करुन मी त्या दगडांखाली असलेले विंचू मी ठेचत असे. सहावी सातवीला असताना गुरे राखायला गेल्यावर माझा हा आवडता उद्योग असे. पुढे डॉ. बावीसकरांबद्दल वाचले. त्यांचे संशोधनपर लेखन वाचले. आणि लक्षात आले डॉ. बावीसकरांनी वर्णन केलेली विंचवाची जात आणि मी लहानपणी खेळ म्हणून ठेचत असलेल्या विंचवाची जात एकच होती. मी खेळ म्हणून जे विंचू मारत असे, त्यातला एखादयाने जरी नांगी मारली असती तर माझाच खेळ खलास झाला असता.

In reply to by जॅक डनियल्स

डॉक्टरांचे नाव हिम्मतराव बाविस्कर नसून बावसकर आहे. लाल विंचवाचे विषाचा मोठ्या माणसानवर तेवढा जास्त प्रभाव होत नाही आणी सर्वात जास्त प्रभाव लहान मुलांवर होतो( वजनाच्या प्रमाणात विषाची मात्रा जास्त होते त्यामुळे) लाल विंचू चावल्यावर माणसाच्या रक्ताचा दाब प्रमाणाच्या पेक्षा वाढतो आणी त्यामुळे हृदयाचे काम अस्थिर होऊन रुग्णाला आकडी येते आणी रुग्ण दगावण्याची शक्यता असते यात प्राझोसीन नावाचे औषध शिरेतून दिले जाते आणी रुग्णाचा रक्तदाब नियंत्रित केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राझोसिन हे औषध विंचवाच्या प्रतीविषापेक्षा जास्त परिणामकारक आहे असे आढळले आहे. प्राझोसीन हे औषध अतिशय स्वस्त आणी कोणत्याही रुग्णालयात नेहेमी वापरले जाणारे औषध आहे. डॉक्टर बावसकरांच्या या संशोधनाने हजारो बाल रुग्णांचे कोकणात जीव वाचले आहेत. रच्याकने- हि सर्व माहिती मला स्वतः डॉक्टर( बावसकर) साहेबांच्या तोंडून ऐकायचे भाग्य लाभले. आम्ही ठाणे जिल्ह्यात एका डॉक्टर म्हसकरांच्या रीसोर्टला गेलो असताना ते स्वतः तेथे आले होते.डॉक्टरसाहेबाना मी( तेंव्हा मी लष्करात डॉक्टर होतो त्यामुळे थोडेसे वजन होते) विनंती केल्यावर त्यांनी तेथे या विषयावर एक छोटेसे भाषण दिले आणी आपले स्वतःचे अनुभव अतिशय सुंदर शब्दात सर्वाना सांगितले. अत्यंत हुशार पण साधा आणी सरळ माणूस आहे हे लगेच कळून येते.त्यांच्या सेवावृत्तीला प्रणाम.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद् ! थोडी चूक झाली. डॉ. बावसकरनी हे प्रयोसीन औषध कसे देतात आणि ते त्यांनी कसे शोधले हे मी त्यांच्या पुस्तकात वाचले होते पण आत्ता इकडे ते पुस्तक माझ्या कडे नसल्याने संदर्भ देता आले नाहीत.

मुटे यांचा लेख वाचला. तर्कसंगत वाटला. एक मुद्दा हत्या का झाली ? कुणी तरी असेच एक बाबा आहेत, त्यांचा भांडाफोड करण्याची घोषणा डॉ. दाभोळकरांनी केली होती. त्यांचे नाव घेतले जात आहे. आणि असे बाबा राज्यकर्त्या पक्षाशी संबंधित असतील तर पुढे काय होणार आपण कल्पना करु शकता.

