Skip to main content

लेख

न्यूरेम्बर्ग - भाग १

लेखक अफगाण जलेबी यांनी शुक्रवार, 25/11/2016 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग १ न्यूरेम्बर्ग खटल्यांबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते चालवले गेले हीच आहे. दुसरं महायुद्ध हे इतिहासातलं सर्वात संहारक युद्ध होतं. त्याच्या शेवटी विजेते आणि पराभूत हे दोघेही प्रचंड थकलेले होते. युरोपची दुर्दशा झाली होती. जर्मनी जवळपास पूर्णपणे उध्वस्त झाला होता. तिथले बहुसंख्य नागरिक उपासमार आणि रोगराई यांचा सामना करत होते.

योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात. अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय .

योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ७)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 21/11/2016 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी. खासगी नोकरीला निवृत्तीचं वय नसतं.गुरूनाथ सारखे, वेळ जावा म्हणून किंवा कार्यक्षम रहाण्यासाठी काम करत असतात.शरीर थकत असतं हे अशावेळी जाणवत नाही.बाहेरचे अवयव उदा.डोळे, कान, हातपाय,जोपर्यंत कुठलीच कुरकुर न करता कामात येतात तोपर्यंत सगळे काही आलबेल आहे असं वाटत असतं.पण शरीरातल्या आतल्या अवयवांचं काय?

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

कर्मयोगी एकनाथजी रानडे भाग १

लेखक मंजूताई यांनी शनिवार, 19/11/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी' विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे! एक जीवन एक ध्येय चा मंत्र देणाऱ्या माननीय एकनाथजींचा एकशे दोनवा जन्मदिवस! त्यांना भावपूर्ण आदरांजली!

परीकथा - भाग तेरा - फेसबूक स्टेटस २.७ - २.८ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 19/11/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
११ ऑक्टोबर २०१६ "पप्पा तू ईथे झोप, उठू नकोस", काल रात्री जेवल्यावर तिने मला सोफ्यावर आडवे केले. मग आतल्या खोलीतून मोबाईलचा चार्जर घेऊन आली. स्वत:च्या गळ्याभोवती लटकावला. माझी बनियान वर सरकवली. आणि त्या चार्जरच्या वायरचे टोक माझ्या उघड्या पोटावर टेकवून म्हणाली, "मी तुला तापवते" मी हडबडलो.. तापवते !! चार्जरने?? पण तिच्या गळ्यात लटकावलेल्या चार्जर कम स्टेथोस्कोपवरून काय ते समजलो.. मी तुला तपासते :) मग मला बाऊ झालाय हे डिक्लेअर करून रीतसर औषध दिले गेले. पण सोबत आईसक्रीम सुद्धा दिले.

अहिराणी लगीनघाई !

लेखक आर्या१२३ यांनी शुक्रवार, 18/11/2016 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! २०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' मायबोली.कॉम वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते. त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय.सर्वांना समजेल अशी आशा आहे.. प्रसंग असा आहे: आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय. ..... नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी?

बोट - आयजीच्या जिवावर बायजी उदार

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 17/11/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते. मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं. तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली. घरापासून दूर राहाणार्या कित्येक लोकांमध्ये एक गैरसमज असतो.

न्यूरेम्बर्ग

लेखक अफगाण जलेबी यांनी गुरुवार, 17/11/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या महायुद्धाच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे युद्धगुन्हेगार या संकल्पनेचा उदय. आज जे युद्धगुन्हेगारीमध्ये मोडतात तसे गुन्हे दुस-या महायुद्धाआधी झाले नाहीत असं नाही. पण दुस-या महायुद्धाने ही संकल्पना स्पष्ट केली. एकतर या युद्धात लष्करी आणि नागरी  (Military and Civilian)  ही सीमारेषाच पुसून टाकली गेली होती. १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दोन किंवा अधिक देशांमधलं युद्ध हे लष्करापुरतं मर्यादित असे. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसा युद्धाचा आवाका वाढत गेला.