Skip to main content

प्रेम कविता

...असं काही नसतं

लेखक निओ यांनी शनिवार, 06/04/2019 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा बायकोचं भांडण असं काहीच नसतं तो म्हणतो पूर्व, ती म्हणते पश्चिम बस एवढंच म्हणणं असतं बघितलं तर ती ही एक गंमत असते हाताबाहेर जाईल एवढं ताणायचं नसतं दोन चार दिवसांच्या अबोल्यानंतर आपोआपच नरम व्हायचं असतं वीजांच्या कड्कडाटानंतर पावसानं धरणीला भिजवायचं असतं तिनं हळूच कुशीत शिरायचं असतं त्यानं हळूवार कुरवळायचं असतं मायेच्या ओलाव्यात नवीन जग फुलवायचं असतं

कोरडं रान

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 03/04/2019 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग नको निघू भर दुपारचं उन्हातानाची ग कमरेवर जरी पाणी तरी डोईवरी आग ग चालतांना चाल तुही लचकेदार ग रानामधी धावती हारीणी नाजूक ग सगळीकडं आसती काटेरी बाभळी ग तु रानामधी उगवलं गुलाबाचं फूल ग किती वाटतं दोन शब्द तुह्याशी बोलू ग पन बोलतांना वठी नाही काही येत ग तुह्या नजरंला जवा नजर माझी भिडती ग ढगातली वीज पडं लक्कन काळजात ग एकडाव तरी तु माह्यासंग मनातलं बोल ग तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं डेकूळ ग किती सांगू माझी रामकथा माह्याचं तोंडून ग सारीकडं पावसाचं पानी पन माह्य रानं कोरडं ग - पाषाणभेद ३/४/२०१९
काव्यरस

तुझी कविता

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 18/01/2019 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या

हि सर पावसाची पुन्हा आज आली.

लेखक AjayRGodse यांनी शुक्रवार, 19/10/2018 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
हि सर पावसाची पुन्हा आज आली हि सर पावसाची पुन्हा आज आली पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते, क्षितिजावरी का तुला ते पहाते ? पुन्हा पावसाशी तुझी बात झाली. हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची. हि सर पावसाची पुन्हा आज आली तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली मन बेभान होते, तुझे गीत गाते. का मिलनाची तुला साद देते ? तुला भेटण्याची का मना आस झाली ? हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची. हि सर पावसाची पुन्हा आज आली. तुझ्या अंतरीचे गुज सांगून गेली. मन बेधुंद होते, विरहात झुरते. स्वप्नी तुझ्या का हळुवार बुडते? निसटून गेली पुन्हा रात्र ओली.
काव्यरस

निघताना....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 23/08/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

मिलन

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 11/08/2018 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या स्पंदनांची भावना मी वदतो.... रत्नहार बिंदूंचा.... तव कोमल कंठी शोभतो! लाजुनि तू शलाकेपरी... क्षणार्धात लोपसी... त्या क्षणिक रूपाच्या मोहात; निळावंति मी गुंतलो.... सागर-नभापरि मी तृषार्त... तू बरसती नभरेखा... मिलन आपुले क्षितिजावर... त्या क्षणास मी आतुरलो....
काव्यरस

गर्भार सातव्या महिन्याची

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 01/08/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिच्यासाठी झटून दिनरात दिली परीक्षा प्रीतीची आज भेटली ती, होऊन गर्भार सातव्या महिन्याची! मावळला ध्यास, गळाली आस गळ्यापाशी कोंडला श्वास म्हणतील मामा, तिची लेकुरे भीती मला त्या नात्याची! क्षण पदोपदी झुरण्याचे नकळत मागे फिरण्याचे आता आठवती ते खर्च आणि उसनवार मित्रांची! आता काय, शोधू दुसरी तीही नसेल तर तिसरी करणार काय, मुळातच आहे, बागेत गर्दी फुलांची! - संदीप चांदणे

असाव कोणीतरी

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 08/07/2018 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

वाया गेलेली कविता

लेखक कहर यांनी गुरुवार, 28/06/2018 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहर चालला तो दुपारचा त्यातून घन आलेले दाटून दमट जराशी हवा पसरली लपाछपी खेळतसे ऊन दूर कुठे तो बसून रावा घालीत होता किर किर शीळ उदास होते आयुष्य झाले सरता सरेना आजची वेळ अशाच वेळी बसून एकटा हळूच असे तो निरखत तिजला एक भेंडोळे एक लेखणी होता हाती घेऊन बसला काही अंतरावर ती होती घागर बुडवीत पाण्यामध्ये रेखीव काया लवचिक बांधा वर्ण गोमटा कपडे साधे तिला ना होती जाणीव त्याची गुणगुणतसे आपल्या तंद्रीत आडोशास तो बसला होता काही खोडीत काही लिहीत घागर भरुनी ती निघताना याची लेखणी थांबे पुरी शीळ घालुनी तिज तो बोले तुजवर लिहिले हे वाच सुंदरी निघे गुलाब मग खिशातुनी जशी ती एकेक ओळ वाचता जरा थांबुनी मग ती वद

जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही

लेखक खिलजि यांनी बुधवार, 02/05/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेतून पायउतार होणं कधी जमलंच नाही काय शोधत होतो अखेरपर्यंत ते कधी कळलंच नाही तो वेग मंदावला असाच वारा बेभान वाहतच होता धावता धावता कधी थांबलो ते कळलंच नाही खाली जमिनीवरूनच घेतला वेध मी आकाशाचा इच्छा मनात धरिता तारा निखळून पडला काय मागितलं होतं अन काय पदरात पडलं ते समजलंच नाही सांगोपांगी कथा बहू ऐकल्या काही ठेवल्या मनात तर काही ओठात जे घडलं प्रेमात माझ्या ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही माझं प्रेम माझ्याकडेच राहिलं मला कधी फळलंच नाही {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}