Skip to main content

विचार

एका शहराची 'खाद्यसंस्कृती'

लेखक सुज्ञ
रविवार, 17/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलंच असेल कि लेखाचा विषय किती मोठा आहे . तुम्ही कधी माणूस चरताना बघितलाय का हो ? आणि नुसता गुरासारखा चरत असून परत स्वतःला खवैय्या म्हणताना … लवकर या गावात या … भाई काकांचाच एक वाक्य आहे , खूप गाणी गाणारा गावैय्या नव्हे तसे खूप खाणारा खवैय्या न्हवे.

ऊसदर आंदोलन - सरकार आणि कारखानदार

लेखक psajid
गुरुवार, 14/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा मुख्यत्वे कृषिप्रधान देश आहे. आणि या देशातील बहुतांश लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवतात. घामाबरोबर रक्त गाळून बळीराजा भारतातील लोकांची दोन वेळची भूक भागवतो. मात्र त्याच्या घामाचे योग्य दाम दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला थोडा जास्त भाव मिळाला तर महागाई वाढली याच्या नावाखाली सगळीकडून ओरडा होतो. नोकरदार मध्यम वर्गीय, दुरचित्रवाणीचे प्रतिनिधी नुसता गोंधळ घालून सरकारवर आयातीसाठी दबाव आणतात आणि बळीराजाला त्याच्या मिळणाऱ्या नफ्यापासून वंचित ठेवतात. वास्तविक शेतकरी हा त्याच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पनावर आपली उपजीविका करत असतो.

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

गुरुवार, 14/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत आविष्कार अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय "कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून. "दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे. आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ? मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला.

कॅसलिंग.......

लेखक विजुभाऊ
गुरुवार, 14/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो इथे मिपावर चतुरंग काकांची भन्नाट कॉमेन्ट्री वाचून बुद्धीबळातील एका खेळी बद्दल लहानपणापासून असलेले कुतुहल पुन्हा जागे झाले. तसे आमच्या ग्यांगचे बुद्धीबळाचे ज्ञान तोकडेच. राजा कुठे फक्त एक घर चालु शकतो. उंट तिरका जातो. घोडा अडीच घरे जातो. हत्ती उभ्या आडव्या रेषेत फिरतो. प्यादे सरळ एकच घर फक्त सुरवातीला दोन घरे फक्त मारायला सरळ न जाता तिरके एक घर इतके नियम माहीत असले की झाले . आले बुद्धीबळ. उन्हाळ्यात पत्ते खेळताना विशेषतः गड्ड्या झब्बु च्यालेन्ज किंवा नाटेकाटेठोम खेळताना भरपूर आरडा ओरडा व्हायचा. च्यालेन्ज मधला च्यालेन्ज उचलेन्ज तर फार प्रिय. त्यामानाने बुद्धीबळ फार शांतपणे व्हायचे.

मी त्याला देव मानत नाही…

लेखक रामबाण
सोमवार, 11/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो... तो_१ छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची.

काश्मीर प्रश्न, नेहरु, माऊंटबॅटन वगैरे

लेखक आशु जोग
शनिवार, 09/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
२६ ऑक्टोबर १९४७. हिंदूस्थानच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस. जम्मू-काश्मीर हे राज्य भारतात विलीन झाले. पण जम्मू-काश्मीर म्हटलं की काही लोक नेहरु, लेडी माउंटबॅटन, युनोत प्रश्न नेणे याच गोष्टी रवंथ करत बसतात. त्यापलिकडे चर्चा जातच नाही. JK म्हणूनच आज जम्मू-काश्मीरबाबत काही माहिती, विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १. राज्याचे नाव 'जम्मू-काश्मीर' असे आहे. नुसते काश्मीर नाही. म्हणून इथून पुढे तसाच उल्लेख करुया. २.

झोपलेले बर्फ

शुक्रवार, 08/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात कोणत्याही संवादाचा पाया असतो समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे. काही व्यक्ती समोरच्याची मते आणि विचार दडपण्याचा प्रयत्न करतात. ते असे लोक असतात ज्यांना स्वत:ची मते आणि गृहीतके बदलण्यात स्वारस्य नसते, जी चुकीची असू शकतात. असे लोक एका खोट्या गृहीतकाच्या आधारे जगतात की ते नेहमी बरोबरच असतात आणि तेच नेहमी बरोबर असतात. असा व्यक्ती ज्याला समोरच्याचे ऐकायचेच नसते ते यासाठी की त्याला भीती वाटत असते की समोरच्याचे ऐकले तर त्यातले पूर्ण किंवा काही भाग स्वीकारावा लागेल आणि स्वत:च्या मनातल्या काही चुकीच्या गृहीतकांना धक्का बसेल.

निसर्गाला काही फरक पडत नाही!!!!!!!!!!!!!

लेखक वडापाव
बुधवार, 06/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती, कारण तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणीत राहून आपणही घाण होतो म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं आणि अक्कल भराभरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, शिशुवर्ग म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमवलेल्या अकलेचा एखाद-टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय. इथे निसर्गाचा एकच कायदा आहे, 'आपण जगायचं, दुस-याला मारायचं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!!

अर्थक्षेत्र.....एक उपेक्षित क्षेत्र

लेखक ज्ञानव
बुधवार, 06/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी ते मे महिना कसली नि कसली शिबिरे चालू असतात. व्यक्तिमत्व विकास शिबीर, क्रिकेट शिबीर, टेनिस शिबीर, तबला पेटी नृत्य गायन ह्याचा रतीब चालूच असतो म्हणजे पर्यायाने खेळ गायन पाककृती कलादालन (मीपवारही अर्थ दालन असावे असे वाटते.) वगैरे बरेच काही विषय पैसे देऊन हाताळले जातात. बरे पालक पण किती चोखंदळ असतात देव जाणे कारण शेजारचा जातो म्हणून माझा जातो इथपासून ते "आहो तेवढाच आम्हाला मोकळा वेळ मिळतो!!" पर्यंतची मुक्ताफळे मी पालकांकडून ऐकत आलो आहे.

कहे कबीरा (२)

लेखक शरद
मंगळवार, 05/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कहे कबीरा (२) कबीराचे विचार कबीरपंथीयांची भारतातील संख्या काही लाखांत आहे. त्यांचे मठ अनेक ठिकाणी असून मठाधिपतींची संपत्ती, त्यांचा जनमानसावरील प्रभाव इ. प्रचंड आहेत. आज सहा सातशे वर्षे परंपरा असलेल्या या पंथाची विचारसरणी काय, त्याचा पाया कोणता त्याचा आज विचार करावयाचा आहे. कबीरानंतर त्याच्या चेल्यांनी बरेच फरक स्वीकारले असले तरी इथे आपण कबीराचाच विचार करणार आहोत.चार भागांत याची विभागणी केली आहे. (१) कबीराच्या काळातील भारतातील विशेषत: उ. भारतातील समाजाची धारणा. याचा दबाव व्यक्तीवर पडतोच, कबीरावरही पडला. (२) संत रामानंदांचा कबीरावरचा प्रभाव (३) कबीराचे मत (४) कबीर व महाराष्ट्रातील संत.