मुद्दा सरकार व्ययक्तीक जीवनात हस्तक्षेप करत आहे हा आहे प्राध्यापक बिरुटे सर, आनंदिता आणि बाकी बरेच सुशिक्षीत मिपावासी ह्यांना हा कायदा झाला असल्या मुळे बरे वाटले आहे. त्यात चुक पण काही नाही. पण हे लक्षात घ्या की अश्या कायद्याच्या निमित्ताने सरकार तुमच्या व्ययक्तीक विचारधारा ठरवायचा प्रयत्न करत आहे्. आणि हे खुप धोकादायक आहे. मी नास्तिक आहे त्यामुळे समाजात एकदम मायनोरिटी मधे आहे, त्यामुळे मला सरकार अशी सक्ती करु लागले की भीती वाटते. आज तुम्हाला पाहिजे तसा कायदा केला गेलाय. नंतर दुसरे धार्मिक सरकार आले, आणि त्यांनी म्हणले की जे नास्तिक आहेत त्यांना ७ वर्ष तुरुंगात टाका. तर? जर मला आज मांत्रिका कडे जायला सरकार बंदी घालू शकते, तर उद्या दुसरे सरकार मी नास्तिक आहे म्हणुन मला शिक्षा करु शकते. म्हणुनच मी पहिल्यापासुन म्हणतो आहे की हा कायदा जरी आपल्या सर्वांना योग्य वाटत असला तरी सरकारला अशी सक्ती करण्याची संधी देऊ नये.

In reply to by प्रसाद१९७१

मी नास्तिक आहे
आणि तरीसुध्धा मांत्रिकावर विश्वास??...कारण मांत्रिकावर विश्वास ठेवणे म्हणजे मंत्रविद्या, त्यांच्या देवता (आणि त्याचबरोबर सगळ्या ३३ कोटी देवांवर विश्वास ठेवणे) तुमच्या घरातल्या व्यक्ती आजारी असतिल असतील तर तुम्ही त्याना डौक्टरकडे कधीच घेउन जायला नको मग...बरोबर??

In reply to by टवाळ कार्टा

आणि तरीसुध्धा मांत्रिकावर विश्वास??...
असे मी कधी म्हणले? तुम्ही नीट वाचा मी काय लिहीले आहे ते. लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे मूर्खपणा करायचे ( दुसर्‍यांना त्रास न होता ) व्यक्ती स्वातंत्र आहे की नाही?

In reply to by प्रसाद१९७१

लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे मूर्खपणा करायचे ( दुसर्‍यांना त्रास न होता ) व्यक्ती स्वातंत्र आहे की नाही?
व्वा :)

In reply to by प्रसाद१९७१

मुलांना शाळेत घालणे हे पालकांचे पालकांचे कर्तव्य आहे तसेच योग्य उपचार करणे हे पिडीत व्यक्ती सोबतच्या लोकांचे कर्तव्य आहे . असे उपचार मिळणे हा लोकांचा हक्क हक्क आहे . हा कायदा योग्य उपचार देण्यासाठी आणि अयोग्य उपचारांपासून वाचण्यास मदत करेल . यात कोणत्याही वैयक्तिक हक्कावर गदा येत नाही . हा कायदा आस्तिक असण्याला , देवाची उपासना करण्यास विरोध करत नहि.

जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे.
मुळातले कलम काय आहे सांगु शकाल काय? (पेपरात आलेले सारांश नव्हे. आजकाल पेपरात जे येते त्यात सारे काही सत्य मिळाले तर पेढे वाटले जातात म्हणणे ;) ) ते वाचल्याशिवाय लेखातील भावनेशी सहमती/असहमती शक्य नाही

In reply to by ऋषिकेश

अहो कायदा अथवा वटहुकूम लांब राहीला... हे सरकारी संस्थळावरून पाहीले.... मंत्रिमंडळ त्रिर्णय 21 ऑगस्ट, 2112 (मंत्रिमंडळ बैठक क्र. 129) हे वाचले तर समजेल की अधिकृत नोंदींमधे वटहुकूम काढला जावा ही जी काही बातमी माध्यमांमधे आली आहे त्याची साधी नोंदही नाही आहे. :(