Skip to main content

प्रकटन

रिक्षावाले काका

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/06/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद. दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! '' दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! '' पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात. ''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! '' रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते.

मामाचा वाडा चिरेबंदी

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 27/06/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोमू माहेरला आली हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा असं गाणं लहानपणापासून ऐकलं होतं. माझ्या आजीचं (आईच्या आईचं) गाव राजापूर. आईच्या वडलांचं गाव वेरळ. त्यामुळे मी आणि माझे आईवडील हाडाचे मुंबईकर असले तरी भावविश्वात कोकण यायचंच. कधी आईच्या मामाने आणलेला फणस, तर कधी मला न आवडणारं कुळथाचं पिठलं. लग्नकार्याच्या वेळी एकत्र जमलेल्या लोकांकडून ऐकलेल्या गप्पा, होणाऱ्या अतिशय जवळिकीच्या ( पक्षी खोदून खोदून होणाऱ्या - पैसे किती मिळतात, इतकी वर्षं झाली तरी मूल का नाही वगैरे) चौकशा व भुताखेतांच्या गोष्टी - इतपतच कोकणाची माहिती. त्यात कल्पनाविश्वात भर म्हणजे गारंबीचा बापू, पुलंचा अंतू बर्वा वगैरे.

कदाचित...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 27/06/2010 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
... भारत भिका सावकार नावाच्या कुणीतरी परवा कधीतरी आत्महत्या केली. दारूच्या नशेतच त्यानं स्वत:ला संपवलं, असं त्या बातमीत म्हटलं होतं. काय कारण असेल त्याच्या आत्महत्येमागचं? कर्जबाजारीपणा?... बेकारी?... कौटुंबिक कलह?... की नुसती व्यसनाधीनता?... ... भारत भिका सावकार हा त्या दिवशी आत्महत्या करणारा एकटा नव्हता. त्याच्या आधीच्या आठवड्यात, विदर्भात एका दिवशी, जवळपास दर तासाला एक आत्महत्या झाली होती... तरीही, एकाच वर्तमानपत्राच्या डाव्या पानावर, एका न दिसणा-या कोपर्‍यात, भारत भिका सावकारच्या आत्महत्येची बातमी छापून आली होती... भारत भिका सावकार हा कुणी प्रसिद्ध, नामवंत माणूस नसेल.

पालट

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 25/06/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची रिपरिप सुरूच होती. हे असं एकसारख रिपरिपणं मग हळुहळू तुमच्या गाभ्या पर्यंत उतरत जातं. सकाळ तशी झालीच नव्हती. वेळेनुसार डोळे उघडले, तर बाहेर हे रिपरिपणं ! सूर्याला सुद्धा कंटाळा आला असावा. दर्शन देण्याचीसुद्धा तसदी न घेता त्यानंही "दिवस सुरू" असं घोषित करून परत कूस बदलली असावी. पाऊस असो वा नसो; डोळे उघडायची तुमची इच्छा असो वा नसो, घड्याळ कधी कुणासाठी थांबलय? मग घड्याळ्याकडे पाहत पाहत, सगळ्यांच्या आंघोळी, दोघांची दुधं, आमचा चहा. हाताला चक्र बांधल्यागत झर झर कामं हातावेगळी केली.

बैल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 25/06/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अहो काय म्हणतोय ते बघाल का? "काय"? ट्रिप ला जातोय. " जाउ दे की" पंधरा हजार मागतोय. "ठीक आहे. देउन टाक" कुठे ते विचारा की? "बर. विचारतो. कुठे"? वर्गातले मित्र आणि मैत्रीणी पण बरोबर आहेत. "ठीक आहे. त्याचे काय? रिझल्ट लागला आहे. मोकळे आहेत. करु दे की काय हवे ते." ज्युनियर मित्र आणि मैत्रीणी आणि पण बरोबर आहेत. "हो का.? बर बर." अहो, दोन प्रोफेसर्स पण बरोबर आहेत. "वा वा वा. चांगले आहे की." अहो ते सर्व खजुराहो ला चालले आहेत. दोन दिवस राहाणार आहेत. "मग त्यात तुला प्रॉब्लेम काय आहे? नविन शिक्षण पद्धतीचा भाग आहे तो. त्याला एक इंग्रजी शब्द आहे खास. तुला सांगितला तर नाही कळायचा.

