मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

साहित्य संपादक ·
लेखनविषय:
नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या.

पुस्तकं

मितान ·
लेखनप्रकार
पुस्तकं जिवंत असतात. जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो. अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात. काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात. अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.

खरा भक्त आणि भोंदूबाबा

परशु सोंडगे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कथा आणि व्यथा *************** भक्ती त्या दिवशी मी निवांत चहाच्या टपरीवर बसलो होतो. कामचं नव्हतं काही. टाईम पास चाल्ला होता. टाईम पास करणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही.काय करावं हेचं कळतं नाही मुळी .डोकचं बंद पडतं. तेवढयात माने गुरूजी आला.माने म्हणजे सज्जन माणूस...खोट बोलायचं ते ठरवून ही तो बोलू शकत नाही. का तर ? त्याला पाप लागेल. देवाधर्माचा लयं नाद. नाद म्हणजे निव्वळ याडचं त्याला. सकाळ संध्याकाळ पूजा करायची. नुसता देवदेव करायचं याड. पूजा अर्चा करणं .वा-या करणं. फक्त दिंडीत जाण्यासाठी त्यांनी अख्या अर्जीत रजा खर्च करणारे ते सर. महान आहेतं. कसा वेळ घालवायचा हा सुध्दा मोठा प्रश्न असतो?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत. अनुक्रमणिका 01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय 02. नवी सुरुवात = आंबट गोड 03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि 04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी 05. पाउलखुणा = श्वेता व्यास 06.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे ·
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

पुस्तकांविषयी सर्वकाही...

मोदक ·
लेखनविषय:
नमस्कार मिपाकर्स.. सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!! आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात.

सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.

महासंग्राम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

चांदणे संदीप ·
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.

रंगभूमी दिन

महासंग्राम ·
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

डॉ.अक्षयकुमार काळे : एक ओळख. (अ.भा.मराठी साहित्य संमेलन उमेदवार)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनप्रकार
राम राम मंडळी. डोंबिवली येथे नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु झाली आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेत डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. आम्ही त्यांचे पाठीराखे, आणि मतदार असल्यामुळे आम्हीही त्यांच्या सोबत होतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य समाज आणि संस्कृतीच्या चिंतनाचं एक व्यासपीठ आहे, असे आम्ही समजतो. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीचा विचार त्या विचारपीठावरुन मांडल्या जातो हे अनेकांना माहिती आहेच.