सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ६)
सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी
सुम्या आणि तिच्या नवर्याला कोकणात रहायला येऊन बराच काळ निघून गेला.सुरवाती सुरवातीला गुरूनाथ आपल्या घरात एकटाच खाणावळीतून डबा आणून जेवायचा.खरं म्हणजे सुम्याने त्याला आल्या आल्या सांगीतलं होतं की तू आमच्या बरोबरोबर जेव म्हणून.पण गुरूनाथला ते अवघड वाटायचं.
नंतर गुरूनाथ एकदा आजारी पडला.सहाजीकच सुम्या आणि तिचा नवरा त्याची देखभाल करायचे.करता करता त्यालाही कळून चुकलं की,बरं झाल्यावर आपण आपला एकट्याचा डाबा आणून जेवणं तेव्हडं योग्य दिसणार नाही.
तेव्हा तो त्यांना म्हणाला,आपल्या तिघांचं जेवण आपण खाणावळीतूनच आणूया.नाहीतरी सुम्याला ह्या वयात दोघांसाठी तरी जेवण करण्याची मेहन
मिसळपाव