Skip to main content

विचार

ताळेबंद

लेखक देवांग यांनी सोमवार, 23/09/2013 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यावरचं कर्जाचं ओझं जड झालं की आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य संपवणं , हा अलीकडे सोपा इलाज होऊ लागला आहे. पण आयुष्य मौल्यवान असतं , आपलं आणि आपल्याशी जोडलेल्या कुटुंबाचंही. ते ' अर्थपूर्ण ' करणं अधिक सोपं आहे , संपवण्यापेक्षा. .......... गेल्या आठवड्यात एका बातमीने सगळं मुंबई शहर हादरून गेलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कर्जबाजारी बापानं मुलांचा खून केला आणि नंतर पत्नीसह आत्महत्या केली. दोन दिवसांनी घरातून कुजलेले मृतदेह बाहेर काढावे लागले! खरंतर अशा बातम्या महिन्या दोन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या शहरातून येत असतात. तपशील बदलतात ... कहाणी एकच असते. कर्जात आकंठ बुडालेलं कुटुंब.

चूझिंग द इझी ऑप्शन

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/09/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हे बघ, तू रोज व्यायाम कर, व्यवस्थित, चांगलं खा; तुला फिट होण्यापासून काहीही अडवू शकत नाही." मी मित्राला म्हटलं. "रोज?????" प्रचंड संकट समोर आल्यागत भाव चेह-यावर आणून त्याने विचारलं. "बरं एक दिवसा आड कर रे, पण कन्सिस्टंटली कर." मी काठिण्य पातळी कमी केली, आणि लगेच त्याच्या चेह-यावर हसू फुललं. इतक्यात बाजूला उभा असलेला एक मित्र वडापाव चा घास घेत म्हणाला, "त्यापेक्षा डाएट कर ना! त्या सचिन ने केलं ना आमच्या सोसायटीतल्या... नो व्यायाम नो नत्थिंग. फक्त गोड बिड नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं असं थोडंसं पाळायचं आणि ते देतात ती आयुर्वेदिक औषधं घ्यायची.

हि गणपतीची अहवेलना थांबवायला हवी.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 17/09/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , सर्व प्रथम सर्व थोरा मोठ्यांना माझा नमस्कार. मी नवीन सभासद असून माझे काही विचार मी इथे मांडतो आहे. तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. गेल्या काही वर्षात गणपती उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलेले आहे, नदी तलाव प्रदूषित होवू नये म्हणून आपण सर्वजण इको फ्रेंडली (याला मराठी शब्द सुचवा कि कोणीतरी) गणेशोत्सव साजरा करीत आहेत. निसर्ग, पर्यावरण या विषयी जनता जागरूक होत आहे या बद्दल जनतेला धन्यवाद.

स्वत्वाचा शोध

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 10/09/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्वत्वाची संकल्पना - मनुष्य स्वतःला 'मी' म्हणून संबोधतो. त्यात दोन भाग आले. मनुष्य एक जीव म्हणून कसा आहे याचे वर्णन हा पहिला भाग. अनेक शास्त्रांनी या भागावर चिकित्सा करून अधिकाधिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. आपल्या असा एक जीव असण्याचे श्रेय सहसा कोणी विवेकी मनुष्य आपल्याकडे घेत नाही. म्हणजे मी अमुकराव आहे 'म्हणून' माझ्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, अन्न पचवण्याची शक्ती आहे, असे कोणी मानत नाही. दुसरा भाग म्हणजे ज्याचे संपूर्ण श्रेय प्रत्येकजण आपल्याकडे घेतो.

झगमगाटात हरवलेले . . . . .

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 07/09/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे. ....................................................................................... परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता..

विजय आणि भूक (शतशब्दकथा)

लेखक एच्टूओ यांनी शुक्रवार, 06/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
(मि पा वर लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुन्याजाणत्या मि पा करांनी सांभाळून घेणे. चू भू दे णे ) या वर्षीच्या नागपंचमीला आमच्या "वनमित्र" संघटनेच्या आंदोलनात जवळपास ५० नागांना गारुड्यांच्या तावडीतून जंगलात सोडलं.पोलिसांचीही लगेच मदत मिळाली आणि तत्पर कारवाई करून १२ गारुड्यांना तुरूंगात टाकलं. आधीच मिडिआला फोन केल्यामुळे, "अध्यक्ष" या नात्याने मी आंदोलनचे यश प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजयी मुद्रेने मांडले. घरी आलो. आजीशी बोलतांना तिने विचारलं "नागांना रानात सोडलं,चांगलच केलं. पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?" " अगं आजी, कायदाच आहे तसा" "ते काही मला कळत नाही सोन्या !

कायद्यात काही 'जादूटोणा' नाही

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 05/09/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
एडव्होकेट निर्मलकुमार सूर्यवंशी, महोदय, आपला दि ५ सप्टेंबर २०१३ च्या लोकसत्तामधील 'कायद्यात काही "जादूटोणा" नाही' अशा समर्पक शीर्षकाचा लेख वाचला. गैरसमज दूर व्हावेत याबाबत आपले लेखन स्तुत्य आहे. काही विचारणा - १. ज्या व्यक्तींच्या अनंत कष्टांमुळे हा कायदा निदान १२ कलमाच्या रू़पात सध्या सादर केला आहे, त्यांच्या संस्थांला या कलमांच्या आधारे दोषी लोकांना शोधायच्या व शिक्षा करायच्या कामात मदतनीस म्हणून सहभागी करता आलेले आहे की नाही? २.

दप्तराचे ओझे कमी करा

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
दप्तराचे ओझे कमी करा कालच एका सामाजिक संस्थेने दप्तराचे ओझे या वर एक सर्वेक्षण करून त्याचे आलेले निष्कर्ष प्रसिध्द केला आणि सर्वांना विचार करायला भाग पाडले. मी ही एक साधा माध्यमिक शिक्षक गेली २२ वर्षे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे शिरगाव ( ता. देवगड ) च्या शिरगाव हायस्कूल शिरगाव मध्ये करत आहे. विद्यार्थ्यानी शिकायचे व शिक्षकानी शिकवायचे ही दोन्ही बाजूने चालणारी अखंड क्रिया. आज काल विद्यार्थ्याच्या पाटीवर असणार्या दप्तराचे ओझे इतके जास्त आहे की त्याच्या आरोग्यावर आणि पर्यायाने अध्ययनावर परिणाम होत आहे. या वर काही उपाय मी येथे देऊ इच्छितो.