मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी गझल

नभाचा सातबारा

महासंग्राम ·
लेखनविषय:
काव्यरस
ढगच दाटतात आकाशात सध्या, नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली... जगणे सुद्धा कठीण झाले सध्या, पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली... जरी बाप राबतो शिवारात त्याचा, शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली... पाहू कोण पुरुन उरतो सध्या, मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली... सारे नेतेच उदंड झाले सध्या, आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली... जिप्सी

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :) तुझे लाघवी बोलणे ते अवेळी तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी जसे पावसाचे अकाली बरसणे तुझे आर्जवी वागणे ते अवेळी लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी लगावली : लगागा लगागा लगागा लगागा वृत्त : भुजंगप्रयात

तो क्या करे... अख्तर शिरानी यांची ग़ज़ल

वेल्लाभट ·
लेखनविषय:
काव्यरस
नमस्कार, उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका शायरची आणखी एक ग़ज़ल आणि मला उमगलेला तिचा अर्थ इथे लिहीत आहे. हा शायर म्हणजे अख्तर शिरानी. यांचं मूळ नाव मुहम्मद दावूद खान. लाहोर ला वाढलेल्या या शायरचं काव्य हे विलक्षण तरूण आहे. त्यांची ही ग़ज़ल विरहानंतरच्या, ताटातुटीनंतरच्या हतबलतेचं अत्यंत ह्र्द्य वर्णन करते. मत्ला असा आहे, काम आ न सकी अपनी वफा़एं तो क्या करे उस बेवफ़ा को भूल न जाए तो क्या करे प्रेमभंग आणि विश्वासघात हातात हात घालूनच असतात. आपण सर्वस्व अर्पावं आणि दुस-याने त्या विश्वासाला तडा द्यावा याचं दु:ख वाट्याला आलं की काय करावं सुचत नाही.

नुसतेच शब्द ओठी

वेल्लाभट ·
लेखनविषय:
काव्यरस
ब्लॉग दुवा हा. नुसतेच शब्द ओठी रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी मी आवरू न शकलो आवेग भावनेचा अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी एका दिशेस वळती माझे विचार सारे एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी - अपूर्व ओक सर्व हक्क र

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
फसवले काळासही मधुमास होते भोगले जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला जानकीने का इथे वनवास होते भोगले ? दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली यार, फसलेले किती अदमास होते भोगले वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ? स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा काफिया : मधुमास, मरणास, वनवास, परिहास, सहवास, उपहास, अदमास रदीफ़ : होते भोगले विशाल

सखी तुझ्या अंतरात होतो

drsunilahirrao ·
लेखनविषय:
काव्यरस
कुठे कुणाच्या घरात होतो सखी तुझ्या अंतरात होतो दहाजणींतून देखणी तू तसाच मी शंभरात होतो जिथे तिथे गाय लंगडी अन सदैव मी वासरात होतो अता जमीनीवरी परंतु कधीतरी अंबरात होतो उन्हात मी जन्म काढला पण तुझ्यासवे एक रात होतो डॉ.सुनील अहिरराव ---------------- धागा संपादित केला आहे

का पाहूनही टाळत राहतेस...

शब्दबम्बाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
का पाहूनही टाळत राहतेस, काळीज माझे पिळत राहतेस… असताना सोबतीस आठवणींचे मोती, का आसवे शिंपल्यात गाळत राहतेस… तोडून सारे बंध मनाचे, का दुःख धाग्यातून माळत राहतेस… पसरून भूतकाळाच्या तप्त निखार्यांना, का स्वतःला जाळत राहतेस… झाले गेले विसरून जावे, का त्या क्षणांना उगाळत राहतेस… करून मला दूर स्वतःपासून, का स्वप्नातून माझ्या जवळ राहतेस… आशिष

शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
धुंद होवुन गरजतो पाऊस आहे हाय ओला बरसतो पाऊस आहे... माय काळी आज पान्हावे नव्याने स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे... रान हिरवे नाचले बेभान आता मोर होउन लहरतो पाऊस आहे वीज कोसळते, सरी होती कट्यारी शस्त्र ओले परजतो पाऊस आहे... बघ धरा ओलावली आता कशाने? भेटताना हरखतो पाऊस आहे... का चकोरा येतसे ग्लानी सुखाने? की तयाला भरवतो पाऊस आहे...? चल 'विशाला' जावुया रंगून आता अंगणी या बहरतो पाऊस आहे... विशाल

डायरीचे पान

महासंग्राम ·
लेखनविषय:
काव्यरस
मज व्यथेची हाव कुठे, कुंपणाची धाव कुठे दुःख ही जरासे पचले नाही, वेदनेला वाव कुठे जिंकला समर जरी तो, तरी सुखाची हाव कुठे झाली माणसे परागंदा, राहिले मज गाव कुठे रेखले होते तुझे नाव ज्याच्यात, हरवले ते डायरीचे पान कुठे #जिप्सी

समर

महासंग्राम ·
लेखनविषय:
काव्यरस
अताशा जन्म झाला माझा आता कुठे मी जगण्यास लायक होतो त्यांनी केले मला पुढारी गुलामांचा मला वाटले मी नायक होतो प्रश्न जेव्हा जगण्याचा येतो माझा लढ़ा निर्णायक होतो एवढे समर जिंकुनही कृष्ण तरी कुठे राधेचा होतो -जिप्सी