Skip to main content

प्रकटन

माझ्या समोर बसलेली ती (लोकल गोष्टी-४)

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 22/07/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या समोर बसलेली ती ============================================= तारीख, वार, वेळ.. काही काही आठवत नाही आहे,आठवती आहे.. ती, फक्त ती.. माझ्या समोर बसलेली ती; मी पार्लं की सांताक्रुझ या पैकी कोणत्या तरी स्टेशनवर लोकलमध्ये चढले, ती माझ्या आधीच लोकल मध्ये बसलेली होती. लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती.. नाही..! गर्दी नव्हतीच. मला बसायला विंडो सीट मिळाली. ती वाऱ्याच्या दिशेस असलेल्या सिट वर बसलेली होती, खिडकीजवळची जागा रिकामी असून तिथे न बसता थोडंसं अंतर सोडून.. दुसऱ्या कोणाला ही तिथे बसता येऊ नये अशी. तशी मी सहसा बसायला जात नाही, दारा जवळच उभी राहते.. त्या दिवशी थोडा थकवा जाणवत होता..

मी आणी माझा आयडी

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 22/07/2010 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज हापिसातुन घरी आलो, लॅपटॉप सुरु केला तोच त्यातुन अलादीनच्या दिव्याप्रमणे धुर निघाला आणी त्यातुइन एक आकृती तयार झाली. आकृती म्हणाली कसं काय? मी विचारलं कोण तु? आकृती म्हणाली अरे मी तुझा आयडी, आंतरजालावरचा. मी : - अरे मग असा कंप्युटर मधुन बाहेर का आलास? आयडी: - आलो तुझ्याशी गप्पा मारायला. मी: - काय बोलायचय बोल. आयडी :- काही नाही यार. आजकाल आंतरजालाचा कंटाळा येतो.

आषाढी एकादशी काही कथा

लेखक बज्जु यांनी बुधवार, 21/07/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशी:- म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली.

प्रकटन

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले. अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले. तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे.

ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽ

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 19/07/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे. खरं तर मलाही तिच्याबरोबर विठोबाच्या देवळात जायला आवडायचं.

कळतं पण वळत नाही

लेखक शुचि यांनी शनिवार, 17/07/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी नवर्‍याचा वाढदिवस झाला. नणंद तिच्या मुलीस घेऊन आली होती. तिची मुलगी आणि माझी मुलगी जवळजवळ सारख्या वयाच्या. पूर्ण दिवस गप्पा, खेळ, मनोरंजन, खाणंपीणं यात गेला.

कॉलेज कट्टा भाग - अंतिम

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 16/07/2010 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
---भाग - १ --- ---भाग - २ --- ---भाग - ३ --- ---भाग - ४ --- ---भाग - ५ --- "ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती.

आग्रहाचे निमंत्रण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/07/2010 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी. एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग..