Skip to main content

लेख

It's a Tie !!

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 26/12/2016 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१९६० सालचा डिसेंबर महिना... फ्रँक वॉरेलचा वेस्ट इंडी़जचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता. फ्रँक वॉरेल हा वेस्ट इंडीजचा पहिला कृष्णवर्णीय कॅप्टन! गोर्‍या ब्रिटीशांचा पगडा असलेल्या वेस्ट इंडी़जचे पूर्वीचे सर्व कॅप्टन्स गोरे होते. वॉरेलच्या संघात वेस्ट इंडीजचा शेवटचा गौरवर्णीय कॅप्टन आणि विकेटकीपर जेरी अलेक्झांडरचाही समावेश होता! अलेक्झांडर व्यतिरिक्त कॉनरेड हंट, सेमूर नर्स, रोहन कन्हाय, जो सॉलोमन आणि गारफिल्ड सोबर्स असे एकापेक्षा एक बॅट्समन वॉरेलच्या संघात होते.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १२ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 24/12/2016 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
वाचता न आलेला post (गेल्या आठवड्याचा) सुम्याने लिहिलेल्या तिच्या डायरीतल्या आठवणी. सुम्याच्या मुलीने दिलेली डायरी गुरूनाथने आपल्या जवळ ठेवली.सुम्या अलीकडेच गेल्याने तिच्या त्या जाण्याने लागलेल्या धक्क्यात त्याला ती डायरी वाचून तिच्या होणार्‍या आठवणीने आणखी बेजार होऊन जाण्याऐवजी कधी तरी नंतर ती डायरी उघडून वाचायचं त्याने ठरवलं. सुम्याच्या मुलीने गुरूकाकाला एकदा त्या डायरीतल्या मजकूराबद्दल थोडक्यात कल्पना दिली.गुरूनाथने ती डायरी अजून वाचली नाही ह्याबद्दल तिला विशेष काही वाटलं नाही.त्याच्या जागी आपण असते तर तेच केलं असतं असा पॉझीटीव्ह विचार तिने केला. आपल्या आईला कविता लिहायला आवडायचं आणि काही

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

लेखक डिस्कोपोन्या यांनी बुधवार, 14/12/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

विदाऊट अ ट्रेस - ३ - अँड्र्यू आयर्विन

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 14/12/2016 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
Without A Trace 3 - Andrew Irvine भारतीय उपखंड आणि तिबेटचं पठार यांच्या मधोमध उभी ठाकलेली प्रचंड मोठी पर्वतरांग म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांवर आदळल्यावर निर्माण झालेला हिमालय पर्वत वायव्य - ईशान्य असा पसरलेला आहे. हिमालयाची मुख्य रांग ही वायव्येला पाकिस्तानपासून भारत, तिबेट, नेपाळ ते ईशान्येला भूतानपर्यंत पसरलेली असली तरी या मुख्य रांगेव्यतिरिक्त वायव्येच्या काराकोरम, हिंदकुश आणि पामिर, पूर्वेच्या हेन्गवान, उत्तरेच्या इत्यादी, दक्षिणेच्या शिवालिक इत्यादी पर्वतरांगांचाही हिमालयाच्या घराण्यात समावेश केला जातो.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ११ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 12/12/2016 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या निधनाच्या आठवणी काल गुरूकाकाने आईबद्दल जे सांगीतलं ते ऐकून सुम्याची मुलगी मनातून भयभयीत झाली होती.तिला आपल्या आईची खूपच काळजी वाटायला लागली होती.आपली आई आता जास्त दिवस काढणार नाही हे तिने मनात निश्चीत केलं होतं.त्या दिशेने म्हणजेच तिला कसलीही खाण्याची इच्छा झाली ती ती पुरवत होती.खरं म्हणजे सुम्याला खाण्याची कसलीच इच्छा राहिली नव्हती.आपल्या मुलीला किंवा गुरूनाथला वाईट वाटेल म्हणून ती बोलत नव्हती पण मनोमनी तिला वाटत होतं की आपण आता या जीवनातून मुक्त व्हावं.पण तशी इच्छा करून भागत नाही.प्राण जाणं कुणाच्या हातात नाही.परंतु,मला जगावं असं वाटत नाही असं आपल्याच लोकाना परत परत सांगून त्यां

पुरोगामी - प्रतिगामी

लेखक संदीप ताम्हनकर यांनी रविवार, 11/12/2016 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरोगामी - प्रतिगामी मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १० )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 07/12/2016 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या खालवत चाललेल्या प्रकृतीच्या आठवणी गुरूनाथ सरावाप्रमाणे रोज सोनचाफ्याची फुलं परडीत जमा करून सुम्याला आणून द्यायचा.त्यातलं एक फुल सरावाप्रमाणे सुम्या आपल्या केसात माळायची.उरलेली फुलं देवाच्या फोटोवर आणि आपल्या गेलेल्या प्रियजनांच्या फोटोवर वहायची.असं करीत असतानाचे ते क्षण तिला मनात येणार्‍या काळजी करणार्‍या विचारापासून दूर ठेवायचे.

प्रयोगशील शाळा

लेखक मद्रकन्या यांनी बुधवार, 07/12/2016 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत. http://epaper.lokmat.com/epapernew.php?articleid=LOK_MTHN_20161204_5_1&a... याच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती: शाळेची वेबसाईट माझा मुलगा तन्मय आनंद निकेतन, नाशिक या शाळेत इयत्ता पहिलीत आहे.

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 06/12/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली. उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं. मी देवळात जाणारा नव्हे.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 04/12/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

                 शरद जोशींच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य काय, असा प्रश्न माझ्यासहित अनेकांना सतावत आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की ती उंची पार करण्याचा विचार राहू द्या; त्या उंचीच्या आसपास पोचण्याचीही नेतृत्वक्षमता कुणात नाही, ही वास्तविकता नजरेआड करता येत नाही.