मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

तळेकर ·
"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ? lalaa शक्य असेल तर जरुर करा. आणि ते आमच्या संगणकात कसे करता येईल तेही सांगा.

संततीसंबंधी समस्या -- बीज क्षेत्र विचार

धोंडोपंत ·
लोकहो, संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण. प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, त्यातून येणारे नैराश्य, जोडीदारांचे एकमेकांशी न पटणे, "तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले" अशा स्वरूपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, आणि त्याची परिणती म्हणजे घटस्फोट आणि विभक्तता. त्याचप्रमाणे काहीजणांच्या कुंडलीत मुळातचं संततीसौख्य नसतं.

माझी मायभू

वडापाव ·
प्राचीन काळापासूनची आपली संस्कृती बहुतांशी टिकवून ठेवणारा, विविध परकियांचे आकर्षणस्थान झाल्याने व त्यांच्या आक्रमणांमुळे या संस्कृतीत किंवा संस्कृतीतून जरी काही घटक समाविष्ट अथवा नाहीसे झालेे असले, तरी न ढळता अभिमानाने जगात मान उंचावणारा, जीवसृष्टी व लोकसृष्टीत अमाप प्रमाणात विविधता असलेला, विकासाच्या दिशेने रोज पाऊले पुढे टाकत जगावर छाप पाडणारा, असा हा भारत देश. ह्या देशावर सर्वप्रथम आर्य, त्यानंतर शक, मग मौर्य, मग ग्रीक, इत्यादी प्रबळ राजवटींनी देशाचा कायापालट करून त्याचे जणू सुवर्ण संास्कृतिक भूमीत रूपांतर केले. भारताने 1 ते 9 हे अंक अस्तित्वात आणले. शून्याचा शोध भारतीयांनी लावला.

जडणघडण

सरपंच ·
नमस्कार, मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही. सदस्य व्यवस्थापनासाठी सदस्यं संरचनेत थोडा बदल केलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सोई ज्या तुम्ही आधी वापरत होतात आणि आता त्या दिसत नाहीत असा काहिसा प्रकार असेल तर येथे तसे नमुद करावे. सोई पुर्ववत करण्यात येतील.

निवेदन- नावातील साधर्म्य

वरदा वैद्य ·
नमस्कार, मी वरदा वैद्य. मनोगत आणि उपक्रमावर वरदा नावाने माझे सदस्यत्व आहे आणि विज्ञान विषयावर काही प्रमाणात लेखन केले आहे. त्यामुळे मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. काहींचा गैरसमज होऊनही त्यांनी विचारणा केली नसेल. वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. तसेच, मिसळपावावरील वरदाप्रमाणे मीही अमेरिकेत राहत असल्यामुळे कोणाचा गैरसमज होणं साहजिक आहे, जरी माझी लेखनशैली येथील वरदाशी मिळतीजुळती नसली तरी. मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते.

ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...

विसोबा खेचर ·
राम राम मंडळी, येत्या रविवारी, म्हणजे ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी ठाणे येथे 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...' हा कार्यक्रम ठाण्यातील कलारसिक मंडळ या संस्थेने आयोजित केला आहे. पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा शिष्य अनंत जोशी (उच्चारी अन्ता जोशी! ;) हा आमचा दोस्त. आमचा अन्ता हा हिंदुस्थानी ख्याल गायनाला संवादिनीची उत्तमपैकी साथसंगत करणारा तरूण पिढीतील एक उमदा कलाकार. 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद..' या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही अन्ताची आहे. ऑर्गन या वाद्यावर आमचेही अत्यंत प्रेम!

नर्मदे हर हर

डॉ.प्रसाद दाढे ·
जगन्नाथ कु॑टे या॑चे हे बरेच गाजलेले पुस्तक मी दोन्-तीन वेळा वाचले. नर्मदा परिक्रमेबद्दल माझ्या मनात पुष्कळ दिवस कुतुहल होते. नर्मदा तीरावर अनेका॑ना अदभुत आणि गूढ अनुभव येतात. कु॑टे या॑चे अनुभव तर केवळ अच॑बित करणारे आहेत. शूलपाणीच्या ज॑गलात लुटण्याबद्दल त्या॑नी लिहीले आहे, पर॑तु नुकतीच माझ्या परिचयाच्या एका भूगोल तज्ञ गृहस्था॑नी त्या॑च्या काही मित्रा॑सोबत नर्मदा परीक्रमा केली, त्या॑ना शूलपाणीत लुटले नाही. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का?

ईमेल पाठवण्यात अडचण?

सरपंच ·
मिसळपाव वर नोंदणी केल्यावर संकेताक्षर ईमेल द्वारे पाठवल्या जातो. सध्या काही सदस्यांना अशी ईमेल पोहोचलेली नाही अशी तक्रार आलेली आहे. ज्यांनी अशी तक्रार केली आहे त्यांची अडचण सोडवण्यात आलेली आहे. आणि कुणाला अशीच अडचण आहे का? असल्यास sarpanch.misalpav@gmail.com वर ईमेल पाठवून कळवावे. यापुढे मिसळपाव वर नोंदणी करतांना आपण स्वतःला हवा तो संकेताक्षर निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. ईमेल पत्ता देणे मात्र बंधनकारक आहे. धन्यवाद.

शाकंभरी पौर्णिमा = मंगळवार २२ जानेवारी २००८

धोंडोपंत ·
नमस्कार, या वर्षी शाकंभरी पौर्णिमा मंगळवार दिनांक २२ जानेवारी २००८ रोजी येत आहे. या दिवशी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. असे म्हणतात की प्राचीन काळी एकदा महाभयंकर दुष्काळ पडला असतांना सर्व ऋषिमुनिंनी देवीला साकडे घातले आणि तो दुष्काळ निवारण्याची विनंती केली. त्यावेळी देवीने पर्जन्यवृष्टी करून धरती पुन्हा हिरवीगार केली. त्यावेळी धरतीवरती विविध पालेभाज्या उगवल्या.