Skip to main content

विचार

फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 10/07/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स, हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे.

सुख

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 09/07/2013 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यभर सुखाकरिता धडपडणे किंवा त्याचा शोध घेणे हा माणसाचा आवडता छंद असतो. त्याचे अवघे आयुष्य या धडपडीत निघून जाते. पण नेमके सुख कशात असते हे त्याला समजत नसते. नेमके काय केल्याने सुख मिळेल हे त्याला समजत नसते. बालपण खेळण्या बागडण्यात, तारुण्य विषयोपभोगात तर वृद्धत्व माणसाला रोग व चिंता यांनी ग्रस्त अवस्थेत नेउन सोडते. त्यामुळे मिळालेले सुखाचे क्षण उपभोगणे हेच योग्य. कारण मनुष्य स्वभाव असा आहे कि सुखाचा सहवास घडला तर त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याऐवजी ते ओसरून तर जाणार नाहीना या काळजीने मन काळवंडून जाते म्हणून सुखात डुंबता आला पाहिजे. शेवटी सुख हे मानण्यावरच असते नाही का?

तेरी मेरी कहानी........ दो नैनो की

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 02/07/2013 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु. नक्की काय झाले ते...... नजरेची जादू अशी असू शकते....... अनुभवायचं आहे? डोळे झाक....... ए यडबम्बु तुला म्हणतेय मी. डोळे झाक ना... अं........ हे रे काय ....... एक सांगु... हंम्म.... हम्म काय साम्गु...... हं. कानात सांगते..... कानात कशाला.... मोठ्यने सांग. भिंतीला कान असतात मग भिंतींच्या कानात सांग. शी कसला अरसीक आहेस रे. अगं अरसीक नव्हे. मागच्या वेळेस असेच कानात सांगायला म्हणून तु जवळ आलीस अन कान चावलास. ते लक्षात आहे तुख्या अन तु काय केलस ते विसरलास. काय काय केलं मी इश्श्य... ए बाई ते जाउ देत काय सांगणार होतीस ते सांग. थोडा इकडे ये ना..... हं....... अस्साच थांब.....

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 26/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

फुकटची समाजसेवा -पुढे

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुम्बैच्या अश्विनी रुग्णालयात इंटर्नशिप करीत असतानाची (१९८८) गोष्ट आहे. एके दिवशी रात्री साधारण साडे आठ वाजता एका नौदलाच्या अधिकारी(लेफ्टनंट कमांडर यादव) एका पोस्टाच्या कर्मचार्याला घेऊन आला. त्या अधिकार्याने स्कूटर चालवत असताना या कर्मचार्याला धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या वादात तो त्याला नौदलाच्या रुग्णालयात घेउन आला होता. मी त्या कर्मचार्याची तपासणी करू लागलो तेवढ्या वेळात तो नौदल अधिकारी तेथून पसार झाला. मी त्याची तपासणी केल्यावर माझ्या असे लक्षात आले कि त्याच्या घोट्याला वाईट फ़्रैक्चर आहे आणि त्याची शल्यक्रिया करणे आवश्यक आहे.

फुकटची समाजसेवा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तसा माझा मूळ पिंड समाजसेवेचा नाहीच. इतर लोकांच्या सारखी सोसल तेवढी सोशल सर्व्हिस मी पण करतो . पण वैद्यकीय व्यवसायात फारसे कष्ट न करता समाजसेवा करता येते त्याचा हा एक वृत्तांत. पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मध्ये काम करीत असताना ची गोष्ट आहे. तेथे दहा रुपयाचे कार्ड काढले कि कोणतीही सेवा ( औषधासकट) फुकट मिळवता येत असे यात फक्त कर्करोगाची औषधे अंतर्भूत नव्हती ( कारण कर्करोगाचे उपचार तेथे सिव्हिलियन साठी नव्हते ) मी तेथे क्ष किरण विभागात कामाला होतो आणि आर्मीच्या हिरवट खाकी(OLIVE GREEN) गणवेशात मी एकटा नौदलाच्या पांढऱ्या वेशातील बगळा होतो. त्यामुळे रुग्णांना मला ओळखणे फार सोपे होते.

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 22/06/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.

२१ जून, मॉस्को..(२)

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 22/06/2013 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी आल्यावर जेवून ८.४५ च्या सुमारास घराजवळील 'व्हिक्टरी पार्क' कडे निघालो. व्हिक्टरी पार्क सोव्हियत युनियनच्या अंतीम काळात तयार झाले. हे रशिया आणि नाझी जर्मनीच्या 'ग्रेट पेट्रीयोटिक वॉर'(१९४१ ते १९४५ दुसरे महायुध्द)च्या विजयाचे स्मारक आहे. १९९५ मध्ये या विजयाच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी या स्मरकाचे उद्घाटन झाले. या जागेला आणखी ऐतिहासिक महत्व देखील आहे.

सावधान........

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, 21/06/2013 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सगळ्यांच्या तोंडी सेकंड होमचा बोलबाला आहे. ते ऐकल्यावर मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली ..... एक वृद्ध माणूस असतो. त्याला तीन मुले असतात. तो त्यांना काही पैसे देतो आणि सांगतो की तुम्ही प्रत्येक गावात घर करा. तेंव्हा त्यातला एक प्रत्येक गावात घरे घ्यायचा सपाटा लावतो. दुसरा सगळ्या गावातन माणसे जोडतो. आपण सगळे पहिल्यासाखरे वागायला लागलो आहोत. आणि सृष्टीचा समतोल बिघडवण्यात हातभार लावतो आहोत आपण वेळीच सुधारायला हवे अन्यथा आत्ताच्या विनाशाची पुनरावृत्ती सगळीकडे व्हावयाला वेळ लागणार नाही.. सावधान....... सावधान....... सावधान.......

पवारसाहेब, कलमाडी, गाडगीळ.

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 20/06/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणूकीचे वेध आता सगळ्यांनाच लागले आहेत. तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी निरनिराळया आघाड्यांवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. पूर्वीच्या काळी देशात घडणार्‍या अनेक गोष्टींचे पुणे हे केंद्र असे. मागील काही काळात कलमाडी, प्रदीप रावत, विट्ठल तुपे, अण्णा जोशी असे खासदार पुण्याला मिळाले पण देशपातळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याला मिळालेला नाही. भाईंचे नाव झाले तेही चांगल्या गोष्टींसाठी नाही. पण पुण्याची निवडणूक अनेक गोष्टींसाठी गाजते. अण्णा जोशी विरुद्ध विट्ठलराव गाडगीळ अशी पहिली निवडणूक झाली.