गुत्तुडा

लेखक टारझन यांनी गुरुवार, 24/06/2010 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
"ए कटली रे कटली " "ए मध्या .......... पकड पकड " "मांजा पकड ... मी पतंग घेउन आलो " "च्यायला ... टार्‍या लै गुतुडा झाला लका .. मांजा काय कामाचा नाय " " आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " काही नात्यांचही असंच असतं , बरिच गुंतागुंत असते आणि आपण तो गुंता सोडवण्याबाबद बर्‍याचदा पॅसिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. गोष्ट मनाला बोचत असते कुठे तरी. पण कधी इगो आडवा येतो, मी कमीपणा का घेऊ ? मी का गैरसमज दुर करावेत ? नाती नेहमी रक्ताचीच असावीत असंही नाही. इनफॅक्ट आपला नातेवाईकांशी हल्ली संबंध तरी कितीसा येतो हो ? कधी सुख-दु:खाच्या प्रसंगात तोंडदेखली चार हाय-बाय-कसंकाय ?

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.

रोहीडा: बिनीचा किल्ला उर्फ विचित्रगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 22/06/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
२० जूनला सकाळी कुठेतरी भटकायला जायचे ठरले आणी लगेच ठिकाणही ठरले ते म्हणजे भोरजवळील रोहिडा किल्ला बरेच दिवस तो करण्याचे मनात होते पण काही केल्या जमत नव्ह्ते. आज योग जुळून आला. आम्ही चौघे मित्र निघालो ते मित्राच्या चारचाकीने. सव्वा तासातच भोरपासून ८ किमी असलेली बाजारवाडी गाठली. बाजारवाडी हे रोहीड्याच्या पायथ्याचे अतिशय सुंदर असे गाव. गावापासून लगेच चढाईला सुरुवात होते. पावसामुळे हवेत मस्त गारवा पसरला होता. शेतं हिरवीगार झाली होती. काळे ढग मधूनच बाजूला सरकून निळाइचे दर्शन घडवत होते.

शाब्द ज्ञान

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 22/06/2010 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाब्द ज्ञान (कल्पनारम्य कथा) - - - असिद्धवदत्रा! भाति सर्वं शब्देन विना । येथे सर्व काही असिद्ध असल्यासारखे भासतंय हो! शब्दांविना बुद्धी काही समजूच शकत नाही, असे तर नाही ना? नासदासीन्न सदासीत् । "असणे" आणि "नसणे" हेच शब्द नसले तर ज्ञान कुठले? तसे नव्हे. काहीतरी आहे. शब्द नसले तरी संवेदनांमधून काही कळते. नावे नाहीत म्हणजे ज्ञानच नाही, हा भ्रम आहे. "नाव" हे कसले नाव? नाव म्हणजे संकेत-शब्द. "शब्द" हे कसले नाव? शब्दच माहीत नसता, शब्दांतच शब्दांची व्याख्या शक्य नाही. मग व्याख्यांबद्दल कुतूहल तरी शब्दांविना कसे शक्य आहे? कुतूहल म्हणजे ज्ञानासाठी तहान. तहान ही संवेदना आहे.

घुबडाचे पेलेट्स

लेखक शुचि यांनी सोमवार, 21/06/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. फ्रीवेवर नेहेमीप्रमणे लहान स्कंक, रकून सारखे प्राणी मधे मधे दिसत होते चिरडले गेलेले. यावेळेला मुलगी बरोबर असल्याने माझ्यातल्या "आई"ने ज्ञान द्यायची संधी दवडली नाही. मी मुलीकरता एक पुस्तक आणलय जे की तिने अजून वाचायचय पण मी वाचून संपवलय. त्या पुस्तकात- एका कुटुंबानी एक सोनेरी गरुडाचं पिल्लू पाळलेलं होतं आणि त्यांच्यापुढे समस्या ही होती की या पिल्लाला खायला काय घालायचं? कारण शिजवलेली कोंबडी, सॉसेज, मटण वगैरे खाऊन आठवड्या दोन आठवड्यात हे शिकारी पक्षी मरतात. या पक्षांकरता आख्खा उंदीर, रकून, स्कंक, खार, कोंबडी वगैरे असं खाद्य लागतं.